कंत्राटी शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी! – Give Priority to Locals in Contractual Teacher Recruitment!
Give Priority to Locals in Contractual Teacher Recruitment!
जिल्हा परिषद पालघर अंतर्गत होणाऱ्या कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेत जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना नियुक्ती न देता स्थानिक शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी २०२२ पात्र उमेदवारांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी स्थानिक उमेदवारांनी केली आहे.
या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. शासनाने १२ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या आदेशानुसार, नियमित शिक्षकांची पदभरती होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी २०२२ पात्र, परंतु टीईटी/सीटीईटी अपात्र स्थानिक उमेदवारांनाही संधी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
स्थानिक उमेदवारांना संधी न दिल्यास बुधवारी (ता. ५) सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद पालघर येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. तसेच, या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीस संपूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल, असेही आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.
या मागणीस अनेक स्थानिक उमेदवारांचा पाठिंबा असून, हसमूख कनू दुबळा, बिपीन लालू तुंबडे, मगन रमता भोये यांसह अनेक उमेदवारांनी या आंदोलनासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. स्थानिकांना प्राधान्य न दिल्यास पुढील संघर्ष तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.