संगणक परिचालकांसमोर रोजगाराचा प्रश्न, कंपनीचे कंत्राट संपले; निर्माण झाला पेच
Gram Panchayat Computer Operator
ग्रामपंचायतींमध्ये कंत्राटी पद्धतीने भरती झालेल्या २० हजार संगणक परिचालकांच्या नोकरीवर गदा आली आहे. ‘सीएससी-एसपीव्ही’ कंपनीचे कंत्राट संपले आहे. नवीन ठेकेदार कंपनी नेमली नसल्याने त्यांच्यावर हे संकट ओढवले आहे. नव्या संस्थेत जुन्या संगणक परिचालक यांना संधी मिळेल का, हा आता एक यक्षप्रश्न आहे. केंद्र डिजिटायझेशनच्या सरकारच्या धोरणाला अनुसरून राज्य सरकारने २०११ मध्ये ‘ई-पंचायत प्रणाली’ सुरू केली. ग्रामीण भागातील नागरिकांना सर्व सरकारी योजना व विविध सेवांचा लाभ हा थेट संगणकाद्वारे देण्याची योजना आखली.
त्यासाठी सरकारने ‘सीएससी-एसपीव्ही’ या संस्थेच्या माध्यमातून तब्बल २० हजार युवकांना संगणक परिचालक म्हणून कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केले होते. मात्र ‘सीएससी-एसपीव्ही’चे कंत्राट ३० जून २०२४ रोजी संपुष्टात आले. २० हजार संगणक परिचालकांची सेवाही १ जुलैपासून संपुष्टात आली आहे. मात्र अद्यापही नव्या संस्थेची नियुक्ती केलेली नाही. नवीन खासगी संस्थेद्वारे नियुक्ती न करता परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कायमस्वरूपी ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून सेवेत समाविष्ट करण्याची मागणी परिचालकांनी केली आहे. त्यासाठी १६ ऑगस्टपासून राज्यातील ग्रामपंचायती बंद ठेवण्यात येतील. मागण्या मान्य न झाल्यास आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिला.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Comments are closed.