कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता! आता मिळणार किमान वेतन, विमा आणि भत्ता | Recruitment of Contractual Employees
Recruitment of Contractual Employees
राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या अटी आणि हक्कांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. विविध शासकीय विभागांसह महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना लवकरच किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी, सुरक्षेसाठी विमा आणि विशेष पगारवाढ म्हणून भत्ता मिळणार आहे. या संदर्भातील धोरण निश्चित करण्याची जबाबदारी मनपा प्रशासक जी. श्रीकांत आणि सचिव सौरभ राव यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
पुण्यात यशदा येथे झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या विषयावर चर्चा झाली. लवकरच मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण करून हे धोरण अंतिम केले जाणार आहे.
सध्या राज्यातील अनेक शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची संख्या सेवानिवृत्ती व इतर कारणांमुळे घटत आहे. परिणामी कंत्राटी भरतीची गरज वाढली असली तरी, एकत्रित धोरण नसल्याने स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवावी लागते. यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान वेतन मिळत नाही, वेतन वेळेवर मिळण्यात अडथळे येतात, तसेच कोणत्याही सुविधा न मिळाल्याने एजन्सीकडून पिळवणूकही होते.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या पार्श्वभूमीवर कंत्राटी भरतीसाठी स्वतंत्र नियमावली (SOP) तयार केली जात असून, त्यात किमान वेतन कायदा, सुरक्षा विमा, भत्ता आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी जबाबदारी निश्चिती यांसारख्या तरतुदी असतील. या धोरणामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक आणि सामाजिक संरक्षण मजबूत होण्याची अपेक्षा आहे.