४० हजार परिचारिकांना मिळणार सुरक्षा आरोग्य सेवा संचालनालयाचा निर्णय! – Paricharika Bharti 2025
Maharashtra Paricharika Bharti 2025
Maharashtra Nurse Bharti 2025 – राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या परिचारिकांना आता तीन शिफ्टमध्ये सुरक्षा पुरवली जाणार आहे. अमरावतीमध्ये अलिकडेच घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य सेवा संचालनालयाने परिचारिकांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र सुरक्षा दलाकडे सोपवण्यात येणार आहे. अमरावती जिल्हा रुग्णालयात रुग्णाच्या कुटुंबीयांनी एका परिचारिकेवर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर सरकारी रुग्णालयांमधील परिचारिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर सुरक्षेची मागणी करत परिचारिका संघटनांनी मुंबईतील आरोग्य भवनात आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालकांची भेट घेतली होती. या बैठकीत संस्थेच्या अधिकाऱ्यांनी परिचारिकांना सुरक्षा देण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतर राज्यातील सर्व जिल्हा, उपजिल्हा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये काम करणाऱ्या परिचारिकांना तीन शिफ्टमध्ये काम करायला लावण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या सरचिटणीस सुमित्रा तोटे म्हणाल्या की, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये काम करणाऱ्या रुग्णालयांच्या प्रत्येक वॉर्डबाहेर आता महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान तैनात केले जाणार आहेत. याशिवाय रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही वाढवले जाणार आहेत. सर्व जिल्ह्यांच्या सिव्हिल सर्जन आणि रुग्णालयांच्या अधीक्षकांना सुरक्षा रक्षक पुरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या सरचिटणीस सुमित्रा तोटे यांनी सांगितले. परिचारिकांना आधीच सुरक्षा पुरवली जात आहे. परंतु सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या ४० हजार परिचारिकांच्या सुरक्षेचा प्रश्न प्रलंबित होता. अमरावतीमध्ये परिचारिकांवर झालेल्या हल्ल्यानंतर संघटनांनी परिचारिकांच्या सुरक्षेबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर प्रशासनाने सदर घटनेचे गांभीर्य ओळखून परिचारिकांना सुरक्षा पुरवण्याचे निर्देश दिले आहे.
राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये गरीब आणि गरजू रुग्ण मोफत उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात दाखल होतात. रुग्णालयात दाखल होण्यापासून डिस्चार्ज मिळेपर्यंत रुग्णसेवेमध्ये डॉक्टरांच्या बरोबरीने परिचारिका महत्वाची भूमिका बजावतात. मात्र, राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील हजारो पदे रिक्त असल्यामुळे रुग्णसेवेवर विपरित परिणाम होत आहे. पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयासह राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये दररोज दीड ते दोन हजार रुग्ण उपचारांसाठी येतात. यापैकी आंतररुग्ण विभागामध्ये दाखल होणा-यांची संख्या सुमारे ८०० ते १००० इतकी असते. प्रत्येक ५ रुग्णांमागे १ परिचारिका असणे अपेक्षित असताना सद्यस्थितीत एक परिचारिकेकडे १५ ते २० रुग्णांची जबाबदारी सोपवल्याचे पहायला मिळत आहे. खासगी रुग्णालयांच्या तुलनेत शासकीय रुग्णालयांमध्ये परिचारिकांकडून उर्मट वर्तन केले जात असल्याच्या तक्रारी बरेचदा रुग्णालय प्रशासनाकडे प्राप्त होत असतात. अशा वेळी परिचारिकांना पूर्णपणे दोषी धरले जाते. मात्र, ‘परिचारिका या रोबो नव्हेत, माणूसच आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील कामाच्या ताणाचा व्यवस्थापनाकडून विचार व्हावा’, अशी मागणी परिचारिका संघटनांकडून सातत्याने केली जात आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात गट-ब, गट-क आणि गट-डया संवर्गामध्ये एकूण ५४,९५४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या ११.३७५ पदे रिक्त आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये एकूण ३५,३४३ पदे रिक्त आहेत. त्यापैकी ९०८८ पदे रिक्त आहेत. यामध्ये परिचारिकांची संख्या लक्षणीय आहे. परिचारिकांची अनेक पदे रिक्त असल्याने उपलब्ध मनुष्यबळावर कामाचा प्रचंड ताण येत आहे. विशेषतः, रात्रीच्या वेळी रुग्णसेवेमध्ये अनेक अडचणी येत असल्याचे परिचारिकांचे म्हणणे आहे. रुग्ण आजारपणामुळे आधीच चिडचिडे, हतबल झालेले असतात. अशा वेळी परिचारिकांकडून वेळेवर प्रतिसाद न मिळाल्यास रुग्ण आणि नातेवाईक यांचा राग अनावर होतो. कोणतीही परिचारिका रुग्णांना जाणीवपूर्वक दुखावत नाही. मात्र, कामाचा भार सोसताना त्यांची काही प्रमाणात चिडचिड होते. परिचारिका वेळच्या वेळी स्वतःमध्ये सुधारणा करतातच; मात्र, शासनाने उपलब्ध मनुष्यबळावरील ताण कमी करण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी भावना शासकीय रुग्णालयातील एका परिचारिकेने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.