नववी, अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होणार
9th and 11th Class Re-Exam 2020
इयत्ता नववी व अकरावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाते. मात्र यंदा ही परीक्षा घेण्याबाबत राज्य सरकारने कोणताही आदेश दिलेला नव्हता याबाबत विद्यार्थी व पालकांनी आंदोलन केले. यानंतर अखेरी सरकारला जाग आली आणि बुधवारी या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारा तोंडी परीक्षा घ्यावी असे आदेश सरकारने काढले.
इयत्ता नववी व अकरावीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची संधी मिळावी यासाठी दरवर्षी जूनमध्ये शाळा सुरू झाल्यावर त्यांची फेरपरीक्षा घेतली जाते. मात्र यंदा या परीक्षांबाबत सरकारने अद्याप कोणताही आदेश दिला नव्हता. त्यामुळे नेमके काय करायचे, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला होता. तर या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची मागणी पालकांकडून होत होती. परंतु याबाबत प्रचलित नियमांनुसार विद्यार्थ्यांचा निकाल लावावा, असे सरकारने स्पष्ट केले होते. यामुळे शाळांनी तसा निकाल लावल्याने प्रत्येक शाळा आणि ज्युनिअर कॉलेजमधील सुमारे ८ ते १० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. यामुळे या हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचे असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांना पडला होता.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शिक्षक परिषदेने याबाबत सरकारकडे निवेदन देऊन निर्णय घेण्याची मागणी केली होती. तर मंगळवारी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ऑनलाइन आंदोलनही केले होते. यानंतर सरकारने हे आदेश काढले आहेत. या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेऊन त्यांना संधी देण्याची सूचना सरकारने केली आहे. यासाठी ७ ऑगस्टपर्यंत या विद्यार्थ्यांना शक्य असेल तेथे प्रत्यक्ष शाळेत बोलवून किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तोंडी परीक्षेचे आयोजन करावे, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
सोर्स : म.टा.