खुशखबर, कृषी विभागात बीज गुणन केंद्रातील २४८ अस्थायी पदभरतीला मंजूरी! – Seed Multiplication Centre Recruitment
Seed Multiplication Centre Recruitment
Seed Multiplication Centre Recruitment – आताच प्राप्त नवीन अपडेट नुसार, महाराष्ट्र राज्य शासनाने कृषी आयुक्तालयांतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षात २४८ अस्थायी पदांना मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे कृषी विभागातील कर्मचाऱ्यांची कमतरता दूर होण्यास मदत होणार आहे, असा दावा कृषी विभागाने केला आहे. यासंबंधित शासन निर्णय बुधवारी (ता. २५) प्रसिद्ध करण्यात आला आहे. कृषी क्षेत्रातील सध्याच्या वाढत्या गरजांनुसार कृषी विभागातील अस्थायी पदांची नियुक्ती कायम ठेवण्याची मान्यता राज्य सरकारने दिली आहे. या शासन निर्णयानुसार ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ रिक्त असलेली पदे भरण्यात येणार नाही.
परंतू या निर्णयाद्वारे विभागात सध्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या अस्थायी पदांनाच याचा लाभ मिळणार आहे. कृषी आयुक्तालयांतर्गत असलेल्या तालुका बीज गुणन केंद्रामार्फत शेतकऱ्यांना उच्च प्रतीची बियाणे आणि कृषी सेवा उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होतो. या अनुषंगाने येथे कार्यरत असलेल्यांसाठी या शासन निर्णयाद्वारे या तालुका बीज गुणन केंद्रातील २४८ पदे १ सप्टेंबर २०२४ पासून २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या विभागातील कृषी अधिकारी वर्ग-२, कृषी पर्यवेक्षक वर्ग-३, कृषी सहाय्यक वर्ग-३, शिपाई, प्रशिक्षित मजूर वर्ग-४ आणि टिलर ऑपरेटर कर्मचाऱ्यांची नियुक्ती कायम राहणार आहे. तसेच शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ अधिक वेगाने पोहोचवण्यास ही भरती मदत करेल. ही पदे तात्पुरती असली तरी त्यामुळे विभागाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे, असा दावा कृषी विभागाने केला आहे.