महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंददायक निर्णय घेण्यात आला आहे. 27 एप्रिल 2025 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, राज्यातील काही कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. महाराष्ट्र शेती महामंडळातील 22,000 कर्मचाऱ्यांसाठी ही घरे म्हाडा प्राधिकरणाच्या माध्यमातून उपलब्ध केली जातील.

या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळणार असून, यावर कर्मचारी संघटनांनीही स्वागत व्यक्त केले आहे. म्हाडाकडून घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. राज्यभरातील शेती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेत, त्यांना योग्य आणि राहण्यायोग्य सदनिका प्रदान करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
यामध्ये 14 शेतमळ्यांवर 2966 निवासस्थाने असून, यापैकी 1786 निवासस्थाने अयोग्य ठरलेली होती, ज्यामुळे रिक्त करण्याचा प्रस्ताव ठेवला गेला. या निर्णयामुळे शेती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून चांगली घरे मिळतील आणि त्यांची हक्काची लॉटरी लागेल, असं म्हटले जात आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















