राज्यात पोलिस भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सध्या राज्यात तब्बल ३३ हजार पोलिस पदे रिक्त आहेत. मात्र, भरती प्रक्रिया कधी सुरू होणार, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.

राज्यातील अनेक तरुण पोलिस भरतीसाठी जोरदार तयारी करत आहेत. सरकारकडून वेळोवेळी आश्वासनं दिली जात असली तरी अद्याप भरतीची प्रक्रिया सुरू झालेली नाही. डिसेंबर २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असूनही कोणतीही हालचाल दिसून येत नाही.
विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९,००० पोलिस पदांसाठी भरती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, निवडणुका संपल्यानंतरही या भरतीबाबत कोणतीही ठोस घोषणा झालेली नाही, त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी वाढत आहे.
राज्यातील हजारो उमेदवार पोलिस भरतीच्या तयारीसाठी मेहनत घेत आहेत. मात्र, प्रक्रिया सुरू न झाल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, सरकारने लवकरात लवकर भरती जाहीर करावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















