महसूल विभागात आनंदाचे वातावरण, 125 उपजिल्हाधिकाऱ्यांना मिळणार पदोन्नती! – Promotion for Deputy Collectors !
Promotion for Deputy Collectors !
राज्यात आठ वर्षांपासून रखडलेली 125 उपजिल्हाधिकाऱ्यांची पदोन्नती अखेर मंजूर करण्यात आली आहे. महसूल विभागाने या अधिकाऱ्यांना निवड श्रेणी पदावर पदोन्नती दिली असून, यामुळे राज्यभरातील महसूल अधिकाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पदोन्नतीचे आदेश दिले असून, लवकरच 80 अतिरिक्त जिल्हाधिकारी पदे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
गेल्या वर्षी राज्यसेवेतील 23 अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) बढती देण्यात आली होती. 1954 च्या नियमानुसार या अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती. राज्यातील महसूल प्रशासन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
IAS पदावर बढती मिळालेले अधिकारी:
- संजय ज्ञानदेव पवार
- नंदकुमार चैतराम भेडसे
- सुनील बजाजीराव महिंद्रकर
- रवींद्र जीवाजीराव खेबुडकर
- निलेश गोरख सागर
- लक्ष्मण भिका राऊत
- जगदीश गोपाळकृष्ण मनियार
- माधवी समीर सरदेशमुख
- बाळासाहेब जालिंदर बेलदार
- डॉ. ज्योत्स्ना गुरुराज पडियार
- अण्णासाहेब दादू चव्हाण
- गोपीचंद्र मुरलीधर कदम
- बापू गोपीनाथराव पवार
- महेश विश्वास आव्हाड
- वैदही मनोज रानडे
- विवेक बन्सी गायकवाड
- नंदिनी मिलिंद आवाडे
- वर्षा मुकुंद लड्डा
- मंगेश हिरामन जोशी
- अनिता निखील मेश्राम
- गीतांजली श्रीराम बाविस्कर
- दिलीप ज्ञानदेव जगदाळे
- अर्जुन किसनराव चिखले
या निर्णयामुळे महसूल विभागातील रिक्त जागा भरल्या जाणार असून, प्रशासन अधिक सक्षम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.