28 फेब्रुवारी पूर्वी केवायसी अनिवार्य, नाहीतर बंद होईल राशन पुरवठा, काय आहे प्रोसेस..? -KYC Mandatory Before February 28 !
KYC Mandatory Before February 28 !
जिल्ह्यातील ज्या रेशन कार्ड धारकांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचे राशन वाटप थांबवण्याची तयारी शहर व जिल्हा पुरवठा विभागाने केली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे आणि शहरी पुरवठा अधिकारी प्रवीण राऊत यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व 1,904 शासकीय राशन दुकानदारांच्या माध्यमातून सर्व रेशन कार्डधारकांना 28 फेब्रुवारीपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ज्यांचे अंगठे स्कॅन होत नाहीत, त्यांच्यासाठी डोळ्याच्या पापणी स्कॅनिंगची सुविधा सर्व राशन दुकानांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा, ठरलेल्या कोट्यानुसार त्यांचे राशन मिळणे बंद होईल, यासाठी संबंधित लाभार्थी स्वतः जबाबदार असतील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सध्या जिल्ह्यात अंत्योदय योजनेअंतर्गत 1 लाख 28 हजार 207 राशन कार्डधारक आहेत, ज्यांचे एकूण लाभार्थी संख्याश 4 लाख 78 हजार 548 आहे. त्याचप्रमाणे प्राधान्य गटात 3 लाख 74 हजार 335 कार्डधारक असून, 15 लाख 12 हजार 130 लाभार्थी आहेत. अशा एकूण 19 लाख 10 हजार 678 लाभार्थ्यांना दरमहा 1,904 सरकारी रेशन दुकानांमधून मोफत धान्य दिले जाते.
हे मोफत राशन सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. आतापर्यंत 13 लाख 36 हजार 982 म्हणजेच 68% लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर उर्वरित 6 लाख 53 हजार 696 म्हणजेच 32% लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप बाकी आहे. त्यामुळे 28 फेब्रुवारी ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
अंगठा स्कॅन होत नसेल, तर डोळा स्कॅनिंगचा पर्याय उपलब्ध!