राज्य सरकारचा नवीन निर्णय, निवृत्तीनंतरही अधिकारी पुन्हा सेवेत? – Government Jobs for Retired Persons

Government Jobs for Retired Persons – मंत्रालयासह अनेक शासकीय ठिकाणी कंत्राटी भरतीला प्राधान्य देणाऱ्या राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनाही कंत्राटी पद्धतीने पुन्हा सेवेत घेता येणार आहे. वयाच्या ६५ महाराष्ट्र व्या वर्षांपर्यंत या अधिकाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने काम करता येणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाला कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी मात्र विरोध केला आहे. अशा अधिकाऱ्यांची निवड करताना मर्जीतल्या अधिकाऱ्यांनाच संधी दिली जाईल, भेदभाव होण्याची शक्यता असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. राज्यातील बहुतांश खात्यातील जागा कायमस्वरूपी न भरता त्या कंत्राटी पद्धतीने भरण्याला राज्य सरकारने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नव्याने भरतीच झाली शासन नसल्याचे दिसून येते. सध्या राज्यात शासकीय निवृत्तीचे वय ५८ वर्षे आहे. त्यामुळे करार पद्धतीने अशा अधिकाऱ्यांना आणखी सात बर्षे सेवेत राहता येणार आहे. मात्र, जर राज्य सरकार ६५ वर्षापर्यंत करार पद्धतीने कामावरती घेत असेल तर निवृत्तीचे वय ६० वर्षे का करत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Government Jobs for Retired Persons

राज्यात सध्या शासकीय कर्मचाऱ्याच्या निवृत्तीचे वय ५८ वर्षे इतके आहे. ते वाढवून ६० वर्षे करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. या आधी निवृत्तीचे वय हे ६० वर्षेच होते. पण नंतर ते कमी करून ५८ इतके करण्यात आले. आता निवृत्तीचे वय पुन्हा ६० वर्षे करावे, अशी मागणी कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी केली आहे.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड