पुणे महानगर पालिका अंतर्गत शिष्यवृत्तीसाठी अर्जाची प्रक्रिया जाहीर, अर्ज करा – Pune Mahanagar Palika Scholarship
Pune Mahanagar Palika Scholarship
महापालिकेतर्फे दहावी आणि बारावीची परीक्षा चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी येत्या गुरुवारपासून (आठ ऑगस्ट) ते ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी ही माहिती दिली. दहावीच्या विद्यार्थ्यांना १५ हजार, तर बारावीच्या विद्यार्थ्यांना २५ हजार रुपयांचे अर्थसाह्य दिले जाते. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर ३० सप्टेंबर रोजी दुपारी साडेपाचपर्यंत अर्ज करावा लागेल. तसेच महाराष्ट्रातील विविध योजने आणि नोकरी विषयक सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
काय आहे पुणे महानगर पालिकेची शिष्यवृत्ती योजना ?
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
■ महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या दहावी व बारावीमध्ये ८० टक्क्यांहून
अधिक गुण मिळवलेल्या खुल्या गटातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मौलाना अबुल कलाम आझाद योजनेंतर्गत अर्थसाह्य केले जाते.
■ ७० टक्के गुण मिळवलेल्या पुणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना, ४० टक्के अपंगत्व असलेल्या व ६५ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थी यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे योजनेंतर्गत इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अर्थसाह्य दिले जाते.
■ यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे. दहावी, बारावीनंतर शासनमान्य संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती मिळेल.
Comments are closed.