Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ‘एसएमएस’द्वारे समजणार अकरावी प्रवेशाचे कॉलेज…- FYJC Admission 2024

Maharashtra FYJC Admission 2024,11th Admission 2024

शहरात इयत्ता अकरावीच्या विज्ञान आणि वाणिज्य इंग्रजी माध्यमाच्या प्रवेशाची केंद्रीय प्रक्रिया सुरू आहे. या समितीकडे अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांना प्रवेश मिळालेल्या कॉलेजची माहिती समितीकडून ‘एसएमएस’द्वारे शुक्रवारी पाठविली जाणार आहे. या ऍडमिशन संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

वाणिज्य इंग्रजी, विज्ञान विद्याशाखा असलेल्या विविध २९ कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रवेशासाठी एकूण ७ हजार ३०३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, त्यांची छाननीची प्रक्रिया आजपासून समितीकडून सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी दहा वाजता केंद्रीय समितीकडून कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या संकेतस्थळावर निवड यादी जाहीर केली जाणार आहे. त्याबरोबरच पहिल्या फेरीमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजचे नाव आणि त्यांच्या दहावीच्या बैठक क्रमांकाची माहिती असलेला ‘एसएमएस’ त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठविला जाणार आहे. निवड यादी जाहीर झाल्यानंतर संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही सुरू होणार आहे. पहिल्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित करण्याची मुदत २५ जूनपर्यंत आहे. या फेरीत शिल्लक राहणाऱ्या प्रवेश जागांचा आढावा घेऊन दुसऱ्या फेरीची कार्यवाही केली जाणार आहे. दरम्यान, कला आणि वाणिज्य मराठी विद्याशाखेचे प्रवेश महाविद्यालय पातळीवर आरक्षण आणि गुणवत्तेनुसार ऑफलाईन पद्धतीने सुरू आहेत.

तक्रार अर्जही ऑनलाईन
• विद्यार्थ्यांना निवड यादीबाबत काही तक्रार असल्यास त्यांना समितीकडे तक्रार नोंदविता येणार आहे. त्यासाठी शुक्रवारी आणि शनिवारी मुदत आहे. विद्यार्थ्यांनी तक्रार अर्ज ऑनलाईन करावयाचा आहे.


FYJC Admission 2024 Update

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याला उद्या बुधवार, ५ जूनपासून प्रारंभ होणार आहे. या टप्प्यात विद्याथ्यर्थ्यांना त्यांना प्रवेश हवा असलेल्या कॉलेजांचा पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. ऑनलाइन स्वरुपात हे पसंतीक्रम भरण्यासाठी १५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने या प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ५ जूनच्या सकाळी १० वाजतापासून अर्जाचा दुसरा भाग भरता येईल. या दुसऱ्या भागात विद्यार्थ्यांना ज्या कॉलेजांमध्ये प्रवेश हवा आहे, असे दहा पसंतीक्रम भरता येतील. या ऍडमिशन संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अकरावीसाठी यंदा २४ नवी कनिष्ठ महाविद्यालये;अकरावी प्रवेशात ३ ते ४ हजार जागा वाढणार !! 11th Admission 2024 – 2025

ज्या विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला भाग अद्याप भरलेला नाही त्यांना हा पहिला भागही या कालावधीत भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश दिला जाईल. ज्या विद्याथ्यांच्या अर्जाच्या भाग-१ची पडताळणी झाली आहे, तेच विद्यार्थी भाग-२ भरू शकतील. याशिवाय, कोटा प्रवेशासाठीही विद्यार्थी ऑनलाइन पसंती नोंदवू शकतात. आधी भाग-१ भरला असल्यास त्यामध्ये या कालावधीत सुधारणाही करता येईल. नव्याने भरलेला अथवा दुरुस्त करून भाग-१ प्रमाणित केलेले विद्यार्थी लगेच भाग-२ करू शकतात. १५ जूनला सायंकाळी ४ वाजतापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

अर्जाची पडताळणी १८ जून रोजी झाली आहे त्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल

ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी १८ जून रोजी झाली आहे त्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल, तसेच अर्जाचा भाग-२ लॉक केला जाईल. विद्यार्थ्यांना २१ जूनपर्यंत या यादीवर हरकती नोंदविता येतील. शिक्षण उपसंचालकांनाही याच कालावधीत हरकतींचे निवारण करावे लागणार आहे.

२६ जून रोजी विद्यार्थ्यांची ज्या विद्यालयात निवड झाली आहे त्यांची यादी संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाईल. याशिवाय, फेरीचे कटऑफ गुणही प्रदर्शित केले जातील. २६ ते २९ जूनदरम्यान विद्यार्थ्यांना त्यांना मिळालेल्या कॉलेजांमध्ये आपला प्रवेश निश्चित करता येईल. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १ जुलै रोजी दुसऱ्या नियमित फेरीसाठीच्या रिक्त जागा जाहीर केल्या जातील. विविध कोटांतर्गत असलेल्या जागांसाठीची प्रवेश प्रक्रियादेखील याच कालावधीत पार पाडली जाईल. २ जुलै रोजी दुसरी नियमित प्रवेश फेरी, ९ जुलै रोजी तिसरी नियमित फेरी, तर १९ जुलै रोजी विशेष प्रवेश फेरी घेण्यात येणार आहे. या फेऱ्यांचे तपशीलवार वेळापत्रक नंतर घोषित केले जाईल.


FYJC Admission First Round Date

केंद्रीय मंडळाबरोबरच यंदा राज्य मंडळाचा निकाल लवकर जाहीर होऊनही वेळापत्रक जाहीर झालेले नाही. कनिष्ठ महाविद्यालयातील नोंदणीचे काम अद्याप सुरू असून महाविद्यालयांच्या फायद्यासाठी अकरावी प्रवेशाचा दुसरा टप्पा रखडला का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. निकाल जाहीर होऊनही पुढील वेळापत्रक जाहीर न झाल्याने विद्यार्थी पालक गोंधळात आहेत. या ऍडमिशन संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा सोमवारी निकाल जाहीर झाला. यंदा मंडळाने लवकर निकाल जाहीर केला. मात्र, दरव र्षीप्रमाणे यंदाही अकरावी प्रवेशाचा गोंधळ कायम आहे. अद्याप कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध जागांची माहितीही शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जाहीर केलेली नाही. निकालाआधीच तुकड्या व नवीन मान्यता मिळालेल्या महाविद्यालयांची नोंदणी का केली नाही, असाही सवाल उपस्थित होत आहे.
दहावीनंतर तंत्रनिकेतन पदविका यासक्रम आटा आवेशात होणार सुरू आहेत. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांत अकरावी प्रवेशासाठी घेताना चुरस असते. गेल्या चार दिवसांत तब्बल १ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज भरला आहे. तरीही प्रवेशाचा दुसरा टप्पा अद्याप सुरू झालेला नसल्याने विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक संभ्रमात आहेत.
दरम्यान, याबाबत संपर्क साधल्यावर कनिष्ठ महाविद्यालयातील जागांची नोंदणी चालू असून, ती पूर्ण झाल्यानंतरच पुढील वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून सांगण्यात आले.

पहिल्या टप्यातील अर्ज
• अर्ज नोंदणी: १०८८३०
• अर्ज लॉक : ५९७३७
• अॅटो व्हेरिफाय: २८१८५
• मार्गदर्शन केंद्रावर पडताळणी : १४३६९


 

11th Admission Application 2024

दहावीचा निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवसांपासून (ता. २८) इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात होईल. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले असून तिसऱ्या फेरीनंतर विशेष प्रवेश फेरी होईल आणि १५ जुलैपासून अकरावीच्या विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग सुरू होतील, असे त्यांनी सर्व प्राचार्यांना कळविले आहे. या ऍडमिशन संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अकरावी प्रवेशाच्या अनुषंगाने शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व महाविद्यालयांकडून शाखानिहाय प्रवेश क्षमतेची माहिती मागविली आहे. जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालये तथा कनिष्ठ महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ‘यु-डायस प्लस’मधील माहिती ३० सप्टेंबरपर्यंत अद्ययावत करून घ्यावे. मंजूर प्रवेश क्षमता, प्रवेशित विद्यार्थी, ‘सरल’वरील विद्यार्थ्यांची माहिती विचारात घेऊनच राज्य मंडळ इयत्ता बारावीच्या परीक्षेचे अर्ज स्वीकारणार आहे. या सूचनांप्रमाणे कार्यवाही न करणाऱ्या महाविद्यालयांवर कडक कारवाई होईल, असा इशारा माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिला आहे. दरम्यान, दरवर्षी इयत्ता बारावीतील विद्यार्थी विविध कारणास्तव महाविद्यालय बदलून देण्याची मागणी करतात. पण, आता कनिष्ठ महाविद्यालयाला मंजूर जागांच्या मर्यादेत व जागा उपलब्धतेनुसार बारावीत महाविद्यालय बदलून देण्याची कार्यवाही महाविद्यालय स्तरावरूनच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक असे…

  • प्रवेश अर्ज विक्री व अर्ज स्वीकृती : २८ मे ते ८ जून
  • प्रवेश अर्जांची छाननी : १० ते १५ जूनपर्यंत
  • पहिली गुणवत्ता यादी : १८ जून
  • प्रथम गुणवत्ता यादीनुसार प्रवेश : १८ ते २५ जूनपर्यंत
  • दुसरी गुणवत्ता यादी : २७ जून (२७ जून ते ४ जुलैपर्यंत प्रवेश)
  • तिसरी गुणवत्ता यादी : ५ जुलै (५ ते ८ जुलैपर्यंत प्रवेश)
  • विशेष फेरी (एटीकेटीसह) : ९ ते १२ जुलैपर्यंत

विद्यार्थ्यांनी ‘या’ बाबींची खात्री करूनच घ्यावा प्रवेश

जिल्ह्यातील काही खासगी क्लास चालक तथा संस्था चालक हे विद्यार्थी व पालकांना विविध प्रलोभने दाखवून इयत्ता अकरावीसाठी प्रवेश निश्चित करीत आहेत. पण, विद्यार्थी व पालकांनी शाळेत प्रवेश निश्चित करण्यापूर्वी त्या शाळेची मान्यता, शैक्षणिक व भौतिक सुविधा, अध्यापक व अध्यापनाचे वर्ग, अध्यापनाचे विषय, प्रवेश क्षमता पाहावे. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास जास्त झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसता येणार नाही, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी स्पष्ट केले आहे.


FYJC Admission 2204 Application

नाशिकसह पुणे-पिंपरी चिंचवड, मुंबई, नागपूर, अमरावती या महापालिका क्षेत्रांमध्ये केंद्रीय अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने, तर इतर शहरांत प्रचलित पद्धतीनुसार येत्या २४ मेपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना अर्जातील भाग एक भरता येणार आहे. २२ आणि २३ मे या दोन दिवशी विद्याथ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याचा सराव करता येईल. शिक्षण विभागाने तातडीने अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला. या ऍडमिशन संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही अकरावी प्रवेश सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाला सूचना दिल्या होत्या. त्यानंतर शिक्षण विभागाने २४ मेपासून अकरावी प्रवेशप्रक्रियेत नोंदणी करता येणार आहे. याबाबत केंद्रीय प्रवेश समितीच्या सदस्य सचिव डॉ. ज्योती परिहार यांनी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

राज्यात मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महापालिका क्षेत्रांमधील ज्युनिअर कॉलेजांमध्ये अकरावी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केले जातात. भाग १ आणि भाग २ या टप्प्यांत अर्ज भरण्याची प्रक्रिया केली जाते. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना नोंदणी करून, नाव, पत्ता, जन्मतारीख अशी माहिती भरावी लागते. त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जाच्या भाग दोनमध्ये आवडीच्या महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम (गुणवत्तेनुसार) भरायचे असतात. अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार २४ मेपासून विद्यार्थी नोंदणी आणि ऑनलाइन अर्जाचा भाग एक भरता येणार आहे. यंदा प्राधान्य फेरी होणार नसल्याचे परिपत्रकात नमूद आहे.

विद्यार्थ्यांना https://11thadmis- sion.org.in/ या पोर्टलवर डमी लॉगिन आणि यासाठीच्या सुविधा दिल्या जातील. पण, प्रत्यक्ष अर्जाचा पहिला भाग भरण्याची प्रक्रिया 24 मेपासून सुरू होणार आहे. दहावीच्या निकालानंतर दुसरा भाग भरण्याची प्रक्रिया सुरू होईल.

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक – 11th Admission Time Table 2024

■ नोंदणी, ऑनलाईन अर्ज भरण्याचा सराव २२ ते २३ मे
■ प्रत्यक्ष नोंदणी आणि अर्जाचा भाग १ भरणे २४ मेपासून पुढे दहावी (एसएससी बोर्डाच्या) निकाल लागल्यानंतर दोन दिवसांपर्यंत
■ अर्जातील माहिती तपासून प्रमाणित करणे २४ मेपासून पुढे दहावी निकालानंतर दोन दिवसांपर्यंत
■ कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी दहावी निकालापर्यंत
■ कॉलेज पसंतिक्रम नोंदविणे (अर्ज भाग २) दहावी निकालानंतर पाच दिवस


11th Admission Process 2024

Maharashtra FYJC Admission 2024: केंद्रीय प्रवेश समितीतर्फे इयत्ता अकरावी प्रवेशाची प्रक्रिया लवकरच सुरू हाेण्याची शक्यता आहे. नुकताच सीबीएसई बाेर्डाचा निकाल जाहीर झाला आहे आणि या आठवड्यात राज्य शिक्षण मंडळाचा निकालही जाहीर हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठवडाभरात केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू हाेईल, अशी माहिती समितीच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. शिक्षण संचालनालयाच्या सूचनेनुसार २०२४-२५ या शैक्षणिक सत्राकरिता इयत्ता ११ वीच्या कला, वाणिज्य, विज्ञान व एमसीव्हीसी अभ्यासक्रमाकरिता केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे केले जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या क्षमतेनुसार यावर्षीही महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयात ११ वीच्या तिन्ही अभ्यासक्रमाच्या ५४ हजार ५६० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. या ऍडमिशन संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शालेय शिक्षण विभागाला केंद्रीय अकरावी प्रवेश प्रक्रियेचा विसर पडल्याबाबतचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने गुरुवारी प्रकाशित केले. त्यानंतर शिक्षण विभागाने अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबई महानगर क्षेत्र, नाशिक, नागपूर, अमरावती महापालिका क्षेत्रांत ऑनलाइन, तर इतर ठिकाणी ऑफलाइन प्रवेश प्रक्रियेला लवकर सुरुवात होण्याची शक्यता आहे. याबाबत शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, की यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल आम्ही लवकर जाहीर करत आहोत. अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जाचे दोन भाग भरावे लागतात. त्यातील ‘भाग एक’मध्ये विद्यार्थ्याची माहिती भरायची असते. त्यात नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाइल, ई-मेल ही माहिती असते. हा भाग भरण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याच्या सूचना शिक्षण संचालकांना दिल्या आहेत. येत्या आठवड्यात बारावीचा, त्यानंतर लगेचच दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना अर्जातील ‘भाग दोन’ ही भरता येईल. याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत.
अकरावी प्रवेश प्रक्रियेची मुख्य जबाबादारी असणारे माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांना अधिक माहिती घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी फोन उचलला नाही


Maharashtra FYJC Admission 2024 Pune, Mumbai, Nagpur, Amravati & Maharashtra 

Maharashtra FYJC Admission 2023: The 11th admission process has been delayed this year too. This process, which was announced at the end of May, will now be carried out directly in the month of June. The Directorate of Education has announced the probable schedule of the 11th online admission process to be implemented in Pune, Pimpri-Chinchwad, Nashik, Amravati and Nagpur municipal areas along with Mumbai. Accordingly, from June 1, students will be able to register for admission online, and the application form will be filled and verified.

राज्यातील महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांसाठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या नियमित प्रवेश फेरीचे व कोट्यांतर्गत जागांच्या प्रवेशाचे स्वतंत्र वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनाने जाहीर केले आहे. दि.8 जून पासून प्रत्यक्ष प्रवेश फेरीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-2 भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध होणार आहे. यात विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंद नोंदवावे लागणार आहेत.

या ऍडमिशन संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अजुनही काही विद्यार्थी अर्ज करण्याचे बाकी आहेत तसेच काही विद्यार्थ्यांचे अर्ज प्रमाणित होणे बाकी आहे.इयत्ता दहावी राज्य मंडळाकडून गुणपत्रिका दिनांक 14 जून रोजी वितरित होणार आहेत.मूळ गुणपत्रिका मिळाल्याशिवाय विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या शाळा सोडल्याचा दाखला मिळणार नाही त्यामुळे इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेता येणार नाही. सबब सध्या सुरू असलेली नियमित प्रवेश फेरी 1 साठी अर्ज करण्यास व सर्व कार्यवाही साठी 2 दिवस मुदतवाढ देण्यात येत आहे

सुधारित वेळापत्रक पाहा

सन 2023 24 मधील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया इ.१० वी राज्यमंडळ निकालानंतर त्वरीत सुरू करण्यात आलला आहे. दिनांक 12 जून 2023 अखेर इ. ११ वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जाची स्थिती पुढील प्रमाणे आहे.
Part-1 filled Students = 391144 (Registered), 335334 (Locked), 329198 (verified)
Part-2 filled Students = 252423 (CAP)
उपरोक्त आकडेवारी पाहता काही विद्यार्थ्यांनी इ.११वी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रीया पूर्ण केली नसलेचे दिसून येते. तसेच काही विद्यार्थ्यांचे इ.११वी प्रवेश अर्ज प्रमाणित होणे बाकी असून अनेक विद्यार्थ्यांनी भाग-2 अद्याप भरलेला नाही.
इयत्ता दहावी राज्य मंडळाचा निकाल जाहीर झालेला असून राज्य मंडळाकडून गुणपत्रिका दिनांक 14 जून रोजी वितरित होणार आहेत. गुणपत्रिका मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या शाळा सोडल्याचा दाखला मिळणार आहे व त्यानंतर प्रत्याक्षात इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेता येणार आहे.
या सर्व बाबी विद्यार्थी / पालकांची मागणी व विद्यार्थ्यांचे हित विचारात घेऊन सध्या सुरू असलेली नियमित फेरी-1 साठी अर्ज करण्यासाठी दि.१४/०६/२०२३ रोजी सायं. 05:00 वा. पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
सुधारित वेळापत्रक सोबत संलग्न आहे.

पहिल्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक

दि. 8 ते 12 जून- नवीन विद्यार्थी नोंदणी व प्रवेश अर्जाचा भाग-1 भरणे, प्रवेश अर्जाचा भाग-2 भरणे, माध्यमिक शाळा किंवा मार्गदर्शन केंद्राद्वारे अर्ज प्रमाणित करुन घेणे, कोटा प्रवेशासाठीही नोंदणी करता येणार.
दि. 12 जून- सांयकाळी 4 पर्यंत अर्जाचा भाग-1 भरणे.
दि. 13 ते 15 जून – अर्जाचा भाग-1 भरलेल्या व पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करणे, गुणवत्ता यादीवर हरकती नोंदविणे, गुणवत्ता यादी दुरुस्तीबाबत संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांनी निराकरण करणे.
दि. 15 जून – अर्जाचा भाग- 2 ची सुविधा रात्री 10 वाजता बंद होणार.
दि. 16 ते 18 जून- डेटा प्रोसेसिंग कार्यवाही, पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करणे व त्याचे विभागीय समितीकडून पूर्व परीक्षण करणे.
दि. 19 मार्च- विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विद्यायल निवड यादी प्रदर्शित करणे, विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये त्यांचे प्रवेशाचे महाविद्यालय दर्शविणे, प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयाच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करुन देणे, कटऑफ पोर्टलवर दर्शविणे.
दि. 19 ते 22 जून – विद्यार्थ्यानी आवश्‍यक कागदपत्र अपलोड करुन अलॉट झालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित करणे, प्रवेश घ्यायचा नसल्यास पुढील फेरीची प्रतीक्षा करणे, पुढील प्रवेश फेरीसाठी नवीन विद्यार्थी नोंदणी व अर्ज भाग-1 भरणे.
दि. 22 जून- महाविद्यालयांनी प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती पोर्टलवर ऑनलाईन नोंदविणे, कोट्यातील रिक्त जागा कॅपकडे समर्पित करणे.
दि. 23 जून- दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे, याप्रमाणे वेळापत्रक असेल.

 

निश्‍चित केलेला प्रवेश रद्द करावयाचा असल्यास?
महाविद्यालयात निश्‍चित केलेला प्रवेश एखाद्या विद्यार्थ्यास रद्द करावयाचा असल्यास संबंधित महाविद्यालयास विनंती करून पुढील प्रक्रिया करता येईल. त्यानंतर संबंधित विद्यार्थी पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित करण्यात येणार आहे.

 

महत्त्वाच्या तारखा
■ ३० मे ते ६ जून कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी
■ २९ मे शिबिरात महाविद्यालयांचा कागदपत्रांसह सहभागी
■ २५ मेपासून अर्जाचा भाग एक भरून प्रमाणित करणे
■ निकाल जाहीर झाल्यानंतर भाग दोन भरता येणार

 

६ जून हा कालावधी देण्यात आला आहे. या प्रक्रियेत नवीन नोंदणी आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या माहितीत बदल करण्यासाठी २९ मे रोजी घेण्यात येणाऱ्या शिबिरात महाविद्यालयांना कागदपत्रासह सहभागी व्हावे लागणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांच्या नोंदणीसाठी ३० मे ते शिक्षण संचालनालयाने दिली आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड