इंजिनीअरिंग पीजी प्रवेशांसाठी गेट परीक्षा फेब्रुवारीमध्ये
IIT GATE Exam 2021 Will be Held in February
इंजिनीअरिंगच्या पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी आवश्यक असलेली ‘गेट २०२१’ ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणार आहे. ही परीक्षा यंदा वेगवेगळ्या टप्प्यात घेण्यात येणार असल्याचे परीक्षा समितीचे प्रमुख आयआयटी मुंबईचे प्रा. दीपांकर चौधरी यांनी स्पष्ट केले.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी होणारी ही परीक्षा ५ ते ७ फेब्रुवारी आणि १२ ते १४ फेब्रुवारी अशा सहा दिवसांमध्ये होणार आहे. यंदा या परीक्षेच्या स्वरुपात बदल करण्यात आले आहेत. यात ‘पर्यावरण विज्ञान आणि इंजिनीअरिंग’ आणि ‘ह्युमॅनिटीज अॅण्ड सोशल सायन्सेस’ या दोन विषयांचा समावेश करण्यात आल्याने या परीक्षेसाठी एकूण २७ विषय असणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे, असे मतही चौधरी यांनी व्यक्त केले. यंदा या परीक्षेसाठी पात्रता निकषही शिथिल करण्यात आले आहेत. पूर्वी विद्यार्थ्यांना बारावीनंतर चार किंवा तीन वर्षांचे पदवी शिक्षण पूर्ण करणे बंधनकारक होते. आता अखेरच्या वर्षाच्या परीक्षेस पात्र विद्यार्थ्यांनाही संधी दिली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे गुण वाढवण्याची आणखी एक संधी मिळणार असल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या परीक्षेतील बदलांमुळे विद्यार्थ्यांना मानवता आणि सामाजिक विज्ञान या विषयांमध्येही करिअरची संधी मिळणार आहे. देशभरातील आयआयटी तसेच इतर विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या कक्षा रुंदावणार असल्याचा विश्वास चौधरी यांनी व्यक्त केला.
सोर्स : म. टा.