शिक्षण विभागाने स्पष्ट सूचना दिली आहे की, शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलवर चुकीची, अपूर्ण किंवा बनावट माहिती दिल्यास, तसेच कागदपत्र पडताळणी दरम्यान गैरप्रकार आढळल्यास उमेदवार कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरणार आहे आणि योग्य ती शिक्षा होणार आहे.

शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात उमेदवारांना पवित्र पोर्टलवरून प्राधान्यक्रम नोंदवण्याची संधी दिली आहे. २ मेपर्यंत उमेदवार “मुलाखतीसह” व “मुलाखतीशिवाय” अशा दोन्ही प्रकारांसाठी प्राधान्यक्रम नोंदवू शकतात. दोन्ही पर्याय निवडल्यास, स्वतंत्रपणे प्राधान्यक्रम निश्चित करून ते अंतिम करणं बंधनकारक आहे. अन्यथा, निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराचा विचार केला जाणार नाही.
तीन वेळा मिळणार सुधारण्याची संधी
उमेदवारांनी स्वतःची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता पाहूनच योग्य प्राधान्यक्रम निवडावा. अंतिम प्राधान्यक्रमात चूक झाल्यास उमेदवार शिफारशीसाठी अपात्र ठरू शकतो. अंतिम प्राधान्यक्रमात बदल करायचा असल्यास, उमेदवारांना दिलेल्या मुदतीत ती सुधारणा जास्तीत जास्त तीन वेळा करता येणार आहे.
केवळ पात्र उमेदवारांनाच प्रवेश
या प्रक्रियेत फक्त स्व-प्रमाणपत्र पूर्ण, दुरुस्त आणि प्रमाणित केलेल्या उमेदवारांनाच सहभागी होता येणार आहे. रिक्त जागा, इयत्ता गट, विषय, आरक्षण आणि चाचणी गुण लक्षात घेऊन ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















