कंत्राटी शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी! – Give Priority to Locals in Contractual Teacher Recruitment!
Give Priority to Locals in Contractual Teacher Recruitment!
जिल्हा परिषद पालघर अंतर्गत होणाऱ्या कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेत जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना नियुक्ती न देता स्थानिक शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी २०२२ पात्र उमेदवारांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी स्थानिक उमेदवारांनी केली आहे.
या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. शासनाने १२ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या आदेशानुसार, नियमित शिक्षकांची पदभरती होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी २०२२ पात्र, परंतु टीईटी/सीटीईटी अपात्र स्थानिक उमेदवारांनाही संधी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
स्थानिक उमेदवारांना संधी न दिल्यास बुधवारी (ता. ५) सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद पालघर येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. तसेच, या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीस संपूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल, असेही आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.
या मागणीस अनेक स्थानिक उमेदवारांचा पाठिंबा असून, हसमूख कनू दुबळा, बिपीन लालू तुंबडे, मगन रमता भोये यांसह अनेक उमेदवारांनी या आंदोलनासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. स्थानिकांना प्राधान्य न दिल्यास पुढील संघर्ष तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.