लाडकी बहीण मध्ये आमूलाग्र बदल- तक्रारींच्या आधारेच लाडकी बहीण योजनेतील अर्जाची छाननी होणार!
Ladki bahin yojana online form update
विधानसभा निवडणुकीत महायुतीला सत्तेचा मुकुट मिळवून देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील जास्त उत्पन्न असणाऱ्या लाभार्थीच्या अर्ज छाननीवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाने विधानसभेतील विजयानंतर सरकारला आता लाडक्या बहिणींची गरज संपली असल्याची टीका केली आहे. दरम्यान, यासंदर्भात बोलताना माजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले असून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीच्या अर्जाची पुन्हा छाननी होणार नसून केवळ तक्रारीच्या आधारेच या योजनेतील लाभार्थीच्या अर्जाची छाननी होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना तटकरे म्हणाल्या, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राबवत असताना आम्ही ती योजना अगदी व्यवस्थितपणे राबवण्याचा प्रयत्न केला आहे. Mazi Ladki Bahin Yojana Online Form.
२ कोटी ४० लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. कोणत्याही योजनेची एवढ्या मोठ्या संख्येने छाननी केली जाणार नाही. त्यासाठी मुळात तक्रार याव्या लागतात. मी आता त्या विभागाची मंत्री नाही. तेव्हा अशा पद्धतीने तक्रार आली असेल तर माझ्याकडे त्याबद्दलची माहिती नाही. छाननी किंवा चाचणी करायची झाल्यास तक्रारीच्या आधारे करावी लागते. कोणी तक्रारी केल्या तर त्या तपासल्या जातील. मी मंत्री असताना अशा तक्रारी आल्या नव्हत्या. आता आल्यात की नाही, ते मला माहिती नाही. कोणीही अशा पद्धतीने तक्रार केली असेल तर विभागाचे आधिकारी निर्णय घेतात. आता तक्रारी आल्यात की नाही यासंदर्भातील मला माहिती नाही. अतिशय प्राथमिक छाननी करून आधार सिडिंग करून लाभार्थी निवडले आहेत. त्यामुळे पुढच्या कालावधीत ही योजना अधिक चांगल्या पद्धतीने राबवताना जर छाननी करायची असेल तर तक्रारीच्या आधारावरच केली जाईल. भविष्यात अशी छाननी होणार आहे की नाही, याबाबत मी आता भाष्य करू शकत नसल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी चार नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सदस्य पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. उर्वरित लोकप्रतिनिधी अनुपस्थित राहिल्याने त्यांचा शपथविधी झाला नाही, विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन शनिवार, ७ डिसेंबरपासून सुरू झाले. नवनिर्वाचित आमदारांचा यावेळी शपथविधी आयोजित केला होता. पहिल्या दिवशी १७३, तर दुसऱ्या दिवशी १०६ लोकप्रतिनिधीना हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी शपथ दिली. उर्वरित आमदारांचा सोमवारी शपथविधी पार पडला. राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांच्यापासून शपथविधीला सुरुवात झाली. उत्तमराव जानकर, विनय कोरे, सुनील शेळके यांचा विधानसभेत शपथविधी पार पडला. या विशेष अधिवेशनात २८३ सदस्यांनी शपथ घेतली.