नवीन अपडेट! लाडकी बहीण योजनेत कुठलाही नवीन निकष नाही!-No new criteria in the Ladki Bahin
There are no new criteria in the Ladki Bahin Yojana.
लाडकी बहीण योजनेसाठी कोणतेही नवीन नियम लावलेले नाहीत किंवा वेगळा निकष आणलेला नाही (No new criteria in the Ladki Bahin). आम्ही स्वतःहून कोणाकडूनही पैसे परत घेतले नाहीत आणि परत मागणारही नाही. मात्र, नियमाच्या बाहेर जाऊन कोणाला फायदा मिळत असेल, तर तो थांबवला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी एस. पी. कॉलेजच्या मैदानावर सुरू असलेल्या हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेला भेट देण्यासाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार आणि लाभार्थ्यांकडून वसुली केली जाणार या चर्चांना पूर्णविराम दिला.
“न्याय्य हक्क असलेल्या महिलांनी घाबरण्याची गरज नाही!”
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की, ज्यांनी योजनेच्या निकषात बसत नसतानाही लाभ घेतला, त्यांच्याकडून पैसे परत घेतले जातील आणि त्यांना त्रास दिला जाईल. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही शक्यता फेटाळून लावत स्पष्ट केले की, “काही महिलांना आपले पात्रतेचे निकष पूर्ण होत नाहीत हे समजल्यावर त्यांनी स्वतःहून योजनेतून माघार घेतली आणि पैसे परत केले आहेत. आम्ही कोणावरही जबरदस्ती करणार नाही. पण, लोकांच्या पैशांचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे आणि महालेखाकारासमोर हिशोब द्यावा लागतो. त्यामुळे नियम मोडून लाभ घेणाऱ्यांचा फायदा बंद केला जाईल. यासाठी आम्ही चौकशी सुरू केली आहे. परंतु, इतर महिलांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही!”