राज्यात तीव्र उन्हाळ्याची परिस्थिती असताना, शालेय शिक्षण विभागाने यंदा २४ एप्रिलपर्यंत परीक्षा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे शिक्षक आणि शाळांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. दरवर्षी एप्रिल अखेर शालेय कामकाज लांबवू नये असे परिपत्रक काढणाऱ्या शिक्षण विभागाने यंदा मात्र गोंधळाचे वातावरण निर्माण केले आहे.

गोंधळाचे निर्णय आणि संभ्रम!
दोन वर्षांपूर्वी आणि गतवर्षी शाळांना एप्रिल अखेरीस परीक्षा घेण्यास मनाई करणारे परिपत्रक जारी करण्यात आले होते. त्यामुळे मार्चमध्येच परीक्षा पूर्ण करण्याचे नियोजन शाळांनी केले होते. तापमानवाढीमुळे हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, यंदा २४ एप्रिलपर्यंत परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
शिक्षक, विद्यार्थी आणि शाळा संतप्त!
राज्यातील अनेक शाळांनी मार्चमधील वेळापत्रक तयार केले आहे, मात्र अचानक बदल करण्यात आल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नियोजन विस्कळीत झाले आहे.
शाळा आता आक्रमक!
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने एससीईआरटीला निवेदन देत ‘पॅट’ परीक्षा ८ ते १२ एप्रिलदरम्यान घ्यावी, अशी मागणी केली आहे. आता शिक्षण विभाग या मागणीला कोणता प्रतिसाद देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















