युवा प्रशिक्षण योजने बाबत मोठे स्पष्टीकरण! उमेदवारांना ११ महिन्यांची नोकरीची संधी! | Youth Training: Only 11 Months!
Youth Training: Only 11 Months!
प्राप्त माहिती नुसार, लाडका भाऊ, म्हणजेच युवा कार्य प्रशिक्षण योजनेत लागलेल्या शिकाऊ उमेदवारांसाठी ११ महिन्यांचीच संधी आहे असे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना केवळ ११ महिन्यांसाठी रोजगाराची संधी मिळेल. त्यांना सरकारी किंवा खासगी सेवेत कायम ठेवले जाणार नाही. या बद्दलची पूर्ण माहिती बघूया..
विधानसभेत काँग्रेसची मागणी
विनियोजन विधेयकावर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी शिकाऊ उमेदवारांना शासकीय सेवेत कायम करण्याची मागणी केली. बेरोजगारीच्या वाढत्या प्रमाणामुळे, या उमेदवारांना नोकरीत कायम ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही योजना फक्त ११ महिन्यांसाठीच असून, उमेदवारांना शासकीय सेवेत कायम करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले.
योजनेंतर्गत रोजगार संधी
या योजनेचा मुख्य उद्देश पदवीधर किंवा पदवीधर होण्याच्या मार्गावर असलेल्या युवकांना कामाचा अनुभव मिळवून देणे हा आहे. याअंतर्गत सुरुवातीला फक्त खासगी क्षेत्रात प्रशिक्षण देण्याची तरतूद होती, मात्र नंतर त्यात सरकारी सेवेलाही समाविष्ट करण्यात आले.
कायम नोकरीचा गैरसमज टाळावा
उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनीही स्पष्ट केले की, ही योजना फक्त ११ महिन्यांसाठीच आहे. त्यामुळे उमेदवारांनी या योजनेद्वारे शासकीय सेवेत कायम नियुक्ती होईल, असा गैरसमज करून घेऊ नये.