दहावी- भूगोलचा पेपर रद्द, नववी, अकरावीची परीक्षा होणार नाही!
Maharashtra SSC Geography Paper Exam Dates
Maharashtra SSC Geography Paper Exam Dates -आताच प्राप्त बातमी नुसार, दहावीचा भूगोल पेपर आणि नववी, अकरावीच्या परीक्षाबाबत शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. तसेच इयत्ता 9 आणि 11 वी परीक्षा होणार नाही. आधीचे सरासरी मार्क लक्षात घेत विद्यार्थ्यांना मार्क्स दिले जातील. तसेच दहावीचा भूगोल पेपर घेण्यात येणार नाही, याबाबत एसएससी बोर्ड भूमिका पुढील काही दिवसांत स्पष्ट करेल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याने शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतल्याचे शालेय शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे.
दहावीच्या विषयांचे पेपर होउन आता 20 दिवसांहून अधिक कालावधी लोटला असून लॉकडाउन अन् कोरोनाच्या धास्तीने विद्यार्थ्यांचा अभ्यासही होऊ शकलेला नाही. त्यामुळे पुणे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता दहावीच्या विद्यार्थ्यांचा भुगोल विषयाचा पेपर रद्द करावा, अशी मागणी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली असून सोमवारी (ता. 13) बोर्डाचे अधिकारी त्यांची भेट घेणार आहेत. भुगोल विषयाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय झाला असून मंगळवारी (ता. 14) त्यावर अंतिम निर्णय होईल, असे बोर्डाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले..
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तसेच सरासरी गुण की पाच विषयांचाच निकाल : यावर निर्णयहोणार
आता दहावीच्या पाच विषयांचे पेपर होऊनबराच वेळ झाला असून विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची मानसिकता राहिलेली नाही. विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनात कोरोनाची भिती असून भुगोल विषयाचा पेपर घ्यायचे म्हटल्यास बैठक क्रमांक टाकणे, वर्गखोल्या स्वच्छ करणे, विद्यार्थ्यांना सुरक्षिततेसाठी एन-95 मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा लागेल. लॉकडाउनही वाढण्याची शक्यता असल्याने आता विद्यार्थ्यांना पाच विषयांच्या गुणांची सरासरी करुन भुगोल विषयाला गुण द्यायचे की पाच विषयांचाच निकाल जाहीर करायचा, यावर शिक्षणमंत्री निर्णय घेतील, असे पुणे बोर्डाचे विभागीय अध्यक्ष तथा शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली.
UPDATE : 4 April : हॅलो, आताच प्राप्त बातमी नुसार महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा उर्वरित भूगोलाचा पेपर आता 15 एप्रिलनंतर होणार असल्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाकडून प्रकाशित करण्यात आल्या आहेत. पहिले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पेपर संदर्भात 31 मार्चनंतर निर्णय घेण्यात येईल असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून म्हंटले होते. मात्र आता देशातील लॉकडाऊनच्या स्थितीवर हा पेपर 15 एप्रिलनंतर घेण्यात येईल असे शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकाद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे.
प्राप्त बातमी नुसार दहावी-बारावीचे सुरवातीला झालेले पेपर तपासण्यासाठी विविध शाळांकडे येऊ लागले आहेत. तसेच काही विषयांचे किंवा शाळांचे काही पेपर अद्याप पोस्टात आहेत. शाळेत पेपर्स असून सुद्धा सध्या “लॉकडाउन’ असल्याने शिक्षकांना शाळेत येता येत नाही. अशा स्थितीत काय करावे, अशी विचारणा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने शासनाकडे केली होती. तेव्हा शासनाने “लॉकडाउन’ शिथिल झाल्यानंतर हे पेपर शिक्षकांनी मुख्याध्यापकांकडून घेऊन घरी तपासण्यास शासनाने परवानगी दिली आहे.परंतु यात , खरा प्रश्न आहे तो “लॉकडाउन’ शिथिल केव्हा होणार याचा? तसेच पुढे होणाऱ्या नववी व अकरावीच्या परीक्षेबाबत शासनाने 15 एप्रिलनंतर निर्णय घेतला जाईल असे जाहीर केले आहे. त्याचबरोबर दहावी भूगोल विषयाच्या पेपरबाबतचा निर्णय 15 एप्रिलनंतर घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे भूगोलचा पेपर केव्हा होणार याबाबत अद्याप सर्व विद्यार्थ्यांमध्ये अनिश्चितताच आहे.
पुढील अपडेट आम्ही www.MahaBharti.in वर लवकरच प्रकाशित करूच.
Geography paper ssc 2020 date
The last paper of SSC Class 10 board exam scheduled to be held on Monday was of Social Science Paper-II/Geography. The timing of the paper was from morning to 11:00 to 01:00 in the afternoon.
The paper however now stands cancelled and rescheduled to a new date which will be announced after April 15.
Because of the postponement of the SSC 2020 Exam, it is most likely that the Maharashtra SSC Class 10 result 2020 will also be delayed.
Normally, the Maharashtra board declares SSC board exam result in the first week of June.
इतिहासाच्या गुणां इतके भूगोल विषयाला गुण द्यावे