Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दहावी-बारावीच्या ‘या’ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, जाणून घ्या

SSC HSC Exams 2021

SSC, HSC Exam fee

SSC HSC Exams 2021 : Tenth and twelfth grade students who lost their parents during the Corona period have had their examination fees waived. This has given relief to the students who have lost their parents. School Education Minister Varsha Gaikwad gave information in this regard. Further details are as follows:-

करोना काळात पालक गमावलेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. यातून पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना दिलास देण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांकडून २०२२ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी शुल्क घेतले जाणार नाही. या परीक्षेत सहभागी होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात माहिती दिली.

Some students have lost their surviving parents or legal guardians / adoptive parents due to the outbreak of Corona virus. Due to financial constraints, such students may have difficulty in paying the Certificate Examination (Class X), Higher Secondary Certificate Examination (Class XII) fees in secondary schools.

त्यामुळे हे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळा येऊन पुढील वाटचाल खंडीत होण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यातील अशा बाधित विद्यार्थ्यांचे व्यापक हित विचारात घेऊन महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन २०२१-२२ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी तसेच इयत्ता बारावी या परीक्षेस सहभागी होणाऱ्या अशा नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. करोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


Maharashtra Ssc, Hsc Supplementary Result 2021 

SSC HSC Exams 2021 : The results of the re-examination will be announced on Wednesday for the students who did not agree with the marks obtained on the basis of internal assessment of class X and XII and also wanted to improve their marks. Subject wise marks will be available to the students from the website of the board and a copy of the result will also be available. Further details are as follows:-

दहावी, बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे केलेले गुणांकन न पटलेल्या, तसेच गुणांमध्ये सुधारणा करू इच्छिणाऱ्या, दहावी, बारावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी झालेल्या फेरपरीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर होणार आहे. मंडळाच्या वेबसाइटवरून विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण उपलब्ध होणार असून, निकालाची प्रतही घेता येईल.

The supplementary examination was conducted by Pune, Nagpur, Aurangabad, Mumbai, Kolhapur, Amravati, Nashik, Latur and Konkan. The examination was conducted for the students who failed the marks on the basis of internal assessment, as well as those who wanted to improve their marks, failed in class X, XII.

या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून दहावी व बारावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास गुणांची पडताळणी करण्यासाठी गुणपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहे. ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे, त्यामार्फत हे अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येतील, असे राज्य माध्यमिक मंडळाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी २१ ते ३० ऑक्टोबरपर्यंत व छायाप्रतींसाठी २१ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. या प्रक्रिया पार पाडल्यानंतरच विद्यार्थ्यांना पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार आहेत.

Application Process

पुढीलवर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ट व्हायचे आहे, अशा पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. याशिवाय नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट होणारे व आयटीआय अभ्यासक्रमातून ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्जही ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.


HSC Result 2021

SSC HSC Exams 2021 : Due to the transition condition of Covid 19 this year, the result of class XII was declared without examinations. The State Board of Secondary and Higher Secondary Education has appealed to the concerned students to register any objections/complaints on this result. Further details are as follows:-

यंदा कोविड १९ संक्रमण स्थितीमुळे बारावीचा निकाल परीक्षांशिवाय जाहीर झाला. या निकालावर काही आक्षेप/तक्रारी असतील तर त्या संबंधित विद्यार्थ्यांनी त्या नोंदवाव्यात असे आवाहन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केले आहे.

यासाठी २५ सप्टेंबर २०२१ पर्यंत विहित करण्यात आलेल्या नमुन्यात (प्रपत्र -अ) मध्ये अर्ज करायचे आहेत. २५ सप्टेंबरनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याबाबत सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य घटक यांनी नोंद घ्यावी, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत व अन्य मंडळामार्फत घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा सन २०२१ च्या मूल्यमापनासंदर्भात दाखल याचिका क्र.६२०/२०२१ बाबत सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी २४ जून २०२१ रोजी निकाल दिला आहे. त्यानुसार परीक्षेचा निकाल सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार जाहीर झाला. या निकालावर विद्यार्थ्यांना काही आक्षेप किंवा तक्रारी असतील तर त्याच्या निराकरणासाठी मंडळ स्तरावर व्यवस्था निर्माण करण्याबाबत आदेशित केलेले आहे.


HSC Result Update 2021 

SSC HSC Exams 2021 : The State Board of Secondary and Higher Secondary Education has issued the schedule for the twelfth assessment process. Accordingly, junior colleges have to complete the result process by July 23.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी मूल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक जारी केले आहे. यानुसार, २३ जुलैपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयांनी निकालाची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. बुधवार ७ जुलैपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाचे काम सुरू करावयाचे आहे. हे काम २३ जुलैपर्यंत पूर्ण करावयाचे आहे, म्हणजेच बारावीचा निकाल जुलैअखेरपर्यंत जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानेही सर्व मंडळांना जुलैअखेरपर्यंत निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.

कशी असेल मूल्यमापन प्रक्रिया? 

  • कनिष्ठ महाविद्यालयांनी ७ ते २३ जुलैपर्यंत अंतर्गत मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
  • त्या दरम्यान, १४ ते २१ जुलै या कालावधीत मुख्याध्यापक, प्राचार्यांनी निकाल समितीने प्रमाणित केलेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये भरायचे आहेत.
  • निकाल प्रमाणित करण्यासाठी प्रत्येक ज्युनिअर कॉलेजमध्ये एक सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे.
  • या समितीने निकाल प्रमाणित केल्यानंतर आणि ते प्राचार्यांनी संगणकीय प्रणालीत फीड केल्यानंतर मंडळ स्तरावर अंतिम निकाल तयार करण्याच्या कामाला सुरुवात होईल.
  • गुण ऑनलाइन फीड केल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांनी ते सीलबंद पाकिटात विभागीय मंडळात २१ जुलै ते २३ जुलै या कालावधीत जमा करायचे आहेत.

इयत्ता – मूल्यमापनाचा तपशील – भारांश

  • दहावी – इयत्ता दहावीतील बोर्ड परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण – ३० टक्के
  • अकरावी – इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण – ३० टक्के
  • बारावी – बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण – ४० टक्के

Evaluate 12th Standard Students with the Formula 30:30:4

SSC HSC Exams 2021 : The Board has announced the formula of 30:30:40 for evaluation of results. This formula is based on the policy of the CBSE Board. This will include 30 per cent of the average marks of the three subjects with the highest marks in Class X, 30 per cent of the subject wise marks in the final results of Class XI and 40 per cent of the subject marks in all the examinations and similar examinations throughout the year.

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाचा तिढा अखेर सुटला असून, मंडळाकडून निकालाच्या मूल्यमापनासाठी ३०:३०:४० चे सूत्र जाहीर झाले आहे. हे सूत्र सीबीएसई मंडळाच्या धोरणावरच अवलंबून आहे. यात दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांच्या सरासरी गुणांचे ३० टक्के, अकरावीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय गुणांचे ३० टक्के आणि बारावीच्या वर्षभरातील सत्र परीक्षा, सर्व चाचण्या आणि तत्सम परीक्षांच्या विषयनिहाय गुणांच्या ४० टक्क्यांच्या गुणांचा अंतर्भाव असेल.

कनिष्ठ महाविद्यालयांनी निकालाची कार्यवाही कशी आणि कधीपर्यंत करावी, याचे सविस्तर वेळापत्रक मंडळाकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. बारावी निकालाची मूल्यमापन प्रक्रिया शालेय शिक्षण विभागाने तब्बल महिनाभराने म्हणजेच शुक्रवारी जाहीर केली.

SSC HSC Exams 2021

बारावीचा निकाल तयार करण्यासाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर मुख्याध्यापक आणि प्राचार्यांसह कमाल ७ सदस्य असलेली निकाल समिती स्थापन करण्याच्या सूचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत.  हा निकाल कनिष्ठ महाविद्यालयाने वर्षभर घेतलेल्या विषयनिहाय ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या वा तत्सम मूल्यमापनानुसार अवलंबून असेल. यासाठी संगणक प्रणाली विकसित केली असून, त्यानुसार आराखडा आणि  गुणांचा ताळमेळ बसवला जाणार आहे.


SSC HSC Exams 2021 : Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has postponed Class X and XII examinations. The 12th exam will now be held at the end of May, while the 10th exam will be held in June. 

दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवड यांनी नुकतीच दिली आहे. दहावीची परीक्षा ही जूनच्या सुरूवातीला होणार आहे तसेच बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री वर्षा गायकवड यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा आता मे महिन्याच्या अखेरीस होईल तर दहावी परीक्षा जून महिन्यात घेतली जाईल.


SSC HSC Exams 2021 – शुल्कासह ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढ

SSC HSC Exams 2021: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has given an online extension along with fees for application for the Class X-XII examination.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित दहावी-बारावीच्या परीक्षेच्या अर्जाकरिता शुल्कासह ऑनलाइन मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता नावनोंदणी अर्ज अतिविलंब शुल्कासह ऑनलाइन पद्धतीने शुक्रवार (ता. ९) ते रविवार (ता. ११) दरम्यान भरता येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

राज्य मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या फॉर्म नंबर १७ भरून परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एप्रिल-मे २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यासाठी २८ नोव्हेंबर २०२० ते १० फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी निश्चित केला होता. आता रविवारपर्यंत अतिविलंब शुल्कासह खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ

  • दहावीच्या विद्यार्थ्यांनी येथे क्लिक करा http://form17.mh-ssc.ac.in
  • बारावीच्या विद्यार्थ्यांनी येथे क्लिक करा : http://form17.mh-hsc.ac.in

SSC HSC Exams 2021 – परीक्षा ऑफलाइनच

SSC HSC Exams 2021 : The State Board has once again clarified that the written examinations for Class X and XII will be conducted offline. As the state government has exempted the candidates from the restrictions, the examinations will be held as per the scheduled schedule.

SSC HSC Exams 2021 – परीक्षा ऑफलाइनच –  दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे राज्य मंडळाने पुन्हा एकवार स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने परीक्षार्थींना निर्बंधांतून सूट दिलेली असल्यामुळे या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पार पडणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचीच तयारी सुरू आहे. त्याचप्रमाणे ३० एप्रिलपर्यंत शनिवारी बारावीचा केवळ एकच पेपर येत आहे; तसेच राज्य सरकारने परीक्षार्थींना निर्बंधांतून सूट दिलेली असल्यामुळे या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्यासाठी राज्य मंडळाकडून प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या संदर्भातील अधिक माहिती लवकरच प्रकाशित करू…


SSC HSC परीक्षेचे सुधारित अंतिम वेळापत्रक जाहीर

SSC HSC Exams 2021 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने एप्रिल-मेमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी पेपरच्या वेळा वाढवून देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या निर्णयानुसार बोर्डाच्या परीक्षेसाठी वाढवून दिलेल्या वेळेसह परीक्षांचे सुधारित अंतिम वेळापत्रक आणि त्याचबरोबर परीक्षेसाठीच्या मार्गदर्शक सूचनाही जाही करण्यात आल्या आहेत.

राज्य मंडळाने वाढीव वेळेसह सुधारित अंतिम वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहे. त्यानुसार दहावीच्या लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान, तर बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान होणार आहे. वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


SSC HSC परीक्षेच्या तासात वाढ – विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

SSC HSC Exams 2021: SSC HSC परीक्षेच्या तासात वाढ – विद्यार्थ्यांना मोठा दिलासा – दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ मिळणार आहे. गेले वर्षभर विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 21 मे 2021 या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.

विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे. त्यामुळे त्यांना अर्ध्या तासाचा वेळ वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षा आता साडे तीन तासांची असणार आहे. परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


SSC HSC परीक्षेसाठी अभियान – परीक्षा ऑफलाईन 

SSC HSC Exams 2021 : इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन घ्यायची असून, त्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांना सज्ज करण्यासाठी ‘वुई कॅन डू इट’ असे एक अभियान चालविले जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी एका बैठकीत हि माहिती दिली.

बंद निवासी शाळांतील फक्त दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची आणि परीक्षेसाठी सुविधा देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.


राज्यात दहावी बाराची परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार

SSC HSC Exams 2021 : राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी विधानसभेत स्पष्ट केले. या संदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी विधान सभेत मुद्दा उपस्थिती केला होता. त्यावर गायकवाड यांनीसांगितले की, दहावी व बारावीच्या परीक्षा हा महत्वाचा विषय असून विभागा मार्फत चर्चा केली जात आहे.

अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देताना परीक्षा पद्धतीने आणि सुरक्षितपणे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. परीक्षेचा अभ्यासक्रम कमी करणार असल्याचे आणि त्याचे नियोजन आधीच करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


SSC HSC Exams 2021 : ssc hsc exam 2021 final timetable available on maharashtra board website at mahahsscboard in – राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत होती. मात्र राज्य मंडळाकडून १६ फेब्रुवारीला जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकावर मागवण्यात आलेल्या सूचनांनतर शुक्रवारी दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मेदरम्यान होणार असल्याचे राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे एप्रिल-मे २०२१मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक १६ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आले होते. त्यावर आलेल्या सूचनांचे अवलोकन करून राज्य मंडळाने शुक्रवारी दहावी व बारावीचे संभाव्य वेळापत्रकच अंतिम केल्याचे जाहीर केले. अंतिम वेळापत्रक राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.


दहावी-बारावी परीक्षांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ!!

SSC HSC Exams 2021 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एप्रिल महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षेला खासगीरित्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्यासाठीची मुदत वाढवून सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

सोमवार २२ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या वेबसाइटवर जाऊन दहावी साठी http://form17.mh-ssc.ac.in या लिंकवर, तर बारावीसाठी http://form17.mh-hsc.ac.in या लिंकवर नोंदणी करता येणार आहे. विलंब शुल्कासह १ ते ७ मार्च या कालावधीत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. मात्र त्यानंतर यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दहावी व बारावी परीक्षेसाठी अर्जही ऑनलाइन पद्धतीने नियमित व विलंब शुल्कासह स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज त्यांच्या माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेजांमार्फत भरावे. माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेजांतील प्राचार्य यांनी ऑनलाइन अर्ज भरताना कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर सरकारने व विशेषतः आरोग्य विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या सर्व सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.

सोर्स : म. टा.


SSC HSC Exams 2021 : राज्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, पुन्हा लॉकडाउन होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे दहावी व बारावीच्या परीक्षा होणार की, नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात किंवा ऑनलाइन घेण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होऊ लागली आहे. मात्र, तसा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही. यामुळे परीक्षा ऑफलाइनच होतील, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्यात वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही भागांमध्ये ‘नाइट कर्फ्यू’ लावण्यात आला आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास लॉकडाउनची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये जाहीर केलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांवरही करोनाचे पुन्हा सावट आले आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात यावी किंवा ऑनलाइन घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे ट्विटर मार्फत करण्यात येत आहे.

वाढत्या करोनामध्ये प्रत्यक्षात परीक्षा घेतल्यास आमच्या मुलांचा जीव धोक्यात घातला जाऊ शकतो. अनेक शाळांमध्ये व परीक्षा केंद्रावर पुरेशा सुरक्षा व्यवस्था नाही त्यामुळे ऑफलाइन परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आमच्या मुलांच्या जिवाची काळजी घेऊन दहावी व बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली आहे. तर काही विद्यार्थी व पालकांनी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना ट्विटरवरून केली आहे.


SSC HSC Exams 2021 : राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच, शालेय विद्यार्थ्यांनाही आता करोनाची लागण होत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयता दहावी व बारावीच्या परीक्षा कशा होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या परीक्षा ऑनलाइन घेण्यास पालक आणि संघटनांची पसंती असली, तरी तज्ज्ञांचा विरोधाचा सूर आहे.

राज्यातील करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने गेल्या आठवड्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत, तर इयत्ता दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होणार आहे. करोनामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आले. दिवाळीनंतर राज्यात करोनाचा कमी प्रादुर्भाव असणाऱ्या ठिकाणी इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर दीड महिन्याने काही जिल्ह्यांत इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या. मात्र, मुंबई आणि परिसरातील शाळा अजूनही बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन सुरू असले, तरी ग्रामीण भागात त्यास मर्यादा आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा अपेक्षित अभ्यास पूर्ण झालेला नाही. आता परीक्षा जवळ आल्या असताना, अनेक ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासोबतच शालेय विद्यार्थ्यांना करोनाची लागण होत आहे. अशा परिस्थितीत अनेक जिल्ह्यांत २८ फेब्रुवारीपर्यंत पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय झाला आहे. या सर्वांचा परिणाम इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे नियोजन करण्यावर होत असल्याचे चित्र आहे.

मुलांच्या सुरक्षेच्या कारणामुळे पालकांकडून ऑनलाइन परीक्षेला पसंती देण्यात येत आहे. मात्र, दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ३१ लाख इतकी आहे. अशा परिस्थितीत लॅपटॉप, कम्प्युटर किंवा स्मार्टफोनवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात अडचणी आहेत. त्यातच इंटरनेट कनेक्टिव्हिटीची मोठी समस्या ग्रामीण भागात आहे. सध्या शहरी भागातही इंटरनेटचा वेग मंदावल्याच्या अनेक तक्रारी आहेत. अशा परिस्थितीत ऑनलाइन परीक्षा तांत्रिक अडचणीची व गैरसोयीचे ठरू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


10 वी, 12 वी परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर

SSC HSC Exams 2021 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल-मे २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होईल. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच परीक्षा फेब्रुवारी-मार्चऐवजी एप्रिल-मे या कालावधीत होईल.

करोना व लॉकडाउनमुळे बारावी व दहावी परीक्षांच्या निकालास विलंब झाला. लॉकडाउनमुळे १० महिन्यांहून अधिक काळ शाळा, महाविद्यालये बंद होती. परिणामी २०२१ मधील परीक्षा एप्रिल-मे या कालावधीत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यानंतर विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. दरम्यानच्या काळात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या. यानंतर आता राज्य मंडळाने संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.

शाळा व कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे, या हेतूने; तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षेपूर्वी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असून, विद्यार्थ्यांनी याच वेळापत्रकाचा आधार घ्यावा. सोशल मीडियावर प्रसिद्ध होणारे वेळापत्रक ग्राह्य धरू नये. प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा व अन्य परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे शाळा व महाविद्यालयांना कळवले जाईल, असे मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.

हरकती, सूचना पाठवा

‘दहावी व बारावीच्या संभाव्य वेळापत्रकाबाबत काही हरकती, सूचना असल्यास त्या राज्य अथवा विभागीय मंडळाकडे २२ फेब्रुवारीपर्यंत लेखी स्वरूपात पाठवाव्यात,’ असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळवले आहे.


दहावी, बारावीच्या परीक्षा कधी? निकाल कधी? जाणून घ्या….  

SSC HSC Exams 2021 : SSC HSC Exam Dates 2021: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत आणि बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे या कालावधीत आयोजित केली जाणार आहे.

करोनासाठी आवश्यक ती काळजी घेऊन या परीक्षांचे नियोजन केले जाणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. परीक्षा झाल्यानंतर बारावी परीक्षांचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्या तर दहावीचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

निकाल कधी?

दहावी, बारावी परीक्षेचे निकाल कधी जाहीर केले जातील याबाबतची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. दहावीचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस लागणार आहे. बारावीचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

गेले अनेक दिवस लाखो विद्यार्थी परीक्षांच्या तारखांची आतुरतेने वाट पाहत होते. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा विलंबाने होत आहेत.


दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखेबाबत शिक्षणमंत्र्यानी दिली महत्त्वाची माहिती

SSC HSC Exams 2021 : Schools in the state are being started in phases, now the important information given by the Minister of Education about the 10th and 12th examinations – गेल्या वर्षभरापासून देशात आणि राज्यात धुमाळूक घालत असलेला कोरोनाचा संसर्ग आता हळूहळू नियंत्रणात येत आहे. तसेच कोरोनाविरोधातील लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यातील मुंबई वगळता इतर भागातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग काही काळापूर्वी सुरू झाले होते. तर आता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होत आहेत. त्यानंतर आता दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबतही महत्त्वाची माहिती शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देताना वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या मध्यावर किंवा शेवटच्या आठवड्यात घेण्याबाबत विचार सुरू आहे. याबाबत निश्चित असा निर्णय लवकरच घेतला जाईल.

दरम्यान, नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारने काल केली होती. तसेच याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला असतील, अशी सूटही सरकारकडून देण्यात आली आहे. मात्र मुंबई महानगपालिका क्षेत्रातील मात्र पुढील निर्णयापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

.

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Darshan kognole says

    निकाल जाहीर कधी होनार

  2. Sandhya Satpute says

    Exams postponed zaale aahet tumhi exams cancel pn nahi krt aahat aamchi kahich study nahi zali aahe ani aamchya ghari aamche grandparents aahet aamhi offline exam deyala tyar aahot but aamche grandparents ghabrtat ki tyana kahi tras zala tr? Aamche parents ghabrtat kahi risk gheyla tyar nahi aahet m aamhi students ne ky kraych ? Veg veglya places vrun students yenar tithe aamchi checking honar ektr aamhala aamchya clg aayvji dusr sch/clg che center lagle aahet tithe jr ekada student positive nighala tr tumhi ky kral kinva aamhi ky krnar? Tumhi clg seel krnar ki tya student chya center classroom la seel krnar? Tumhi 10th chi exam cancel keli m aamhi ky kel aahe aamhala pn aamchi kalji aahe aamchya ghratlyana sudha aamchi kalji aahe So maj as mhaan aahe ki ektr exam cancel tri zali pahijel kinva exam online gheyla havi

  3. Darshan kognole says

    वेळापत्रक कुठे आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड