8वा वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन २५ ते ३० टक्के वाढणार!! | 8th Pay Hike Buzz!
8th Pay Hike Buzz!
2026 पासून लागू होण्याची शक्यता असलेला आठवा वेतन आयोग (8th Pay Commission) लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ घडवून आणणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने या दिशेने तयारी सुरू केली असून, हा निर्णय शिपाईपासून ते आयएएस अधिकाऱ्यांपर्यंत सर्व स्तरांवर दिलासा देणारा ठरेल. केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठव्या वेतन आयोगाची घोषणा झाली आहे. येत्या एक जानेवारी २०२६ पासून या आयोगाच्या अंमलबजावणीची शक्यता व्यक्त होत आहे.
मात्र आयोगासाठी अद्याप कोणतीही समिती नियुक्त करण्यात आलेली नाही. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांत काहीसे चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, प्रत्यक्षात आयोग लागू होऊन त्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात २५ ते ३० टक्के वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. सध्या देशात सुमारे ४९ लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारक आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सध्या जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन २०,००० रुपये असेल, तर आठव्या वेतन आयोगानुसार ते ४६,६०० ते ५७,२०० रुपयांपर्यंत जाऊ शकते. किमान पेन्शन सध्याच्या ९,००० रुपयांवरून वाढून २२,५०० ते २५, २०० रुपयांच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. विलंबामुळे चिंतेचे वातावरण आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला आणि शिफारशींच्या अंमलबजावणीला होणाऱ्या संभाव्य विलंबामुळे कर्मचारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे..
8व्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नव्या आशा आणि अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. शिपाई, सफाई कामगार, शिक्षक, लिपिक, प्रशासकीय अधिकारी ते वरिष्ठ IAS अधिकारी आणि सचिवांपर्यंत सर्वच स्तरांवरील कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 15 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वेतन आयोगाच्या शिफारशी आणि वेतनवाढीच्या ट्रेंडच्या आधारावर ही वाढ निश्चित केली जात आहे.
स्तर 1 ते 5 मधील कर्मचाऱ्यांना – ज्यामध्ये शिपाई, सफाई कामगार, कनिष्ठ लिपिक यांचा समावेश होतो – ₹18,000 पासून सुरू होणारे वेतन थेट ₹21,300 पर्यंत जाऊ शकते. हे बदल त्यांच्यासाठी मोठा आर्थिक दिलासा ठरणार आहेत. त्याचप्रमाणे, स्तर 6 ते 9 मधील शिक्षक, लिपिक आणि ग्रामविकास अधिकारी यांचे सध्याचे मूळ वेतन ₹35,400 ते ₹53,100 दरम्यान असून, हेच वेतन 8व्या आयोगामुळे ₹42,480 ते ₹63,720 पर्यंत पोहोचू शकते. यामुळे शिक्षण व ग्रामीण विकास क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल.
स्तर 10 ते 12 मध्ये येणारे विभागीय अधिकारी, अभियंते आणि मुख्याध्यापक यांच्यासाठीही हा आयोग अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. सध्याचे वेतन ₹56,100 ते ₹78,800 दरम्यान असून, ते वाढून ₹67,320 ते ₹94,560 दरम्यान होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, स्तर 13 व 14 मधील अनुभवी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना ₹1,23,100 ते ₹1,73,040 पर्यंत वेतन वाढ मिळू शकते.
सरकारच्या सर्वोच्च प्रशासकीय यंत्रणेतील स्तर 15 ते 18 – म्हणजेच संयुक्त सचिव, अतिरिक्त सचिव, सचिव आणि कॅबिनेट सचिव – या पदांवरील अधिकाऱ्यांना सर्वाधिक वेतनवाढीचा लाभ होण्याची शक्यता आहे. या पदांवरील सध्याचे वेतन ₹1,82,200 ते ₹2,50,000 दरम्यान असून, ते वाढून ₹2,18,400 ते ₹3,00,000 पर्यंत जाऊ शकते.
मूळ वेतन वाढल्यामुळे त्यावर आधारित भत्त्यांमध्ये – जसे की DA (महागाई भत्ता), HRA (घरभाडे भत्ता), TA (प्रवास भत्ता) – यामध्येही सरसकट वाढ होईल. परिणामी, कर्मचाऱ्यांचा एकूण पगाराचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढेल.
अद्याप 8व्या वेतन आयोगाची अधिकृत घोषणा झाली नसली, तरी 2026 च्या मध्यपूर्वी हा आयोग लागू होण्याची शक्यता आहे. आयोग स्थापन झाल्यानंतर अंतिम अहवाल तयार होण्यासाठी 1 ते 2 वर्षांचा कालावधी लागू शकतो.
या संभाव्य वेतनवाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्याच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर या वेतनवाढीमुळे त्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल. त्याचबरोबर, सरकारी यंत्रणेत काम करण्याची प्रेरणाही वाढेल आणि शासनाची सेवा पोहोचवण्याची कार्यक्षमता अधिक परिणामकारक होईल.