Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

तलाठी भरतीची अंतिम प्रक्रिया सोमवारी; २३१ पदांचा मार्ग होणार मोकळा !! Talathi Bharti 2024

Maharashtra Talathi Bharti 2024-http://mahabhumi.gov.in

Maharashtra Talathi Bharti 2024 Update

जिल्ह्यातील २४१ तलाठ्यांची पदे रिक्त असताना ‘पेसा’ क्षेत्रातील १० उमेदवारवगळता २३१ जणांच्या अंतिम निवडीसंदर्भात निवड समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सोमवारी अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यामुळे सोमवारी अंतिम निवडपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी दिली जिल्हा प्रशासनाने गेल्यावर्षी २४१ तलाठ्यांच्या रिक्त पदांचा आढावा घेतला होता. न्यायप्रविष्ठ बाब असल्याने २४१ मधील पेसा क्षेत्रातील १० जणांच्या भरती प्रक्रियाला वगळण्यात आले होते. त्यानंतर २३१ पदांसाठी ही भरती प्रक्रिया गतकाळात राबविली गेली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

तर प्रतिक्षा यादीत १८६ जणांना स्थान देण्यात आले होते. २३१ जणांना कागदपत्रे तपासणीसह अन्य प्रक्रियेसाठी बोलाविल्यानंतर त्यातील ५७ जण गैरहजर असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे प्रतिक्षा यादीतील ५७ जणांची कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे. जूनअखेरीस ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी निवड समितीच अध्यक्ष आयुष प्रसाद यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केली जाणार आहे त्यांनी मंजुरी दिल्यानंतर ही यादी जाहीर केली जाणार आहे. दरम्यान नव्याने सेवेत दाखल होणाऱ्या सर्वच उमेदवारांचे कासार यांच्य मार्गदर्शनाखाली समुपदेशन केले जाणार आहे

प्रतीक्षा यादीही तयार

दरम्यान, या अंतिम निवड यादीतील काही उमेदवार अन्यत्र सेवेत दाखल झाल्याने ते रुजू होतील किंवा नाही, याविषयी प्रशासनाला साशंकता आहे. त्यादृष्टीने सामान्य प्रशासन विभागाने संवर्गनिहाय प्रतिक्षा यादी तयार ठेवली आहे. या उमेदवारांच्या यादीसंदर्भात जिल्हाधिकारी सोमवारी निर्णय घेतील


Mahsul Vibhag Talathi Bharti 2024

तलाठी भरती पेसा 1718 पदांकरिता नियुक्ती देण्यासाठी कोर्टाची मान्यता संदर्भातील कोर्ट ऑर्डर लिंक खाली दिलेली आहे.  दिलेल्या PDF मध्ये आपण कोर्टाच्या आदेशाची माहिती बघू शकता. तलाठी भरती निकाल हा ११ जुलै रोजी प्रकाशित होणे अपेक्षित आहे, कारण शेवटची सुनावणी हि ११ जुलै रोजी होणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

कोर्ट ऑर्डर PDF डाउनलोड करा 

 

 

सध्या संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांत पोलीस भरती चालू झाली आहे. बुधवारपासून या जिल्ह्यांत मैदानी चाचण्या घेतल्या जात आहेत. सरकारी नोकर होण्याची नामी संधी हीच आहे, असे समजून या चाचणी परीक्षेत लाखो परीक्षार्थीनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पोलीस विभागात वेगवेगळ्या पदांसाठी चालू असलेल्या या भरती प्रक्रियेत तरुण उत्साहाने सहभागी होत आहेत. मात्र एकीकडे पोलीस भरतीची प्रक्रिया चालू असताना दुसरीकडे तलाठी पदासाठी निवड झालेल्या, मात्र अद्याप नियुक्ती न मिळालेल्या यशस्वी परीक्षार्थीचा मुद्दा समोर आला आहे. या यशस्वी परीक्षार्थीची अद्याप तलाठी म्हणून नेमणूक झालेली नाही. त्यामुळे सरकारला ग्रामीण भागातील प्रशासनाची चिंता नाही का? असे प्रश्न विचारले जात आहेत. 

राज्य सरकारने तलाठी पदासाठी गेल्या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात स्पर्धा परीक्षा घेतली. जानेवारी महिन्यात त्याचा निकालही लागला. या निकालानंतर ४ हजार ७४४ यशस्वी परीक्षार्थीचे प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे व तपशिलांची पडताळणीही झाली. मात्र अजूनही तलाठी पदासाठी निवड झालेल्या राज्यातील सुमारे ३ हजार ७४९ तरुण-तरुणींना नेमणूक दिली जात नाही आहे. ग्रामीण भागात तलाठी हे पद फार महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांची बहुसंख्य कामे ही तलाठ्याकडेच असतात. मात्र अद्याप हजारो यशस्वी परीक्षार्थीना सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागात शासनाचे काम बळकट करण्यात राज्य सरकार इच्छुक नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

निवड होऊनही नेमणुकीच्या प्रतीक्षेत असलेले तलाठी गेले अनेक महिने त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. वेगवेगळे कारण सांगून संबंधित जिल्हा प्रशासन या तलाठ्यांना नेमणूक पत्र देत नाही आहे. नुकतेच या तलाठ्यांच्या एका शिष्टमंडळांने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात भेटही घेतली होती. मात्र अद्याप या यशस्वी परीक्षार्थीना सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे आता या यशस्वी परीक्षार्थीकडून संताप व्यक्त केला जात आहे. सरकार यांना सेवेत कधी सामावून घेणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

 


राज्यातील आदिवासीबहुल अर्थात पेसा क्षेत्रातील तलाठीपदांची नियुक्ती आचारसंहितेत अडकली आहे. मात्र, उर्वरित २३ जिल्ह्यांमध्ये सुमारे एक हजारहून अधिक तलाठ्यांची नियुक्ती झाली आहे. परीक्षा दिल्यानंतर तब्बल दहा महिन्यांनी या उमेदवारांना नियुक्ती मिळाली आहे. सर्वाधिक १४४ तलाठ्यांची नियुक्ती रायगड जिल्ह्यात झाली आहे. 

राज्यात मागील वर्षी जून महिन्यात चार हजार ४६६ जागांसाठी १० लाख ४१ हजार ७१३ एवढे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मात्र, पेसा क्षेत्रातील अर्थात आदिवासीबहुल क्षेत्रातील जिल्ह्यांमधील पदभरतीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने राज्यातील १३ जिल्ह्यांमधील पदांबाबत निकाल राखून ठेवण्यात आला. त्याखालोखाल ११३ उमेदवार सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत, तर अमरावती, यवतमाळ, पालघर, गडचिरोली पुणे, नगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, चंद्रपूर, नांदेड व ठाणे या जिल्ह्यांमधील एक हजार ७०३ उमेदवारांची नियुक्ती रखडली आहे.
राज्यातील अन्य २३ जिल्ह्यांतील २,४७९ निवड झालेल्या उमेदवारांपैकी १,४४९ उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली होती. त्यातील एक हजार ४४ उमेदवारांना तलाठी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.

जिल्हानिहाय नियुक्ती दिलेले तलाठी
● मुंबई शहर – १३, मुंबई उपनगर ३२, रायगड – १४४, रत्नागिरी – ५३, सिंधुदुर्ग- २४, सोलापूर – ११३, सातारा – ३८, सांगली ४४, कोल्हापूर २१, नागपूर – ५३, वर्धा ६३, भंडारा २३, गोंदिया- १७, अकोला – ३१, बुलडाणा ३६, वाशिम २१, संभाजीनगर – ५९, बीड ५५, परभणी- ८१, धाराशिव – ६४, जालना – १६, लातूर – १७, हिंगोली – २९.


Maharashtra Talathi Bharti 2024 Update

लोकसभा निवडणुकीसाठी असलेली आचारसंहिता ५ जून रोजी शिथिल होणार आहे. मात्र तत्पूर्वीच विधानपरिषदेची निवडणूक जाहीर झाल्याने ५ जुलैपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तलाठी भरतीसाठी आचारसंहिता शिथिल करावी, असा प्रस्ताव निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यावर आयोग काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागून आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी दि.२४ रोजी  निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

एकीकडे लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेमुळे १६ मार्चपासून कामकाज ठप्प आहेतशातच पदवीधर मतदारसंघासाठी आचारसंहिता लागू झाली आहेत्यामुळे  जुलैपर्यंत आचारसंहिता लागू राहणार असल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निवडणूक आयोगाला एक प्रस्ताव पाठविला आहेत्यानुसार तलाठी भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेतसेच निवड यादीही निश्चित झाली आहेयामुळे या भरतीसाठी आचारसंहिता शिथिल करावीअसा प्रस्ताव दिला आहे.

पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात १३ हजार ५६ मतदार आहेतमतदार यादीत काही चुका असल्यास त्या दुरुस्ती करून घ्याव्यातअसे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहेया निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तर प्रत्येक तालुक्याला तहसीलदारनायब तह सीलदार पीठासन अधिकारी असतील.

 


Maharashtra Talathi Bharti, Mahsul Adhikari Update

कार्यालयाच्या आस्थापनेवरील तलाठी पदभरती-२०२३ च्या नवनियुक्त तलाठी तसेच अनुकंपा तत्वावर तलाठी पदावर नियुक्ती देण्यात आलेल्या नवनियुक्त तलाठी यांचेकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे वर्गाचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे हस्ते उद्घाटन झाले. प्रशिक्षणा दरम्यान नवनियुक्त तलाठी यांचेकरिता 7/12 संगणीकरण, ई- गव्हर्नन्स, आपत्ती व्यवस्थापन आराखडा, नैसर्गित आपत्ती व महसूल विषयक इत्यादी विषयांवर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण वर्गाचे प्रस्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी केले. सन 2023 मध्ये सरळसेवा पद्भरतीतील व अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना तलाठी म्हणून नव्याने नियुक्ती देण्यात आली असून विशेष करुन केवळ नवनियुक्ती तलाठी यांना तलाठी कामकाजाबाबत व तलाठी यांचे 4 महिन्याचे प्रशिक्षणाला एकदाच सर्व तलाठी यांचे नामनिर्देशन होणे शक्य नसल्यामुळे तलाठी यांना पायाभूत माहिती होण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

 


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६१ तलाठी पदांच्या भरती संदर्भातील नेमणुकांबाबत शासनाने गुरुवारी उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागून घेतला आहे. पुढील सुनावणी १२ जून रोजी होणार असून, तोपर्यंत मॅटचे यापूर्वीचे ‘जैसे थे’ आदेश कायम राहणार आहेत. या संदर्भात गुरुवारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. पी. आर. बोरा व विनय कारगांवकर यांच्यापुढे सुनावणी झाली. 

मनीषा कांगळे आणि शुभम बहुरे यांनी तलाठी भरतीविरोधात न्यायाधिकरणामध्ये अॅड. प्रसाद जरारे व अॅड. अभिजित ठोंबरे न्यांच्या वतीने मूळ अर्ज दाखल केला होता. या तलाठी भरतीची जाहिरात २६ जून २०२३ रोजी राज्य परीक्षा समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त, पुणे यांच्या स्वतीने प्रसिद्ध करण्यात आली होती. व त्या अनुषंगाने टी. सी. एस. संस्थेमार्फत एकूण चार हजार ६४४ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. परंतु, त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे व त्यामुळे अर्जदार व इतर परीक्षार्थांचे नुकसान होऊन ते तलाठी भरतीची संधी गमावत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच, प्रतिवाद्यांनी केलेली कार्यवाही ही कायद्याच्या चौकटीत नसून, नैसर्गिक न्यायतत्त्वांना सुसंगत नसल्याचा युक्तिवाद प्राधिकरणासमोर करण्यात आला. अर्जदारांचे नाव निवड यादीमध्ये असताना सदर यादी अनेकदा दुरुस्त करून त्यांची नावे यादीतून वगळण्यात आली होती. म्हणून अर्जदारांचे नाव निवड यादीमध्ये समाविष्ट करून प्रतिवाद्यांनी अर्जदारांना नेमणूक आदेश द्यावा अशी विनंती मूळ अर्जामध्ये करण्यात आली आहे. अर्जदारांच्या वतीने अॅड. प्रसाद जरारे व अॅड. अभिजित ठोंबरे यांनी काम पाहिले. तसेच, शासनाच्या वतीने मुख्य सादरकर्ते एम. बी. भारसवाडकर यांनी काम पाहिले.


तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निकाल लागून नऊ ते दहा महिने पूर्ण झाले आहेत. तरीही राज्यातील काही जिल्ह्यांतील तीन हजार ४०० तलाठ्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले नाहीत. त्यामुळे नियुक्ती आदेशापासून तलाठी बंचित आहेत. तीन ते चार वर्षानंतर तलाठी भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणात राबविली गेली आहे. भरती प्रक्रिया पूर्ण होऊन उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी झाली आहे, मात्र त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले नाहीत. त्यामुळे तलाठी वर्गात नाराजी पसरली आहे. पात्र तलाठ्यांचे समुदेशन करून लवकरात लवकर नियुक्ती आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे. राज्यात जून २०२३ मध्ये चार हजार ४६६ जागांसाठी आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यातील १९ जिल्ह्यांतील एक हजार ४४ उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत, मात्र, बाकीच्या जिल्ह्यातील तीन ४०० तलाठ्यांना अद्यापही हजार नियुक्ती आदेश दिले नाहीत. त्या तलाठ्यांना नियुक्ती आदेश देण्यात यावेत, अशी मागणी होत आहे. 

सोलापुरातील तलाठी आदेशापासून वंचित – तलाठी भरतीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील जवळपास ११३ नवीन तलाठ्यांची नियुक्ती होणार आहे. यामध्ये दिव्यांग बांधवांसह अनाथ व माजी सैनिक आरक्षणातून तलाठी पदभरती झाली आहे. त्यांना लवकरच नियुक्ती आदेश मिळणार आहेत.

 


 

तलाठी भरती २०२३ वरील कोर्टाने स्टे उठवला आहे. त्यामुळे तलाठी भरती लवकरच पुढील टप्पा लवकरच सुरु होणार आहे. खालील परिपत्रकत आपण माहिती बघू शकता.  

 


 

आदिवासीबहुल अर्थात पेसा क्षेत्रातील तलाठी पदांची नियुक्ती निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली आहे. निवडणूक आयोगाने तूर्तास लाल कंदील दाखवला आहे. मात्र, अन्य २३ जिल्ह्यांमध्ये एक हजारांहून अधिक तलाठ्यांची नियुक्ती झाली. गेल्या वर्षी जूनमध्ये ४ हजार ४६६ २१ जागांसाठी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मात्र, पेसा क्षेत्रातील जिल्ह्यांमधील पद भरतीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने १३ जिल्ह्यांमधील पदांबाबत निकाल राखून ठेवण्यात आला आहे. 

सर्वाधिक रायगडमध्ये

  • २३ जिल्ह्यांमधील २,४७९ निवड झालेल्या उमेदवारांपैकी १,४४९ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली होती. त्यातील १,०४४ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे.
  • सर्वाधिक १४१ तलाठी रायगड जिल्ह्यात, त्याखालोखाल ११३ सोलापूर जिल्ह्यामध्ये, वर्धेत ६३, नागपूरमध्ये ५३ आहेत.
  • अमरावती, यवतमाळ, पालघर, गडचिरोली, पुणे, नगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, चंद्रपूर, नांदेड व ठाणे या जिल्ह्यांमधील १ हजार ७०३ उमेदवारांची नियुक्ती रखडली आहे.

 


 

तलाठी भरतीसाठी तब्बल एक वर्षांचा कालावधी लागणार असल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत. दरम्यान या नव्याने नियुक्त होऊ घातलेल्या तलाठ्यांची निवडणूक प्रक्रियेसाठी मदत घेता येईल ही शक्यताही आता मावळली आहे. यामुळे तलाठी परीक्षा दिलेले अनेक विद्यार्थी प्रतिक्षेत आहेत. तलाठी भरतीसाठी तब्बल एक वर्षांचा कालावधी लागणार असल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत. दरम्यान या नव्याने नियुक्त होऊ घातलेल्या तलाठ्यांची निवडणूक प्रक्रियेसाठी मदत घेता येईल ही शक्यताही आता मावळली आहे. यामुळे तलाठी परीक्षा दिलेले अनेक विद्यार्थी प्रतिक्षेत आहेत. तलाठी भरती परीक्षेत यशस्वी उमेदवारांकडून कागदपत्रांची पडताळणी तसेच प्राधान्यक्रम भरून घेतल्यानंतर नियुक्तीसाठी मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी मिळणे अपेक्षित होते. मात्र, ही परवानगी आता आचारसंहिता संपल्यानंतरच मिळणार असे स्पष्ट झाले आहे. 

तलाठी भरतीसाठी तब्बल एक वर्षांचा कालावधी लागणार असल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत. दरम्यान या नव्याने नियुक्त होऊ घातलेल्या तलाठ्यांची निवडणूक प्रक्रियेसाठी मदत घेता येईल ही शक्यताही आता मावळली आहे. यामुळे तलाठी परीक्षा दिलेले अनेक विद्यार्थी प्रतिक्षेत आहेत.राज्यात गेल्या वर्षी जूनमध्ये ४ हजार ४६६ तलाठी जागांसाठी तब्बल १० लाख ४१ हजार ७१३ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. या परीक्षेबाबत आलेल्या आक्षेपांवर कार्यवाही करून भूमी अभिलेख विभागाने यंदाच्या मार्चमध्ये या परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी तसेच निवड यादी जाहीर केली.

पेसाअंतर्गत असलेल्या १३ जिल्ह्यांमध्ये निवड प्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्याने थांबविण्यात आली होती. मात्र पेसा क्षेत्र गावनिहाय असल्याने केवळ अशाच गावांमधील ५७४ पदांची निवड प्रक्रिया स्थगित करून अन्य १ हजार ७१८ पदांसह सर्व ३६ जिल्ह्यांमधील ४ हजार २१९ पदांसाठी सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली.


तलाठी भरती परीक्षेत यशस्वी उमेदवारांकडून कागदपत्रांची पडताळणी तसेच प्राधान्यक्रम भरून घेतल्यानंतर नियुक्तीसाठी मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी मिळणे अपेक्षित होते. मात्र, ही परवानगी आता आचारसंहिता संपल्यानंतरच मिळणार असे स्पष्ट झाले आहे. आचारसंहितेनुसार राज्य सरकारला कुठल्याही पदासाठी नियुक्ती देता येत नसल्याचा नियम असल्याने राज्य सरकारने या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्र व्यवहार केला होता. आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच ही प्रक्रिया सुरु झाली असल्याने या उमेदवारांना नियुक्ती द्यावी, अशी विनंती या पत्रात करण्यात आली होती. मात्र, या नियुक्तीला मान्यता देणार देता येणार नसल्याचे आयोगातील सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे या उमेदवारांना आचारसंहिता संपल्यानंतर अर्थात जून नंतरच नियुक्ती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

तलाठी भरतीसाठी तब्बल एक वर्षांचा कालावधी लागणार लाग असल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत. दरम्यान या नव्याने नियुक्त होऊ घातलेल्या तलाठ्यांची निवडणूक प्रक्रियेसाठी मदत घेता येईल ही शक्यताही आता मावळली आहे. यामुळे तलाठी परीक्षा दिलेले अनेक विद्यार्थी प्रतिक्षेत आहेत. राज्यात गेल्या वर्षी जूनमध्ये ४ हजार ४६६ तलाठी जागांसाठी तब्बल १० लाख ४१ हजार ७१३ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. या परीक्षेबाबत आलेल्या आक्षेपांवर कार्यवाही करून भूमी अभिलेख विभागाने यंदाच्या मार्चमध्ये या परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी तसेच निवड यादी जाहीर केली.

पेसाअंतर्गत असलेल्या १३ जिल्ह्यांमध्ये निवड प्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्याने थांबविण्यात आली होती. मात्र पेसा क्षेत्र गावनिहाय असल्याने केवळ अशाच गावांमधील ५७४ पदांची निवड प्रक्रिया स्थगित करून अन्य १ हजार ७१८ पदांसह सर्व ३६ जिल्ह्यांमधील ४ हजार २१९ पदांसाठी सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली.

 


 

बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेतील निवड झालेल्या ज्या उमेदवारांची जिल्हा निवड समितीकडून चारित्र्य, वैद्यकीय आणि कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली आहे, अशा सुमारे एक हजार उमेदवारांना आचारसंहिता लागण्यापूर्वी नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. उर्वरित उमेदवारांना आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत. तसेच या नवनियुक्त तलाठ्यांना निवडपणक कामकाजातळी महभागी करून घेतले जाणार आहे. तलाठी परीक्षेतील २३ जिल्ह्यांमधील उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षा यादी २३ जानेवारीला जाहीर करण्यात आली होती. निवड यादीतील ज्या उमेदवारांची वैद्यकीय, कागदपत्रे आणि चारित्र्य पडताळणी पूर्ण झाली आहे. अशा उमेदवारांना आचारसंहिता लागण्यापूर्वी नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. उर्वरित नियुक्ती पत्रे आचारसंहिता संपल्यानंतर दिली जातील. 

 

तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली होती. परीक्षा झाल्यानंतर प्रश्न-उत्तरांबाबत आक्षेप मागवण्यात आले आणि त्यांचे निराकरण करण्यात आले. ही सर्व पकिया केल्यानंतर तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. भरतीचा पुढील टप्पा म्हणून २३ जानेवारी रोजी राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम परभणी बीड लातर, जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि हिंगोली, अशा २३ जिल्ह्यांमधील निवड आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. १ फेब्रुवारीपासून निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी सुरू करण्यात आली. त्यानुसार आचारसंहिता लागण्यापूर्वी सुमारे एक हजार नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. उर्वरित पत्रे आचारसंहितेनंतर दिल्ली जाणार आहेत.

 


खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना मिळणार नियुक्तीपत्रे जिल्ह्यातील तलाठी संवर्गातील ११८ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. २४ जानेवारी रोजी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. निवड यादीतील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना पहिल्या टप्यात नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी सांगितले. काही उमेदवारांची चौकशी सुरू असल्याने त्यांचे नियुक्तपत्र देण्याचे थांबवण्यात ) आले आहे. तलाठी पदभरतीच्या निवड यादीतील उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत 5 आहे. ११८ जागांसाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्यात आली आहे. मात्र, अद्याप उमेदवारांना प्रशासनाकडून नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाही. 

 

तलाठी भरतीमधील निवड समितीच्या यादीत असलेल्या सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. राखीव जागेवरील उमेदवारांचे जात प्रमाणपत्र, तसेच जात पडताळणी प्रमाणपत्रांच्या तपासणीसाठी समाजकल्याण विभागास प्रशासनाकडून पत्र देण्यात आले आहे, तसेच उमेदवारांची चारित्र्य पडताळणी करण्यासाठी पोलिसांना पत्र देण्यात आले आहे, तसेच उमेदवारांच्या आरोग्य तपासणीच्या अहवालासह इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. कागदपत्रांची तपासणी पूर्ण झालेले आहे. बायोमॅट्रीक पडताळणीस अनुपस्थित राहिलेल्या काही उमेदवार इतर ठिकाणी रूजू आहेत.

 

कागदपत्रांची तपासणी सुरू
तलाठी भरतीमधील निवड समितीच्या यादीत असलेल्या सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. राखीव जागेवरील उमेदवारांचे जात प्रमाणपत्र, तसेच जात पडताळणी प्रमाणपत्रांच्या तपासणीसाठी समाजकल्याण विभागास प्रशासनाकडून पत्र देण्यात आले आहे, तसेच उमेदवारांची चारित्र्य पडताळणी करण्यासाठी पोलिसांना पत्र देण्यात आले आहे, तसेच उमेदवारांच्या आरोग्य तपासणीच्या अहवालासह इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.

 


 

परीक्षेतील २३ जिल्ल्यांमधील उमेदवारांची निवड व प्रतीक्षायादी २३ जानेवारीला रात्री उशिरा भूमी अभिलेख विभागाने जाहीर केली असून, चालू आठवड्यापर्यंत संबंधित उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात येणार आहे. मात्र, आदिवासीबहुल १३ जिल्ह्यांमधील निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यातील निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील आदेशानंतर करण्यात येणार आहे. त्यामुळे या १३ जिल्ह्यांमधील तलाठी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सुमारे दोन हजार उमेदवारांचे भवितव्य तूर्त अधांतरीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील २३ जिल्ह्यांतील उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय, कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी सुरू आहे. 

तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननी अंती ४४६६ जागांसाठी १० लाख ४९ हजार ७१३ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांकडून हरकती, आक्षेप मागविणे, त्यांचे निराकरण आदी प्रक्रिया पूर्ण करून तलाठी भरती परीक्षेची गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात आली आणि भरतीचा पुढील टप्पा म्हणून २३ जानेवारीला रात्री उशिरा राज्यातील २३ जिल्ल्यांमधील निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली.

या २३ जिल्ह्यांमधील निवड यादीत अराखीव, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अशा विविध प्रवर्गातील सुमारे २५२६ उमेदवार आहेत. या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी, कागदपत्रे पडताळणी, चारित्र्य पडताळणी आणि परीक्षेला जाताना उमेदवारांनी जो अंगठा यंत्रावर दिला आहे, निवड झालेल्या उमेदवाराचा आणखी एकदा अंगठा घेऊन परीक्षेला बसलेला आणि निवड झालेला उमेदवार तोच आहे किंवा कसे? आदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यापैकी पडताळणीत संबंधित उमेदवार गळाल्यास तातडीने प्रतीक्षा यादीतील उमेदवाराला निवड समिती पाचारण करत आहे. ही सर्व प्रक्रिया होऊन पुढील आठवड्यापासून नियुक्तीपत्रांचे वाटप करण्याचे नियोजन आहे.


मूळ ओळखपत्र (मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, ड्रायव्हिंग लायसन्स) पडताळणी वेळी सादर करावे. https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने भरलेल्या मूळ अर्जाची प्रत व परीक्षा शुल्क भरल्याचा पुरावा. दिव्यांग, खेळाडू, अनाथ, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन या समांतर आरक्षणाअंतर्गत अर्ज केलेल्यांनी विहित नमुन्यातील मूळ प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, चारित्र्य व पूर्वचारित्र्य पडताळणीसाठी सोबतच्या परिशिष्ट- क मध्ये जोडलेला साक्षांकन नमुना परिपूर्ण भरून (दोन प्रतीत) प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणीच्या वेळेस सादर करावा.

कोणत्याही आरक्षणाचा अथवा सोयी-सवलतीचा दावा करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित कायदा/ नियम/आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे. मागासवर्ग (अ.जा./अ.ज. वगळून) प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांनी त्यांचे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र काढण्यासाठी भरलेला सेतू कार्यालयातील अर्ज व सादर केलेली सर्व कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस दोन प्रतीत स-साक्षांकित करून सादर करावीत. पडताळणीस अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांना तलाठी भरती २०२३ मधील निवड प्रक्रियेकरिता दावा करता येणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समितीचे सचिव शिवकुमार स्वामी यांनी म्हटले आहे.

असे आहे वेळापत्रक

  • सोमवारी (ता. पाच) ११ वाजता : निवड यादीतील अराखीव (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातील उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी.
  • मंगळवारी (ता. सहा) : दुपारी एक वाजता निवड यादीतील इमाव, विमाप्र, भजड, भजकभजब, विजाअ, अज, अजा प्रवर्गातील उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासणी होईल.
  • बुधवारी (ता. सात) : सकाळी ११ वाजता प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवार तसेच तलाठी भरतीच्या अनुषंगाने निवड यादी व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी.
  • गुरुवार (ता. आठ) : सकाळी ११ वाजता निवड यादीमधील सर्व सामाजिक प्रवर्गांतील सर्व उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी.

 

२०२३ मध्ये तलाठी भरतीसाठी बीड जिल्ह्यातील केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. सदरील परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची ५ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत कागदपत्रांची पडताळणी तर होणारच आहे. शिवाय, पहिल्यांदाच बायोमेट्रिक तपासणी केली जाणार आहे. तलाठी परीक्षा देताना उमेदवाराने जो थंब केला होता, तोच थंब तपासणी दरम्यान मॅच होणे आवश्यक आहे. परीक्षा देणारा उमेदवार हाच आहे की नाही, यासाठी बायोमेट्रिक पद्धती अवलंबली जाणार आहे. 

महसूल विभागातील गट-क संवर्गातील तलाठी भरतीसाठी जुलै २०२३ या महिन्यात ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात आले होते. त्यानंतर १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत प्रत्येक दिवशी तीन सत्रांमध्ये परीक्षा घेतली गेली. तलाठ्याची परीक्षा घेण्यासाठी टीसीएस या कंपनीची नेमणूक करण्यात आली होती. टीसीएस कंपनीच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने तलाठी परीक्षा घेतली गेली. बीड शहरातील एक व अंबाजोगाई येथील दोन अशा एकूण तीन केंद्रांवर तलाठी परीक्षा घेतली गेली. त्यावेळी परीक्षा केंद्रावर ऑनलाइन परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांचे थंब घेतले होते. आधार कार्ड क्रमांकासोबत मॅच झाल्यानंतरच प्रत्येक उमेदवारास परीक्षेला बसू दिले होते. निकाल लागल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी तयार करून त्यांची कागदपत्रे व पहिल्यांदाच बायोमेट्रिक तपासणी केली जाणार आहे. बायोमेट्रिक तपासणीत उमेदवाराने परीक्षेवेळी दिलेला थंब व आताचा थंब मॅच होणे आवश्यक आहे. तसेच, डोळ्यांची बुबुळेसुद्धा तपासली जाणार आहेत.

मूळ कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक
५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता – निवड यादीतील अराखीव व ईडब्लूएस प्रवर्गातील उमेदवार
६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता – निवड यादीतील इ.मा.व. वि.मा.प्र., भ.ज.ड, भ.ज.क, भ.ज.ब, वि.जा.अ. अ.ज. अ.जा प्रवर्गातील उमेदवार
७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता- प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवार

 

कुठे पाहावी पात्र उमेदवार यादी?
तलाठी परीक्षेत पास झालेल्या व प्रतीक्षेतील पात्र उमेदवारांची यादी mahabhumi.gov.in beed.gov.in या संकेतस्थळावर २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
तलाठी परीक्षा दिलेले उमेदवार या दोन्ही वेबसाइट तपासू शकतात.

 

तलाठी भरती २०२३ च्या अनुषंगाने निवड यादी व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद पात्रतेनुसार मूळ कागदपत्रांसह व मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती दोन संचांसह जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयात वेळापत्रकानुसार हजर राहावे लागणार आहे.

 


 

Maharashtra Talathi Bharti 2024: Talathi Bharti PESA Update is Here. Supreme Court hearing was held on 10/11/2023 after which the date was not met even once..that means Talathi Bharti remaining districts’ results will be after 13th February now. 13 Pesa district results will depend on the court’s decision. Case May be listed on 13th February 2024. So it is expected that Talathi PESA Result will be Published after 13th Feb 2024.

 

तलाठी भरती Update PESA क्षेत्र सुप्रीम कोर्ट पुढील तारीख.. १०/११/२०२३ रोजी सुनावणी झाली त्यानंतर एकदा पण तारीख भेटली नाही.. म्हणजे तलाठी भरती राहिलेले जिल्हे निकाल आता 13 फेब्रुवारी च्या नंतर लागेल.  13 पेसा जिल्हा निकाल कोर्ट निकालावर अवलंबून असेल.

1】पुणे, 2】ठाणे, 3】पालघर, 4】अहिल्यानगर (अहमदनगर), 5】नाशिक, 6】जळगाव, 7】यवतमाळ, 8】अमरावती, 9】नंदुरबार, 10】गडचिरोली, 11】चंद्रपूर, 12】नांदेड, 13】धुळे

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी

Maharashtra Talathi Bharti 2024

 


Maharashtra Talathi Bharti 2024: The selection list and waiting list for 2 thousand 501 posts in 23 districts of Talathi cadre in revenue department across the state was announced on Tuesday (23). These posts have been filled through District Selection Committee, category wise maximum posts will be kept for unreserved i.e. open category 841 seats. While 525 seats of Other Backward Classes have been filled, said Sarita Narake, State Coordinator of Talathi Examination and In-charge Additional Jamabandi Commissioner.

खुल्या प्रवर्गासाठी ८४१, तर इतर मागासवर्गीयांच्या ५२५ जागा

राज्यभरातील महसूल विभागातील तलाठी संवर्गातील २३ जिल्ह्यांमधील २ हजार ५०१ पदांकरिता निवड यादी व प्रतीक्षा यादी मंगळवारी (दि. २३) जाहीर करण्यात आली. ही पदे जिल्हा निवड समितीमार्फत भरण्यात आली असून, प्रवर्गनिहाय सर्वांत जास्त पदे अराखीव अर्थात खुल्या प्रवर्गासाठी ८४१ जागा ठेवण्यात येणार आहेत. तर इतर मागासवर्गीयांच्या ५२५ जागा भरण्यात आल्या आहेत, अशी माहिती तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक तथा प्रभारी अतिरिक्त जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांनी दिली.

राज्यात तलाठी संवर्गातील ४ हजार ६४४ पदे भरण्यासाठी जून २०२३ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर सुधारित मागणीपत्रानुसार पदांची संख्या ४ हजार ७९३ इतकी करण्यात आली. या परीक्षेला राज्यातून १० लाख ४१ हजार जणांनी अर्ज केले.त्यांपैकी ८ लाख ६४ हजार ९६० जणांनी १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत ५७ सत्रांमधून ऑनलाइन परीक्षा दिली. मात्र, पेसा क्षेत्रातील अर्थात आदिवासीबहुल क्षेत्रातील जिल्ह्यांमधील पदभरतीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने राज्यातील १३ जिल्ह्यांमधील पदांबाबत निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

उर्वरित २३ जिल्ह्यांसाठी ६ जानेवारीला प्रथम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यात प्रवर्गनिहाय २ हजार ५०१ पदांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक ८४१ पदे अराखीव अर्थात खुल्या प्रवर्गासाठी देण्यात आली आहेत.

प्रवर्गनिहाय पदांची संख्या

  1. अनुसुचित जाती – ३२२
  2. अनुसुचित जमाती – १८३
  3. विमुक्त जाती (अ) – ८०
  4. भटक्या जमाती (ब) – ७३
  5. भटक्या जमाती (क) – ९४
  6. भटक्या जमाती (ड) – ५७
  7. विशेष मागास प्रवर्ग – ४८
  8. इतर मागासवर्ग – ५२५
  9. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक – २६८
  10. अराखीव ८४१
  11. एकूण २५०१

तलाठी भरती २०२३ मध्ये नॉर्मलायझेशन सुत्र काय आहे? समजून घ्या!

सदर परीक्षा TCS कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आली असून जेव्हा जेव्हा मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी परीक्षा देत असतात व त्यामुळे सत्र संख्या अधिक असते त्या त्या वेळेला सामान्यीकरण प्रक्रिया करणे भाग पडते. कारण वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या सत्रात घेतलेल्या प्रश्नांची काठिण्य पातळी विचारात घेता उमेदवारांवर अन्याय न करता सर्व उमेदवारांना एकच मोजमाप लावणेसाठीची हि वैज्ञानिक प्रक्रिया आहे. गुण सामान्यीकरणची ही कार्यपद्धती सर्व प्रकारच्या मोठ्या परीक्षांमध्ये जसे की रेल्वे भरती बोर्ड, एस एस सी, म्हाडा इत्यादी मध्ये नोकर भरतीसाठी यापूर्वी वापरण्यात आली आहे.(Latest Marathi News)

 

TCS तर्फे देण्यात आलेले पूर्ण स्पष्टीकरण

 


तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पुरावे सादर करावेत, ते मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल, अशी भूमिका घेतली. 

देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पुण्यातील नवीन भाजप कार्यालयाला भेट दिली. त्यांनी कार्यालयाची पाहणी केल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. तलाठी भरतीत राज्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याबाबत विचारणा केली असता फडणवीस म्हणाले की, तलाठी भरती परीक्षा ही राज्यात अतिशय पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली. या परीक्षेत कोणताही गैरव्यवहार झाल्याचा पुरावा कोणीही दिल्यास त्याची चौकशी केली जाईल. पुरावे योग्य असल्यास चौकशी करून ही परीक्षा रद्द केली जाईल आणि दोषींवर कारवाईही केली जाईल.

 

तलाठी भरतीचा निकाल जाहीर झाला, सर्व सरळ PDF येथे चेक करा! 

तलाठी भरती २०२३ परीक्षा याबाबत यापुर्वी प्रसिध्द केलेल्या आक्षेप / हरकतीच्या अनुषंगाने घेणेत आलेल्या प्रसिध्दीपत्रकात खालीलप्रमाणे सुधारणा करणेत येत आहे. TCS कंपनीकडे सदर आक्षेप व हरकतींच्या अनुषंगाने जी निवेदने प्राप्त झाली होती, त्या निवेदनांचा अभ्यास करुन TCS कंपनीकडून यापुर्वीच्या प्रसिध्द केलेल्या १४६ प्रश्नांमधील ५ प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करणेत आले आहे. तसेच दोन प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विदयार्थ्यांना देण्याचा निर्णय घेणेत आलेला आहे. यानुसार उमेदवारांच्या लॉगिन खात्यात योग्य ती सुधारित माहिती देणेत येत आहे.

 

 

नवीन उत्तरतालिका बघा


Talathi Bharti 2023 : The state government has decided to provide reservation to local candidates belonging to the reservation category of Scheduled Tribes (ST) in government jobs in notified villages in the state. A petition has been filed in the Supreme Court against this decision. What decision should be taken on talathi recruitment in tribal districts of the state till the court’s verdict comes? That’s the question the land records department is asking. At present, the process of resolving the objections and objections raised by the candidates who have appeared for the Talathi recruitment exam is underway. Therefore, the department has taken a stand to stop this.


Maharashtra Talathi Bharti 2023: The recruitment process for about 4,600 talathi posts was recently implemented in the state. However, after the order given by the Supreme Court, recruitment of Talathi posts was done on compassionate grounds in the state. So the number of posts decreased. However, the Land Records Department had requested the state government to increase the number of posts so that the number of vacancies does not remain zero in any district. Accordingly, about 149 vacancies have increased in the state. To get all the further updates regarding this recruitment follow MahaBharti.in

राज्यात नुकतीच सुमारे चार हजार सहाशे तलाठी पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात अनुकंपा तत्वावर तलाठी पदांची भरती करण्यात आली. त्यामुळे पदांची संख्या कमी झाली. मात्र, कोणत्याही जिल्ह्यात रिक्त पदांची संख्या शून्य राहू नये, यासाठी भूमी अभिलेख विभागाने राज्य सरकारकडे पदाची संख्या वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्यात सुमारे १४९ रिक्त पदे वाढली आहेत. 

राज्य सरकारने तलाठी भरती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भूमी अभिलेख विभागाने ४६४४ रिक्त पदांसाठी जाहिरात काढली होती. वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये या पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने अनुकंपा तत्त्वावर तलाठी पदांची भरती करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. त्यानुसार राज्य सरकारने ही पदे भरली. परिणामी, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये परीक्षा घेतलेल्या तलाठ्यांची पदे कमी झाली होती. त्यामुळे तेथील परीक्षार्थीवर अन्याय होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
ही पदे कमी झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात कोणत्याही संवर्गासाठी रिक्त पदांची संख्या शून्य राहू नये, यासाठी पदांची संख्या वाढवून मिळावी, असा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाने राज्य सरकारकडे दिला होता. त्यानुसार राज्य सरकारने १४९ पदे वाढवून देण्यास परवानगी दिली. त्यानुसार राज्यात आता ४ हजार ७९३ पदे भरण्यात येणार आहेत. परीक्षा झालेल्या उमेदवारांमधूनच ही निवड करण्यात येणार आहे. मात्र, राज्यात नेमकी किती पदे अनुकंपा तत्त्वावर भरण्यात आली, याची माहिती मिळू शकली नाही.

प्रवर्गनिहाय संख्या

  • सर्वसाधारण १६७६
  • महिला १४७३
  • खेळाडू २१६
  • माजी सैनिक ७०५
  • प्रकल्पग्रस्त २१३
  • भूकंपग्रस्त ६३
  • पवीधर अंशकालीन ४४७

जिल्हानिहाय पदांची संख्या

अकोला 48
अमरावती 78
कोल्हापूर 56
गहत्चिरोली 140
गांदिया 717
चंद्रपूर 151
जळगाव 249
जालना 122
ठाणे 81
धाराशिव 110
धुळे 205
नंदुरबार 54
नगर 255
नांदेड 135
नागपूर 186
नाशिक 274
परभणी 15
पालघर 243
पुणे 3855
बीड 913
बुलढाणा 53
भंडारा 67
मुंबई उपनगर 41
मुंबई शहर 17
यवतमाळ 142
रत्नागिरी 210
रायगड 220
लातूर 55
वर्धा 84
वाशिम 26
संभाजीनगर 154
सांगली 110
सातारा 156
सिंधुदुर्ग 145
सोलापूर 200
हिंगोली 76

तलाठी भरती २०२३ महत्वाच्या लिंक्स : 


 Direct Service Recruitment of Talathi (Group-C) Cadre in Maharashtra State Revenue Department was published on 45/2023 on 26/06/2023. A total of 10,41,713 applications have been received for the said examination. Some candidates have been depositing examination fees two or more times while submitting online application forms. 23,379 candidates have been refunded the examination fee out of the candidates who have deposited the examination fee twice. However, as the name of 1,219 candidates and the name on the bank account were mismatched, their duplicate examination fees could not be refunded to the candidates so far. However, the list of candidates who want to refund the double examination fee is attached herewith and the candidates in the list should immediately submit the following details to the e-mail id talathi.recruitment2023@gmail.com.


Protests, demonstrations and bandhs by Maratha organisations have shaken the atmosphere in the state. However, the Land Records Department has announced that the Talathi recruitment examination will not be postponed or cancelled under any circumstances. The final or third phase of the exam is currently underway. Eleven and a half lakh candidates from across the state had applied for the Talathi recruitment exam. A record number of applications of 10,40,713 were received for 4,466 seats after scrutiny. The exam was scheduled to be conducted in three phases and in three sessions a day. The first phase was held from August 17 to 22, the second phase from August 26 to September 2 and the third phase from September 4. The exam cannot be postponed or cancelled for any reason, the land records said.

 

Maharashtra Talathi Bharti 2023 – Revenue Department, Talathi Bharti 2023 recruitment advertisement for 4 thousand 644 posts in 36 districts under six divisions of the state has been published today (23 June) on the mahabhumi website of the government Talathi Bharti. Online application forms will start from 26 June 2023. Also, remember that the 18 July 2023 will be the last date to fill the form. There is an atmosphere of happiness among the candidates as the official advertisement is released on Mahabhulekh website by state government. We will continue to publish further information on Mahabharti about cdn3.digialm.com talathi bharti.

राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील ४ हजार ६४४ पदांच्या भरती जाहिरात 23 June रोजी  शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. तलाठी भरतीचे ऑनलाईन अर्ज २६ जून २०२३ पासून सुरु होणार आहेत. तसेच  १८ २५ जुलै २०२३ ही फाॅर्म भरायची शेवटची तारीख आहे. अधिकृत जाहिरात महाभूलेख द्वारे प्रसिद्ध झाल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  पुढील माहिती आणि ऑनलाईन अर्जाची लिंक आम्ही महाभरती वर प्रकाशित करू. 

Talathi Bharti 2023 – Maharashtra Talathi Recruitment 2023 Notification PDF, Eligibility, Important Dates, Online Apply Link @www.mahabhumi.gov.in

या पदभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. साधारण गटासाठी एक हजार तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क असेल. तर खुल्या गटासाठी वयोमर्यादा ही ३८ असून राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४३ असणार आहे. २ तासाच्या परीक्षेत (Exam) मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बैधिक (गणित) असा २०० गुणांचा पेपर असणार आहे.या भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेत पदवी त्याच बरोबर माध्यमिक शालांत परीक्षेत हिंदी व मराठी विषय असणं बंधनकारक असणार आहे. महसूल विभागांतर्गत राज्यभरात तलाठी (गट- क) संवर्गातील ४ हजार ६४४ पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.  सदर ऑनलाइन परीक्षा टीसीएस या खासगी एजन्सीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

महसूल विभागाद्वारे आज नवीन शुद्धिपत्रक (दि ११ जुलै २०२३) प्रकाशित करण्यात आहे आहे. त्यानुसार  तलाठी भरती २०२३ चा सदर अर्ज भरताना अर्जदाराने संपुर्ण जाहिरात व सविस्तर सुचना व्यवस्थितपणे वाचून, समजून अर्जाबाबतची माहिती काळजीपुर्वक व अचुक भरणे अपेक्षित आहे. तसेच अर्जदाराने अर्जाबाबत भरलेली माहिती त्याने शुल्क भरुन अर्ज अंतिमरित्या सादर करेपर्यंत दुरूस्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, परंतु, अर्जदाराने शुल्क भरल्यानंतर  (Final Submit) केल्यानंतर त्याला अर्जामध्ये कोणतीही दुरूस्ती करता येणार नाही. त्याबाबत संकेतस्थळावर तसेच जाहिरातीमध्ये नमुद केलेले आहे. तेव्हा उमेदवारांनी शुल्क भरण्याआधी अर्ज काळजीपूर्वक पुन्हा पडताळून बघावा, कारण एकदा आपण शुल्क भरल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही.

  • पदाचे नाव तलाठी 
  • पद संख्या – ४६४४ जागा
  • शैक्षणिक पात्रता –पदवीधर  (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा –  १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
  • परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. १०००/-  – राखीव वर्ग : ९००/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (लिंक २६ जून पासून सुरु होईल)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८  २५ जुलै २०२३ 
  • अधिकृत वेबसाईट – https://mahabhumi.gov.in

Talathi Bharti 2023 Apply Online

पदाचे नाव पद संख्या 
तलाठी  ४,६४४ पदे

 

District Wise Talathi Post Details 2023 | Talathi Bharti Advertisement – District Wise:

महाराष्ट्र राज्य सरकार मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, या जिल्ह्यांमध्ये तलाठ्यासाठी फ्रेशर्सची भरती करणार आहे.

जिल्हा  पद संख्या  जिल्हा  पद संख्या
अहमदनगर 250 Posts नागपूर 177 Posts
अकोला 41 Posts नांदेड 119 Posts
अमरावती 56 Posts नंदुरबार 54 Posts
औरंगाबाद 161 Posts नाशिक 268 Posts
बीड 187 Posts उस्मानाबाद 110 Posts
भंडारा 67 Posts परभणी 105 Posts
बुलढाणा 49 Posts पुणे 383 Posts
चंद्रपूर 167 Posts रायगड 241 Posts
धुळे 205 Posts रत्नागिरी 185 Posts
गडचिरोली 158 Posts सांगली 98 Posts
गोंदिया 60 Posts सातारा 153 Posts
हिंगोली 76 Posts सिंधुदुर्ग 143 Posts
जालना 118 Posts सोलापूर 197 Posts
जळगाव 208 Posts ठाणे 65 Posts
कोल्हापूर 56 Posts वर्धा 78 Posts
लातूर 63 Posts वाशिम 19 Posts
मुंबई उपनगर 43 Posts यवतमाळ 123 Posts
मुंबई शहर 19 Posts पालघर 142 Posts

Educational Qualification For Talathi Bharti 2023 

For the recruitment of total 4344 posts in Talathi (Group-C) cadre under Revenue Department of Government of Maharashtra, an online examination (Computer Based Test) will be conducted by Commissioner and Director of Land Records (Maharashtra State), Pune Office at various centers in 36 districts across the state.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तलाठी
(महसूल विभाग)
जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी दि. २६/०६/२०२३ रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.

  • महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांचेकडील दि. १ जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
  • शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस-२०१२ /प्र.क्र२७७/३९, दि. ४/२/२०१३ मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण- २०००/प्र.क्र६१/२००१/३९, दि. १९/३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
    ७. २ माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता :-
  • पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस. एस. सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन
  • आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करु शकतात.

Talathi Bharti 2023 नवीन Important Dates 

तलाठी भरती २०२३ महत्वाच्या लिंक्स : 

अधिकृत जाहिरात पहा

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Talathi Bharti 2023

???? PDF जाहिरात https://t.co/eP1DAsbyiW
???? ऑनलाईन अर्ज करा ऑनलाईन अर्ज (cdn3.digialm.com ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु झाली )
✅ अधिकृत वेबसाईट
https://mahabhumi.gov.in/
✅ पेसा क्षेत्रातील यादी  https://t.co/AyhIOk6vvr

 

Maharashtra Talathi Bharti 2023 – District Wise 

पुणे जिल्ह्यात 386 तलाठी पदांची भरती!! पदवीधरांना मिळणार संधी 
नाशिक जिल्ह्यात 204 तलाठी पदांची भरती!!
धुळे तलाठी भरती 2022 – 194 पदांची भरती 
नंदुरबार जिल्ह्यात “तलाठी” पदांची भरती
जळगाव जिल्ह्यात “तलाठी” पदाच्या 170 रिक्त जागा भरणार 
अहमदनगर तलाठी भरती 2022 – 236 पदे भरणार
सातारा जिल्ह्यात “89” तलाठी पदांची भरती!!
सोलापूर जिल्हा अंतर्गत तलाठी पदाची नवीन भरती; ‘130’ पदे 
कोल्हापूर जिल्ह्यात तलाठी पदांची भरती!! पदवीधरांना मिळणार संधी
सांगली जिल्ह्यात 61 पदांची भरती सुरु; जाणून घ्या संपूर्ण माहिती!!
अमरावती जिल्हा अंतर्गत तलाठी भरती जाहीर
अकोला जिल्ह्यात “तलाठी” पदाच्या रिक्त जागा; नवीन भरती!
यवतमाळ जिल्ह्यात ’63’ तलाठी पदांची नवीन भरती!! 
वाशिम जिल्ह्यात “तलाठी” पदांची भरती!! पदवीधरांना मिळणार संधी 
बुलढाणा जिल्ह्यात 12 तलाठी पदांची नवीन भरती जाहीर!!
नागपूर जिल्हा अंतर्गत ‘110’ तलाठी पदांची भरती!!
वर्धा जिल्ह्यात 58 पदांची तलाठी भरती लवकरच सुरु
भंडारा जिल्हा अंतर्गत तलाठी पदाची नवीन भरती जाहीर
गोंदिया जिल्ह्यात 57 पदांची तलाठी भरती लवकरच सुरु!!
चंद्रपूर जिल्ह्यात 134 तलाठी पदांची भरती!!
गडचिरोली जिल्हा अंतर्गत तलाठी पदांची नवीन भरती
औरंगाबाद जिल्ह्यात 136 तलाठी पदांची महाभरती
जालना जिल्ह्यात 93 पदांची भरती
परभणी तलाठी भरती 2022 – 89 पदांची भरती 
हिंगोली तलाठी भरती 2022 – 71 पदे
नांदेड जिल्ह्यात ‘तलाठी’च्या 98 पदांची भरती
लातूर जिल्ह्यात तलाठी पदांची भरती – 46 पदे
बीड जिल्ह्यात 161 तलाठी पदांची भरती
उस्मानाबाद जिल्ह्यात 110 पदांची महाभरती
मुंबई शहर विभागात तलाठी पदांची भरती
मुंबई उपनगर तलाठी भरती – 34 पदे 
ठाणे जिल्ह्यात 82 तलाठी पदांची भरती
पालघर जिल्ह्यात 102 तलाठी पदांची भरती
रायगड जिल्ह्यात 162 तलाठी पदांची भरती
रत्नागिरी जिल्ह्यात 121 तलाठी पदांची बंपर भरती
 सिंधुदुर्ग जिल्ह्यात 117 तलाठी पदांची महाभरती

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

166 Comments
  1. चेतना दिपक भावसार says

    पेसा क्षेत्रातील यादी 13 तारखे नंतर लागणार होती तर यादी कधी पर्यन्त लागेल आजची तारीख 16 आली अजून किती दिवस तरी मग ??

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड