महिला दिनी लाडकी बहिण योजनेचा फसवणुकीचा धक्का! – Shock to Women on Women’s Day!
Shock to Women on Women's Day!
गेल्या महिनाभरापासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांच्या एकत्रित हप्त्याची (₹३०००) प्रतीक्षा करणाऱ्या महिलांना सरकारकडून धक्का बसला आहे. अनेकांना अपेक्षित रकमेसाठी वाट पाहावी लागत असताना, काही महिलांच्या बँक खात्यात केवळ ₹५०० जमा करून राज्य सरकारने जागतिक महिला दिनी महिलांची थट्टा केल्याची भावना व्यक्त होत आहे.
जुलै २०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ लागू केली. योजनेनुसार, आधार लिंक बँक खात्यात दरमहा ₹१५०० जमा करण्याची घोषणा करण्यात आली होती. प्रारंभी ही रक्कम नियमितपणे जमा होत होती.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
निवडणुकीपूर्वी विरोधकांनी या योजनेवर टीका करत सरकारने महिलांना फसवले असल्याचा आरोप केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीदरम्यान सत्तेवर आल्यास ही रक्कम ₹२१०० करण्यात येईल, असे आश्वासन सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आले होते. सत्ता स्थापन होऊन चार महिने उलटूनही वाढीव हप्ता मिळालेला नाही. त्यातच फेब्रुवारीचा हप्ता विलंबाने येणार असल्याची चर्चा सुरू होती.
महिला दिनी फसवणूक?
सोशल मीडियावर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे एकत्र ₹३००० जमा होतील, अशी माहिती महिलांमध्ये चर्चेत होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही या योजनेवर चर्चा झाली होती. मात्र, महिला दिनाच्या निमित्ताने मोठी रक्कम जमा होईल, या अपेक्षेने असलेल्या महिलांच्या खात्यात केवळ ₹५०० जमा झाल्याने सरकारने थट्टा केल्याचा आरोप महिलांकडून केला जात आहे. मंगळवेढा तालुक्यातील एका महिलेच्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या निंबोणी शाखेतील खात्यावर फक्त ₹५०० जमा झाल्याचे उघड झाल्याने महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
महिलांचा रोष: “आजच्या दिवशी तरी सरकारने शब्द पाळायला हवा होता!”
महिला दिनानिमित्त महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव केला जात असताना, त्याच दिवशी सरकारने दिलेल्या आश्वासनाचा भंग केल्याने महिलांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. काही महिलांनी “किमान आजच्या दिवशी तरी सरकारने दिलेला शब्द पाळायला हवा होता,” अशी प्रतिक्रिया दिली.
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि जनतेच्या कल्याणासाठी मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या सरकारने महिला दिनाच्या दिवशी तरी महिलांची थट्टा करायला नको होती, असे महिलांचे मत आहे. सत्ताधारी पक्षातील काही नेते महिला विषयक बेताल वक्तव्ये करत असल्याने, सरकार महिलांविषयी किती गंभीर आहे, हे यातून स्पष्ट होते, अशी टीका होत आहे.