Pavitra Portal Shikshak Bharti 2026
जालना जिल्ह्यातील काशीविश्वेश्वर शिक्षण प्रसा-रक मंडळामार्फत पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या शिक्षक भरतीच्या जाहिरातीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. संस्थेचे मूळ विश्वस्त रमेश बालाजी मुळे यांनी या जाहिरातीला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित शिक्षक भरतीची जाहिरात संस्थेच्या अधिकृत विश्वस्तामार्फत प्रसिद्ध करण्यात आल्याचे दर्शविण्यात आले होते. मात्र, जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्या संबंधित व्यक्तींचा संस्थेशी अधिकृत संबंध नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या प्रकरणी याचिकाकर्त्यांनी शिक्षण अधिकारी (माध्यमिक), जालना यांच्याकडे तक्र ार दाखल केली होती. मात्र, तक्रारीनंतरही अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. ए. पी. गुंगे पाटील आणि अॅड. वैभव तुकाराम पाटील आमले यांनी बाजू मांडली. त्यांनी मांडलेल्या कायदेशीर बाबी आणि उपलब्ध परिस्थितीचा विचार करून खंडपीठाने पवित्र पोर्टलवरील सदर शिक्षक भरतीच्या जाहिरातीला स्थगिती दिली. तसेच संबंधित प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले आहेत. या प्रकरणात अॅड. नवनाथ पाटील सिंनगारे आणि अॅड. सचिन गजवार यांनी मोलाचे सहकार्य केले.
Pavitra Portal Shikshak Bharti 2026:पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत सोलापूर जिल्हा परिषदेला मोठे शिक्षकबळ मिळाले आहे. एकूण ५०० पदांपैकी ३४९ प्राथमिक शिक्षक, तर जिल्हा परिषदेच्या माढा हायस्कूलसाठी ८ माध्यमिक शिक्षक, अशा एकूण ३५७ शिक्षकांची नियुक्ती होणार आहे.
पवित्र पोर्टलमार्फत निवड झालेल्या ३५७ शिक्षकांच्या पदस्थापनेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. येत्या दोन दिवसांत या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून रिक्त पदांचा अहवाल प्राप्त होताच समुपदेशनाच्या माध्यमातून नव्या शिक्षकांना लवकरच पदस्थापना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आता महत्त्वाचा ठरणार असून, मराठी माध्यमातील रिक्त पदांसह कन्नड आणि उर्दू माध्यमातील शिक्षकांच्या जागा भरण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेने मराठी माध्यमासाठी ५०० शिक्षकांची मागणी केली होती. मात्र, कन्नड व उर्दू माध्यमाचे रोस्टर अपूर्ण असल्याने पहिल्या टप्प्यात या दोन्ही माध्यमांतील प्राथमिक शिक्षकांची भरती झाली नाही. सध्या दोन्ही माध्यमांच्या रोस्टरचे काम अंतिम टप्प्यात असल्याने मराठी माध्यमातील उर्वरित जागांसह कन्नड व उर्दू माध्यमातील शिक्षकांची पदे पवित्र पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्यात भरली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, खासगी प्राथमिक शाळांमधील ८० शिक्षक अतिरिक्त ठरले असून, त्यांचे सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये मराठी माध्यमाचे ६६, कन्नड माध्यमाचे ८ आणि उर्दू माध्यमाच्या ६ शिक्षकांचा समावेश आहे.

Pavitra Portal Shikshak Bharti 2026:शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो उमेदवारांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रियेला आता वेग आला असून, ‘पवित्र’ संकेतस्थळाच्या माध्यमातून मुलाखतीसह होणाऱ्या भरतीतील तब्बल १० हजार ३२८ रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या शिफारसीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या भरतीचा पहिला टप्पा सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन असून, त्यानंतर ऑक्टोबरपासून भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या टप्प्यात सुमारे पाच हजार नवीन पदे उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला आता ठोस वेळापत्रकाची चौकट मिळाली असून, मुलाखतीसह निवड प्रक्रिया अवघ्या ४५ दिवसांत पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार या कालावधीत पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी पाचारण करण्यापासून ते प्रत्येक उमेदवाराला तीन ठिकाणी मुलाखतीची संधी देणे, निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे आणि नियुक्तीनंतर रुजू न झालेल्यांच्या रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नियुक्ती करणे, अशा विविध टप्प्यांतून संपूर्ण भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
शिक्षक भरतीच्या प्रक्रियेत मोठी प्रगती झाली असली, तरी काही प्रवर्गांतील पदे अद्याप रिक्तच राहिली आहेत. मुलाखतीशिवाय होणाऱ्या भरतीतील एकूण १९ हजार ७५४ पदांपैकी आतापर्यंत १३ हजार ११९ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. या भरतीत जिल्हा परिषद, महापालिका, आदिवासी विकास विभाग तसेच खासगी शाळांमधील पदांचा समावेश होता. मात्र, माजी सैनिक आणि अंशकालीन या समांतर आरक्षणातील अनुक्रमे २ हजार ७६० आणि १ हजार ७६० जागांसाठी पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने ही पदे अद्याप रिक्त आहेत.
रिक्त पदांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात होणार
पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच शिक्षक पदांच्या दुसऱ्या टप्प्याची तयारीही शिक्षण विभागाने सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात बिंदूनामावली पूर्ण न झालेल्या खासगी अनुदानित शाळांमधील रिक्त पदांना आता दुसऱ्या टप्प्यात संधी मिळणार आहे. यासोबतच कनिष्ठ महाविद्यालये, काही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खासगी अनुदानित शाळांमधील उर्वरित रिक्त पदेही या टप्प्यात भरली जाणार असल्याने शिक्षक भरतीचा आवाका आणखी वाढणार आहे.

Pavitra Portal Shikshak Bharti 2026: मित्रांनो, पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रियेबाबत एक नवीन अपडेट आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शाळा आणि खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक भरती प्रक्रियेतील निवड यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे. पवित्र पोर्टलद्वारे पार पडलेल्या या भरती प्रक्रियेत विविध व्यवस्थापनांच्या एकूण १९ हजार ७५४ पदांपैकी १३ हजार १२९ उमेदवारांची विविध पदांसाठी शिफारस करण्यात आली आहे. पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात आलेल्या मुलाखतीशिवाय निवड प्रकाराची गुणवत्ता यादी गुरुवारी सायंकाळी सात वाजता प्रसिद्ध करण्यात आली. तसेच उर्वरित रिक्त पदांसाठी लवकरच ‘कन्व्हर्जन राउंड’ (समांतर आरक्षण रूपांतरण फेरी) राबविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत शाळा व्यवस्थापनांनी दिलेल्या जाहिरातीनुसार ३० हजार २०९ पदांसाठी प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम नोंदवून घेण्यात आले होते.
शिक्षण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुण – शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ मधील गुणांच्या आधारे ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली. ही ऑनलाइन चाचणी २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती. स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका नगरपरिषद, १३०६, आदिवासी विकास विभाग, शासकीय विद्यानिकेतन, खासगी अनुदानित शाळांमध्ये मुलाखतीविना निवड या प्रकारासाठी एकूण १९ हजार ७५४ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी १३ हजार ११९ जागांवर उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी ७,५४१, सहावी ते आठवीच्या वर्गासाठी ४,२०७, नववी ते दहावी या वर्गासाठी १,११९, अकरावी ते बारावी या वर्गासाठी २५२ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
आरक्षित रिक्त पदांसाठी ‘कन्व्हर्टेड राउंड’
- समांतर आरक्षणातील पात्र १ उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे माजी सैनिक प्रवर्गातील २ हजार ७६० आणि अंशकालीन प्रवर्गातील १ हजार ७६० पदे रिक्त राहिली आहेत.
- अनुसूचित जमाती प्रवर्गातील ८०२ ॐ तसेच पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गाची १ हजार ४०८ पदेही रिक्त राहिली आहेत. ही पदे भरण्यासाठी पुढील टप्प्यात ‘कन्व्हर्टेड राउंड’ घेण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या निकालाभोवती गोंधळाचे आणि गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, हजारो उमेदवारांच्या शिक्षक भरती प्रक्रियेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सध्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक पदावर नियुक्त्या दिल्या जात असताना, निकाल प्रक्रियेतील कथित अनियमिततेची चौकशी पूर्ण होईपर्यंत भरतीच्या याद्या जाहीर करू नयेत, अशी जोरदार मागणी परीक्षार्थींकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया नेमकी कशी होणार, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या निकाल प्रक्रियेवरून उमेदवारांच्या शंकांना आता अधिक गंभीर स्वरूप आले आहे. निकालातील कथित अनियमिततेबाबत परीक्षार्थींनी परीक्षा परिषदेकडे मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार केला; मात्र त्यावर अपेक्षित सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचा त्यांचा आरोप आहे. उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, परीक्षेची गुणयादी परीक्षा घेणाऱ्या संस्थेच्या नियमित फॉर्मेटमध्ये नसून स्वाक्षरीविना पीडीएफ स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यावर ‘रुपेश पालकर’ हे ऑथर नाव नमूद आहे. विशेष म्हणजे, याच कालावधीत परीक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. महेश पालकर कार्यरत होते, याकडेही परीक्षार्थींनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे निकालाच्या गुणप्रक्रियेत बाह्य हस्तक्षेप किंवा अनधिकृत फेरफार झाला आहे का, याबाबत चौकशीची मागणी अधिक तीव्र झाली आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या निकालातील कथित अनियमिततेवरून उमेदवारांच्या शंकांना आता अधिक गंभीर वळण मिळाले आहे. कोकरुड (ता. शिराळा) येथील परीक्षार्थी विलास नांगरे यांनी या संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, २०२२ आणि २०२५ या दोन्ही परीक्षांमध्ये असंख्य उमेदवारांना अगदी समान गुण मिळणे हा केवळ योगायोग नसून गुण निश्चिती प्रक्रियेतील गैरप्रकाराचा संशय निर्माण करणारा मुद्दा आहे. याशिवाय निकालाच्या यादीत अनेक उमेदवारांची नावे चुकीची नोंदविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. दिव्यांग उमेदवारांसोबत परीक्षेला उपस्थित असलेल्या लेखनिकांची माहिती निकालासोबत प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. तसेच उत्तरपत्रिकेसाठी उमेदवारांकडून अनधिकृतपणे ५०० रुपये शुल्क आकारण्यात आले, मात्र उत्तरसूची देण्यास नकार देण्यात आला, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारितील सरकारी आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरतीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पेसा तसेच नॉन-पेसा क्षेत्रातील रिक्त शिक्षक पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून वर्ग-तीन संवर्गातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) पदांची नियुक्ती केली जाणार आहे. या भरतीअंतर्गत तब्बल २,४२१ रिक्त पदे भरण्यात येणार असल्याने पात्र उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची आणि रोजगाराची सुवर्णसंधी ठरणार आहे.
आदिवासी विकास विभागाच्या नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर या चारही विभागांतील सरकारी आश्रमशाळांमध्ये २,४२१ शिक्षक पदांची मेगा भरती सुरू झाली आहे. यामध्ये नाशिक विभागात सर्वाधिक ८२६ पदे, त्यानंतर ठाणे ६१३, नागपूर ५१४ आणि अमरावती विभागात ४६८ पदे भरण्यात येणार आहेत. प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) अशा विविध पदांचा या भरतीत समावेश असून, मराठी व इंग्रजी माध्यमासह मराठी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांतील उमेदवारांना संधी मिळणार आहे.
विशेष म्हणजे, या भरतीमध्ये पेसा क्षेत्रातील ८८५ तर नॉन-पेसा क्षेत्रातील १,५३६ पदे उपलब्ध आहेत. स्थानिक तसेच आदिवासी क्षेत्रातील पात्र उमेदवारांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी पेसा आणि नॉन-पेसा क्षेत्रांचे स्वतंत्र विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारी आश्रमशाळांमध्ये शिक्षक म्हणून करिअर करण्याची इच्छा असलेल्या पात्र उमेदवारांसाठी ही भरती एक मोठी रोजगाराची संधी आणि महत्त्वाची सुवर्णसंधी ठरणार आहे.

पवित्र पोर्टल द्वारे राज्याला नवी शिक मिळणार आहे. या मुले हजारो उमेदवारांना रोजगार मिळणार आहेत. महाराष्ट्रातील या नवीन बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीच्या प्रक्रियेने अखेर आता वेग घेतला आहे. राज्यातील तब्बल दीड लाख उमेदवारांनी रिक्त जागांचे प्राधान्यक्रम पवित्र पोर्टलवर ‘लॉक’ केले आहेत. त्यातून ३१ हजारांपेक्षा अधिक नवे शिक्षक लवकरच रुजू होण्याची शक्यता आहे. मात्र उपलब्ध जागा आणि त्या ‘लॉक’ करणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण पाहता ओबीसी आणि भटक्या जमातींच्या उमेदवारांमध्ये रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत. रिक्त पदांच्या ८० टक्के प्रमाणात शिक्षक भरती करण्यासाठी राज्य शासनाने हिरवी झेंडी दाखवली आहे. त्यानुसार २०२५ च्या ‘टेट’ परीक्षेतील उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरून घेण्यात आले आहेत. त्यात १ लाख ७० हजार उमेदवारांपैकी जवळपास दीड लाख उमेदवारांनी सहभाग घेतल्याची आकडेवारी पोर्टलवरच प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या आकडेवारीनुसार, ‘मुलाखतीशिवाय’ भरल्या जाणाऱ्या जागांचे तब्बल १ लाख ४६ हजार ६५० प्राधान्यक्रम उमेदवारांनी ‘लॉक’ केले आहेत. तर ‘मुलाखतीनंतर’ भरल्या जाणाऱ्या जागांचेही तब्बल १ लाख ३१ हजार ५०५ प्राधान्यक्रम भरण्यात आले आहेत. पुढच्या टप्प्यात उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मुलाखतीशिवाय भरल्या जाणाऱ्या शिक्षक पदाकरिता ‘एकास एक’ अशी शिफारस होणार आहे. तर मुलाखतीसह भरल्या जाणाऱ्या पदासाठी ‘एकास तीन’ या प्रमाणात उमेदवारांची पोर्टलद्वारे शिफारस केली जाणार आहे.
अभियांत्रिकी (Engineering) आणि बीसीए (BCA) पदवीधारक उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात धाव घेतली आहे; कारण पात्र असूनही, प्रणालीद्वारे त्यांच्यासाठी ‘प्राधान्यक्रम याद्या’ (preference lists) तयार करण्यात आल्या नाहीत. या घडामोडीमुळे शिक्षक भरती प्रक्रियेला स्थगिती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पात्र उमेदवारांसाठी त्वरित प्राधान्यक्रम याद्या तयार कराव्यात आणि त्यांना भरती प्रक्रियेत समाविष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
B.E., B.Ed., CTET आणि TET यांसारखी पात्रता असूनही, पात्र अभियांत्रिकी पदवीधरांना त्यांच्या पसंतीक्रम याद्या (preference lists) तयार करता आल्या नाहीत; कारण ‘पवित्र’ (Pavitra) भरती प्रणालीमध्ये अभियांत्रिकी पदवीच्या विषयाचा समावेश करण्यात आलेला नव्हता. २०२२ पासून आजवर राबवण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेदरम्यान गणित विषय शिकवण्याची संधी नाकारल्यामुळे, पात्र अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (MSCERT) १५ डिसेंबर २०२३ रोजी शिफारस केली होती की, हे विद्यार्थी गणित विषयासाठी पात्र आहेत. या याचिकेत मागील भरती प्रक्रियेतील अशा घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे, जिथे कागदपत्र पडताळणी दरम्यान पात्र अभियांत्रिकी उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आले होते. परिणामी, या पात्र उमेदवारांना संधी नाकारली गेल्यामुळे प्रशासनाला ताकीद देण्यात आली आहे.
पुढील सुनावणी २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. BCA पदवी ही BCS आणि BSc-IT पदवींच्या समकक्ष मानली जाते; तरीही, गणित आणि विज्ञान विषयांच्या संदर्भात BCA पदवीधारकांना संधी नाकारण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. याच मुद्द्यावरून औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत जून २०२४ मध्ये निर्णय घेण्यासाठी हे प्रकरण NCTE कडे पाठवण्यात आले होते, परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. कोल्हापूर सर्किट बेंचने पुढील सुनावणी सप्टेंबरसाठी निश्चित केली आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये याचिकाकर्त्यांची बाजू ॲडव्होकेट आदित्य रत्नकाडे मांडत आहेत.

Pavitra Portal Shikshak Bharti 2026: राज्यातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पवित्र पोर्टलद्वारे तब्बल ३० हजार २०२ शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, शासकीय विद्यालये तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील रिक्त पदे या भरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. उमेदवारांना पवित्र पोर्टलवर उपलब्ध पदांसाठी आपला पसंतीक्रम लॉक करण्याची अंतिम मुदत १६ ऑगस्ट २०२६ पर्यंत देण्यात आली आहे. त्यानंतर मुलाखतीशिवाय भरल्या जाणाऱ्या पदांची गुणवत्ता यादी जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
Pavitra Portal Preference Selection Date has been extended till 16th August 2026. Candidates can check https://mahateacherrecruitment.org.in/ website regularly.
शालेय शिक्षण भरती पद्धतीबाबत ओरड झाल्याने शासनाने पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीचा नवा पायंडा पाडला. ही नव्याने लागू भरती पद्धत पारदर्शी असल्याचा दावा शासन करते. सर्व अर्जधारकांसाठी एक महत्वाचा अपडेट समोर आला आहे. पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती 2025 चे पसंतीक्रम जनरेट व लाॅक करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आपण लॉगिन करून हि स्टेप पूर्ण करावी. यासाठी प्राधान्यक्रम लाॅक करण्यासाठी कालावधी- 06/08/2026 ते 16/08/2026 पर्यंत दिलेला आहे. या संदर्भातील माहिती आपण खालील परिपत्रकात बघू शकता .

शुध्दीपत्रकातील प्रमुख तरतुदी
इयत्ता १ ली ते ५ वी, ६ वी ते ८ वी आणि ९ वी ते १० वी या गटांमधील सेमी इंग्रजी वर्गांसाठी शिक्षक उपलब्ध करताना उमेदवाराची व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमासह संबंधित शाळांचे माध्यम (जसे की मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड इत्यादी) विचारात घेतले जाईल. उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे, अथवा शालांत परीक्षेत जे माध्यम द्वितीय भाषा म्हणून उत्तीर्ण केले आहे, त्याच माध्यमांच्या शाळांसाठी त्यांची उमेदवारी विचारात घेतली जाईल. इयत्ता १ ली ते ५ वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयांकरीता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अट निश्चित करण्यात आली आहे. मात्र संबंधित सामाजिक प्रवर्गासाठी असे इंग्रजी व्यावसायिक अर्हताधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील. नव्याने दिल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केलेली नाही परंतु ज्यांच्याकडे १२ वी विज्ञान (HSC Science) किंवा बी.ए./एम.ए. (इंग्रजी) अथवा बी.एस्सी./एम.एस्सी. अशी शैक्षणिक अर्हता आहे अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या या सुधारित निर्णयामुळे सेमी इंग्रजी शाळांमध्ये अर्हताधारक शिक्षकांची टंचाई दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच इंग्रजी विषय किंवा विज्ञान शाखेची पार्श्वभूमी असलेल्या अनेक बेरोजगार डी.एल.एड. व बी.एड. धारक उमेदवारांना शिक्षक भरतीत संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शालेय शिक्षण विभागाने काढलेले हे पत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर डिजिटल स्वाक्षरीसह उपलब्ध करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शिक्षक भरती प्रक्रिया अधिक स्पष्ट, पारदर्शक व व्यापक होण्यास मदत होणार असल्याचे मत शिक्षक संघटना व्यक्त करीत आहे.
टीईटी-२०२५च्या गुणांवर भरती
यंदाची शिक्षक भरती प्रक्रिया टीईटी-२०२५च्या गुणांच्या आधारे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे टीईटी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या पात्र उमेदवारांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. शिक्षण विभागाने उमेदवारांना पवित्र पोर्टलवर लॉगिन करून उपलब्ध पदांचा तपशील पाहण्याचे आणि पात्रतेनुसार योग्य पदांना पसंतीक्रम देण्याचे आवाहन केले आहे.
कुठे किती पदे?
| संस्था / विभाग | उपलब्ध पदे |
|---|---|
| जिल्हा परिषदांच्या शाळा | १३,३५२ |
| महानगरपालिकांच्या शाळा | १,९४५ |
| नगर परिषदांमधील शाळा | २८० |
| आदिवासी विकास विभाग | २,४२३ |
| शासकीय विद्यालयांमधील | ५६ |
| खासगी शैक्षणिक संस्था | १२,१४६ |
| एकूण | ३०,२०२ |
पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या ३०,२०२ पदांचे संस्थानिहाय चित्र पुढीलप्रमाणे आहे:
या भरतीमध्ये खासगी शैक्षणिक संस्थांमधील पदांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे सरकारी तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
उमेदवारांनी काय करावे?
शिक्षण विभागाकडून उमेदवारांना पवित्र पोर्टलवर लॉगिन करून प्रथम प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यानंतर उपलब्ध पदांमधून आपल्या पात्रतेनुसार आणि पसंतीनुसार पदांचा क्रम निश्चित करावा लागणार आहे.
पसंतीक्रम निश्चित केल्यानंतर तो अंतिम करण्यासाठी ‘लॉक’ करणे आवश्यक आहे. १६ ऑगस्टनंतर पसंतीक्रम लॉक करण्याची संधी उपलब्ध राहणार नसल्याने उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पदभरतीची पुढील प्रक्रिया काय?
पसंतीक्रम लॉक झाल्यानंतर संबंधित पदांसाठी गुणवत्ता आणि पात्रतेनुसार पुढील नियुक्ती प्रक्रिया राबविली जाणार आहे. मुलाखतीशिवाय भरल्या जाणाऱ्या पदांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून त्यानुसार नियुक्तीची प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे. तसेच मुलाखतीसह भरल्या जाणाऱ्या पदांसाठी संबंधित व्यवस्थापन आणि शाळांमार्फत पुढील प्रक्रिया पार पडणार आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या पदांची संख्या सर्वाधिक
या भरतीमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या पदांचे प्रमाण मोठे असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी सर्वाधिक पदे उपलब्ध आहेत. त्यानंतर सहावी ते आठवी, नववी-दहावी आणि अकरावी-बारावीच्या स्तरावरील पदांचा समावेश आहे. यामुळे प्राथमिक शिक्षक पदासाठी पात्र असलेल्या टीईटी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही भरती विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
अडचणी असल्यास ई-मेलवर संपर्क
पवित्र पोर्टलवरील प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना काही अडचण किंवा समस्या असल्यास शिक्षण विभागाने दिलेल्या edupavitra25@gmail.com या ई-मेलवर आपली समस्या कळविण्याचे आवाहन केले आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाचे मुद्दे
एकूण पदे: ३०,२०२
भरतीचे माध्यम: पवित्र पोर्टल
आधार: टीईटी-२०२५चे गुण
पसंतीक्रम लॉक करण्याची अंतिम मुदत: १६ ऑगस्ट २०२६
भरतीमध्ये समावेश: जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद, आदिवासी विकास विभाग, शासकीय विद्यालये आणि खासगी शैक्षणिक संस्था
समस्यांसाठी ई-मेल: edupavitra25@gmail.com
टीईटी-२०२५च्या गुणांवर आधारित या मोठ्या शिक्षक भरतीमुळे राज्यातील हजारो पात्र उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी पवित्र पोर्टलवरील आपली माहिती तपासून पात्र पदांना योग्य पसंतीक्रम देणे आणि अंतिम मुदतीपूर्वी तो लॉक करणे महत्त्वाचे आहे.
राज्यातील बहुप्रतिक्षित शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलवर संस्थांना जाहिरात नोंदवण्यासाठी दिलेल्या २१ जुलैच्या मुदतीनंतर आता लाखो अभियोग्यताधारकांचे लक्ष पुढील वेळापत्रकाकडे लागले आहे. १ लाख ७० हजारांहून अधिक स्वप्रमाणित उमेदवारांना आता संस्थानिहाय रिक्त जागांचे तपशील आणि प्राधान्यक्रम नोंदवण्याच्या तारखांची उत्सुकता आहे. शिक्षण विभागाकडून लवकरच यासंबंधीचा आढावा घेऊन पुढील वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. राज्यातील शिक्षक पदभरतीकडे पात्रताधारकांचे लक्ष लागले आहे. पवित्र पोर्टलवर जाहिरात नोंदविण्यास शिक्षण विभागाने पुन्हा एक दिवसांची २१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. यानंतर दीड लाखांहून अधिक पात्रताधारकांचे आता संस्थानिहाय रिक्त जागा, प्राधान्यक्रम नोंदणीच्या वेळापत्रकाकडे लक्ष लागले आहे.
राज्यात पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे. शिक्षण विभागाने एक मेपासून संस्थांकडून जाहिराती पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू केली. विभागाकडून २१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु अद्याप ही प्रक्रिया अपूर्ण आहे. जाहिरातीसाठी मुदत देऊनही अनेक संस्थांच्या जाहिराती अपलोड झालेल्या नसल्याचे सांगण्यात येते. मंगळवारपर्यंत जाहिरातींची नोंदीचा आढावा घेऊन शिक्षण विभाग रिक्त जागांची स्थिती, पुढील वेळापत्रक जाहीर करील असे सांगण्यात येते. नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी पदभरतीची प्रक्रिया होईल, असे सांगण्यात येत होते, तसे झाले नाही. पात्रताधारकांचे प्रक्रियेतील पुढील वेळापत्रकाकडे लक्ष लागले आहे. शिक्षक पदभरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांना पवित्र प्रणालीवर जाऊन ‘स्व-प्रमाणपत्र’ भरणे आवश्यक असते. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत पात्र ठरलेल्यांपैकी सुमारे एक लाख ७० हजार स्वप्रमाणित अर्ज केलेले उमेदवार आहेत.
राज्य सरकारच्या ‘पवित्र पोर्टल’च्या संथ कारभारामुळे मुंबई महापालिका शाळांमधील सुमारे 1,200 शिक्षकांची भरती गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. नियमानुसार शिक्षकांची भरती केवळ या सर्वसमावेशक पोर्टलद्वारेच करणे बंधनकारक असल्याने महापालिकेचे हात बांधले गेले आहेत. पालिकेने आपला प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला असला तरी तिथून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे पालिका शाळांमधील लाखो विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिक्षक भरती रखडल्याने पालिकेने ‘तासिका मानधन’ (घडय़ाळी तास) तत्त्वावर खाजगी शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती केली आहे. मात्र या कंत्राटी शिक्षकांमध्येही तीव्र असंतोष पसरला आहे. तासाला केवळ 150 इतके तुटपुंजे मानधन मिळत असल्याने ‘महागाईच्या काळात या दरात शिकवणे कसे परवडणार?’ असा संतप्त सवाल हे शिक्षक उपस्थित करत आहेत. यावर पर्याय म्हणून ‘महापालिकेने मानधन वाढीचा प्रस्ताव तयार केला आहे, त्यानुसार शिक्षकांना दिले जाणारे मानधन वाढवण्यात येईल,’ अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. मात्र हा प्रस्ताव कधी अमलात येणार आणि मानधनात नेमकी किती वाढ होणार, याबाबत काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही. पवित्र पोर्टलद्वारे नियमित भरती प्रक्रिया सुरू झाल्यास सध्या काम करत असलेल्या या कंत्राटी शिक्षकांचे काय करायचे, असा मोठा पेच पालिकेसमोर आहे. ‘‘आम्हाला 1,200 शिक्षकांची भरती तातडीने करायची आहे, पण पवित्र पोर्टलमुळे आमचे हात अडकले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. तसेच लवकरच राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत,’’ अशी माहिती महापालिका शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी दिली. पोर्टलच्या प्रक्रियेला वेळ लागणार असेल, तर महापालिकेला स्वतःच्या स्तरावर भरती करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही शिक्षण मंत्र्यांकडे करणार असल्याचे शिरवडकर यांनी सांगितले.
नाशिक महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरती केली जाणार असून, यासाठी महापालिका शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टलवर जाहिरात दाखल करण्यात आली आहे. एकूण ४४ शिक्षकांची या अंतर्गत भरती केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी सांगितले.
महपाालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये २०१९ पासून संचमान्यता तसेच बिंदूनामावलीचे काम रखडले होते. यंदा हे काम पूर्ण करीत महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. या शाळांमधील शिक्षक भरतीसाठी नुकतीच पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यात आली आहे. या माध्यमातून माध्यमिकच्या मराठी माध्यम शाळांमध्ये १९, उर्दू माध्यम शाळांमध्ये १० शिक्षकांची भरती केली जाणार असून, प्राथमिक विभागाच्या हिंदी माध्यम शाळांमध्ये १५ विद्यार्थ्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण शाळांचा सर्वागीण विकास उज्वल भविष्यासाठी शिक्षकांची भरती केली जाणार आहे. अशाप्रकारे या भरतीद्वारे महापालिकेच्या शाळांना ४४ नवीन शिक्षक मिळणार आहेत. महापालिकेच्या शहरात एकूण शंभर शाळा असून, त्यामध्ये ८०४ शिक्षक कार्यरत आहेत. गेल्या वर्षी या शाळांमध्ये जवळपास २९ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यंदा ३० जूनपर्यंत पटनोंदणी अभियान राबविले जाणार असून, त्यानंतर यंदाची विद्यार्थीसंख्या निश्चित होणार आहे.
प्राथमिक शाळांमध्ये चाळीस पदांची वाढ
यंदा महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांमध्ये ४० पदे वाढली असून, ती सुद्धा भरली जाणर आहे. बी. टी. पाटील महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी असताना त्यांनी नियमबाह्य पद्धतीने आंतरजिल्हा बदलीने ५२ शिक्षक भरल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या शिक्षकांचा खटका सध्या न्यायालयात सुरू आहे. या खटल्याचा निकाल संबंधित शिक्षकांच्या बाजूने लागल्यास, त्यांना या पदावर नियुक्ती दिली जाणार आहे. न्यायालयीन निकाल त्यांच्याविरोधात गेल्यास पुढील वर्षी या पदांच्या भरतीसाठी पुढील वर्षी पवित्र पोर्टलवर जाहिरात दिली जाणार आहे.

Pavitra Portal Shikshak Bharti 2026 Update
राज्यातील शिक्षक आणि शिक्षणसेवक पदभरती प्रक्रियेला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘पवित्र’ पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिरात नोंदणीची मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढवली आहे. या संदर्भातील अधिकृत पत्र १५ जून २०२६ रोजी जारी करण्यात आले असून, यामुळे खासगी, अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व्यवस्थापनांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १ मे २०२६ पासून पवित्र पोर्टलवर जाहिरात नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली होती. सुरुवातीला ३१ मे २०२६ ही अंतिम मुदत होती, नंतर ती १५ जूनपर्यंत वाढवण्यात आली. मात्र, अनेक शाळा व्यवस्थापनांकडून बिंदुनामावली (रोस्टर) तपासणी, संच मान्यता आणि इतर प्रक्रिया पूर्ण करण्यात विलंब होत असल्याने मुदतवाढीची मागणी जोर धरत होती. महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्य अध्यक्ष भरत रसाळे यांसारख्या संघटनांनी प्रधान सचिव आणि शिक्षण आयुक्तांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, आता ३० जून ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
अनेक शाळांमध्ये संचमान्यता प्रक्रिया, बिंदुनामावली तपासणी आणि रिक्त पदांची नोंदणी अपूर्ण राहिली होती. यामुळे पोर्टलवर अपेक्षित जाहिराती अपलोड होत नव्हत्या. शासनाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा विचार करून आणि २०२६-२७ या नवीन शैक्षणिक वर्षात रिक्त पदे भरण्यासाठी ही मुदतवाढ दिली आहे. अंदाजे ८ हजार ते १३ हजाराहून अधिक जागा पोर्टलवर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे TAIT २०२५/२०२४ उत्तीर्ण उमेदवारांना याचा फायदा होणार आहे.
शिक्षण आयुक्तालयाने सर्व विभागीय आणि जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले आहेत की, बिंदुनामावली तपासणी १०० टक्के पूर्ण करून घ्यावी. या निर्णयामुळे रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्यास मदत होईल आणि गुणवत्तापूर्ण शिक्षकांची नियुक्ती पारदर्शक पद्धतीने होईल. शाळा व्यवस्थापनांनी तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
Pavitra Portal Shikshak Bharti 2026 Update
राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेसाठी ‘पवित्र’ प्रणालीवर जाहिराती नोंदविण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आली असून, बहुतांश व्यवस्थापनांची बिंदुनामावली तपासणी अद्याप अपूर्ण असल्याने जाहिराती नोंदविण्याची प्रक्रिया रखडली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक भरतीच्या जाहिराती संकेतस्थळावर नोंदविण्यासाठी १५ जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
राज्यातील शिक्षक पदभरतीची कार्यवाही राज्यस्तरावरून ‘पवित्र प्रणाली’च्या माध्यमातून राबविण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीची शिक्षक भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने ही मुदतवाढ दिली आहे. अनेक शाळा व्यवस्थापनांकडून बिंदुनामावलीची तपासणी पूर्ण न झाल्यामुळे रिक्त पदांच्या जाहिराती अद्याप संकेतस्थळावर नोंदविण्यात आलेल्या नाहीत, असे निदर्शनास आले आहे.
शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शिक्षक भरती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी सर्व व्यवस्थापनांनी तातडीने बिंदुनामावलीची तपासणी पूर्ण करून ‘पवित्र’ संकेतस्थळावर जाहिराती नोंदविणे आवश्यक आहे. अधिकाधिक व्यवस्थापनांची प्रक्रिया पूर्ण व्हावी आणि भरती प्रक्रिया वेळेत मार्गी लागावी, यासाठी दि. १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुदतवाढीमुळे शाळा व्यवस्थापनांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि बिंदुनामावली तपासणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे. त्यामुळे आगामी शिक्षक भरती प्रक्रिया अधिक वेगाने राबविण्यास मदत होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
Pavitra Portal Shikshak Bharti 2026 Update
दरम्यान, मुदतवाढीमुळे शाळा व्यवस्थापनांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि बिदुनामावली तपासणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे. त्यामुळे आगामी शिक्षक भरती प्रक्रिया अधिक वेगाने राबविण्यास मदत होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. शिक्षक भरती २०२५ अंतर्गत रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी ३१ मे पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. मात्र राज्यातील अनेक संस्थांमध्ये आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे पवित्र पोर्टलवर रिक्त जागा अपलोड करण्यासाठी किमान ३० दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शिक्षक भरतीस इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून होत आहे. ”पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या रिक्त पदाच्या ८० टक्के जागा भरण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार शिक्षक भरतीच्या पोर्टलवर रिक्त पदांची माहिती नोंदविण्यासाठी ३१ मे पर्यंत अंतिम मुदत आहे. असे असतानाच मोजक्याच आस्थापनांनी जाहिराती नोंदविल्याचे दिसून येते. याशिवाय, इयत्ता अकरावी आणि बारावीकरिता अद्याप संचमान्यता झालेली नसल्याने त्या जागा पोर्टलवर येणार नाहीत. त्यामुळे सर्व इयत्तांच्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील रिक्त जागा पोर्टलवर नोंदविण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी उमेदवारांकडून होत आहे. ”
इयत्ता अकरावी आणि बारावीच्या संचमान्यतेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी, बिंदूनामावली पडताळणी, संचमान्यता आणि कर्मचारी विषयक प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याबाबत संबंधित यंत्रणांना आदेश देण्यात यावेत. पदवीधर पदोन्नती, केंद्रप्रमुख भरती रिक्त होणारी पदे, विस्तार अधिकारी पदोन्नती याची कार्यवाही लवकर करण्याचे आदेश द्यावेत, १५ जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रिक्त जागांचा भरती प्रक्रियेत समावेश करण्यात यावा. राज्यातील एकही पात्र रिक्त जागा भरती प्रक्रियेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, अशा मागण्या युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेच्या वतीने राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.
राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक टंचाई दूर करण्यासाठी राज्य सरकारने ‘पवित्र पोर्टल’वरील भरती प्रक्रियेला वेग दिला आहे. येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना नवे शिक्षक मिळावेत, या उद्देशाने शिक्षण विभागाने १ ते ३१ मे दरम्यान शाळांच्या व्यवस्थापनांना रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याचे कडक आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे गेल्या वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेल्या अभियोग्यता धारकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी पार पडलेल्या ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ (TAIT) परीक्षेसाठी एकूण २,२८,००० उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २,११,३०८ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. पोर्टलवर आतापर्यंत १,७०,१०८ स्व-प्रमाणपत्रे उमेदवारांनी आपली (Self-certified) पूर्ण केली असून, केवळ हेच उमेदवार या भरती प्रक्रियेत पात्र ठरणार आहेत.
या भरती प्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ सध्याची रिक्त पदेच नव्हे, तर मे २०२६ पर्यंत सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणारी संभाव्य पदेही गृहीत धरली जाणार आहेत. इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या सर्व गटांतील पदांसाठी ही जाहिरात प्रक्रिया असेल. मात्र, कोणत्याही संस्थेला जाहिरात देण्यापूर्वी आपली ‘बिंदूनामावली’ (Roaster) मागासवर्गीय कक्षाकडून प्रमाणित करून घेणे अनिवार्य आहे. विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या मान्यतेनंतरच या जाहिराती पोर्टलवर झळकतील. प्रशासनाची पावले आणि पारदर्शकता पोर्टलवरील ही प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत असल्याने मानवी हस्तक्षेप कमी होईल आणि गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवड होईल. पेसा (PESA) क्षेत्रातील रखडलेली भरती आणि स्थानिक रोजगाराचा प्रश्नही या प्रक्रियेमुळे मार्गी लागण्याची शक्यता आहे.
शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो ‘टीईटी’ पात्र उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण सुधारणा करत उमेदवारांना शाळा निवडीसाठी अधिक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे शिक्षकांमध्ये नवा विश्वास निर्माण झाला आहे.
राज्य सरकारकडून २ एप्रिल रोजी जारी केलेल्या शुद्धिपत्रकानुसार उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक संधी दिली आहे. यापूर्वी उमेदवारांना जास्तीत जास्त ५० प्राधान्यक्रम निवडता येत होते. आता नव्या बदलानुसार उमेदवारांना १०० शाळा निवडण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे इच्छित शाळा निवडण्याचे पर्याय वाढून नियुक्तीची शक्यता अधिक वाढणार आहे. पवित्र पोर्टलवर संस्थांकडून रिक्त जागांची माहिती भरल्यानंतर ‘टीईटी’ पात्र उमेदवारांची यादी अपलोड केली जाते. त्यानंतर उमेदवारांकडून पसंतीक्रम दिले जातात. मात्र, भरती प्रक्रियेचा वेग संथ असल्याची टीका होत आहे. मागील भरतीत शासनाने २५ हजार जागा भरण्याचा दावा केला, तरी प्रत्यक्षात दहा हजार जागा भरल्या गेल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर पोर्टलमध्ये सुधारणा झाल्याने काही तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. तरीही सर्व रिक्त पदे भरली जाणार का? याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
Pavitra Portal Shikshak Bharti 2026
राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती आणण्यासाठी पवित्र पोर्टलवर नवी कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार उच्चस्तरीय समिती या प्रक्रियेवर देखरेख ठेवणार आहे, तसेच पोर्टलशिवाय संस्था स्तरावर भरतीला मान्यता देण्यात येणार नाही. शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार शिक्षक भरती अधिक सुटसुटीत, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी पवित्र पोर्टलमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हास्तरीय व विभागीय पातळीवर समित्या स्थापन करून शिक्षकांच्या सेवा माहितीची अचूक पडताळणी केली जाणार आहे. यामुळे चुकीची नोंद कमी होण्यास मदत होणार आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
न्यायालयाच्या सूचनेनुसार राज्यस्तरीय नोडल अधिकारी आणि शिक्षण संचालकांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया राबवली जाणार आहे. शिक्षकांच्या सेवाविषयक माहितीमध्ये बदल, नाव समाविष्ट करणे किंवा वगळणे, तसेच अन्य तांत्रिक बाबींचे निर्णय संबंधित समित्यांच्या शिफारसीनुसार घेतले जातील. पवित्र पोर्टलवरील माहिती अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. यामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढून उमेदवारांचा विश्वास अधिक दृढ होईल. शासनाने या नव्या कार्यपद्धतीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
महत्त्वाचे मुद्दे कोणते ?
- नवीन समित्यांद्वारे भरती प्रक्रियेवर काटेकोर नियंत्रण, पवित्र पोर्टलवर सेवा माहिती अद्ययावत अनिवार्य करण्यात येणार आहे.
- न्यायालय आदेशानुसार उच्चस्तरीय देखरेख यंत्रणा लागू करण्यात आली आहे. तसेच तक्रारी कमी करण्यासाठी पारदर्शकता वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.
- भरती प्रक्रियेत संचमान्यतेनुसार रिक्त जागांची संख्या आणि बिंदुनामावली अद्ययावत करून अधिकाऱ्यांनी खात्री करावी लागणार आहे.
- पात्र ठरलेल्या उमेदवारांचे नियुक्ती आदेश दिलेल्या मुदतीत जारी होणार असून त्याची पोर्टलवर नोंद सक्तीची करण्यात आली आहे.
- शिक्षण उपसंचालकांसह, शैक्षणिक संस्था, शिक्षणाधिकारी यांच्याकडून परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना कामकाज अहवाल पाठवणे अत्यावश्यक करण्यात आले असल्याचे अधिकऱ्यांनी सांगितले.
भावी शिक्षकांनो, बातमी समोर आली आहे, शिक्षक भरती-TAIT साठी उमेदवारांची नोंदणी पवित्र पोर्टलवर सुरू झाली आहे. या संर्भातील पूर्ण माहीत आम्ही खाली दिलेली आहे. तसेच अधिक माहितीसाठी https://tait2025.mahateacherrecruitment.org.in या वेबसाइटला आपण बघू शकता.

उमेदवारांसाठी सूचना
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी उमेदवारांकडून स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत.
- १. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ ही दिनांक २७/०५/२०२५ ते दिनांक ३०/५/२०२५ आणि ०२/०६/२०२५ ते ०५/०६/२०२५ या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीस २,२८,८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती.
- २. सदर चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली आहे.
- ३. उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र करताना आवश्यक असणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
- ४. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ परीक्षा केवळ एक वेळ देण्याची तरतूद आहे. उमेदवारांना चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र वितरित करताना चाचणीसाठी एकापेक्षा अनेक प्रवेशपत्र प्राप्त झाल्यास केवळ एकाच प्रवेश पत्राद्वारे चाचणीस प्रविष्ट होण्याबाबत सूचित करण्यात आले होते. असे एकापेक्षा जास्त वेळा चाचणीस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर सहभागी करून घेता येणार नाही. त्यामुळे अशा उमेदवारांनी निवडप्रक्रियेत सहभागी होऊ नये, सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द होईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- ५. उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक १५/१२/२०२५ ते दिनांक २९/१२/२०२५ पर्यंत मुदत देण्यात येत आहे.
- ६. TET/CTET मध्ये तफावत येत असलेल्या उमेदवारांना त्यांचे लॉगीनवर Request for Change in Data या मेनूअंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे.
Published On : 15-Dec-2025 |
Published On : 15-Dec-2025 |
Published On : 15-Dec-2025 |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















