MPSC महत्वाचा अपडेट-मराठा जातीच्या उमेदवारांना ओबीसीचा पर्याय उपलब्ध!!- MPSC Recruitment 2025

MPSC Recruitment 2025

MPSC Updates 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्य सेवा गट-ब या संवर्गातील पदभरती मराठा (कुणबी) उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या भरती प्रक्रियेसाठी मराठा जातीच्या उमेदवारांना कुणबी दाखला मिळाल्यास इतर मागासवर्गाचा दावा करण्याचा विकल्प आयोगाने उपलब्ध करून दिला आहे. तसे शुद्धिपत्रकच ‘एमपीएससी’द्वारे जाहीर करण्यात आले आहे. या भरतीअंतर्गत एकूण 65 पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावर 27 जूनपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 11 जुलै 2025 पर्यंत असणार आहे. तसेच या MPSC भरतीचे सिल्याबस आणि परीक्षा पद्धती या लिंक वर उपलब्ध आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

शासन निर्णय 28 मे 2024 नुसार, अराखीव किंवा आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज सादर करणार्‍या उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे ओबीसी जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास अशा उमेदवारांना इतर मागास वर्गाचा ओबीसी दावा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ज्या उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले आहे, अशा उमेदवारांनी इतर मागास वर्गाचा दावा करण्यासाठी विकल्प सादर करणे आवश्यक असल्याचे जाहिरातीमध्ये म्हटले आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

संबंधित उमेदवार आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईलमधील सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकरीता उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंकसमोर दर्शविण्यात आलेल्या क्वेशन या बटनावर क्लिक करावे आणि विचारण्यात येणारी माहिती नमूद करून विकल्प सादर होतील. सामाजिक व शैक्षणिकद़ृष्ट्या मागासवर्ग तसेच इतर मागासवर्गाचा दावा करण्याकरीता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल. सामाजिक व शैक्षणिकद़ृष्ट्या मागासवर्गाचा तसेच इतर मागासवर्गाचा विकल्प सादर केलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल घटकचा लाभ घेता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले शुद्धिपत्रक उमेदवारांनी पाहणे आवश्यक आहे.

 

 


 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) स्पर्धा परीक्षांप्रमाणेच सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांसाठीही किमान पर्सटाइल अर्हतामान लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय यापुढे घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांना लागू होणार असल्याचे ‘एमपीएससी’ने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.एमपीएससीच्या 66 नियमावलीतील नियम क्रमांक ८ (vi) मध्ये १३ जानेवारी २०२१ रोजीच्या सुधारणेसह स्पर्धा परीक्षांप्रमाणेच सरळसेवा भरती प्रक्रियांकरिता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांसाठीदेखील किमान पर्सटाइल अर्हतामान लागू होईल. या निर्णयानुसार आता क गटाच्या परीक्षांसाठी किमान पसेंटाइल अर्हतामान लागू होणार आहे. पसेंटाइल प्रणाली उमेदवाराच्या गुणांची तुलना इतर सर्व उमेदवारांच्या गुणांशी करते आणि त्या उमेदवाराने किती टक्के उमेदवारांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे, हे दर्शवते. एमपीएससी परीक्षेत प्राथमिक व मुख्य परीक्षेचे गुण सामान्य कार्य करण्यासाठी पर्सेटाइल वापरले जाते.

 

सरळसेवा भरतीच्या अनेक परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. एमपीएससीने सरळसेवा भरती परीक्षेला पसेंटाइल गुणांकन पद्धत लागू केली आहे, याचा अर्थ या परीक्षांवर एमपीएससीची देखरेख असेल. त्यामुळे या परीक्षांमध्ये गैरप्रकार टळतील, अशी आम्हाला आशा आहे.

पसेंटाइल म्हणजे काय ?
पसेंटाइल म्हणजे ० ते १०० पर्यंतची एखाद्या विशिष्ट मूल्याच्या खाली असणाऱ्या संख्यात्मक मूल्यांची टक्केवारी. सोप्या भाषेत सांगायचे तर, पसेंटाइल म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांचा स्कोअर किती जणांपेक्षा जास्त आहे, हे दाखवणारी टक्केवारी. उदाहरणार्थ समजा एखाद्या परीक्षेत १०० विद्यार्थी बसले आणि तुम्हाला २० पसेंटाइल आहेत, तर याचा अर्थ असा की, तुमच्यापेक्षा कमी गुण २० विद्यार्थ्यांना मिळाले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीत कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे सक्तीचे करण्यात आले आहे. उमेदवारांना आधार ऑनलाइन ई-केवायसी, आधार ऑफलाइन पेपरलेस डिजिटल केवायसी, आधार ऑफलाइन पेपर आधारित केवायसी, नॉन-आधार ऑफलाइन केवायसी या चार पद्धतींपैकी कोणत्याही एका पद्धतीने ओळख पडताळणी (केवायसी) करावी लागेल. एकदाच नोंदणी करताना उमेदवाराने मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी नोंदवणेही आवश्यक आहे. उमेदवाराने आधार आधारित पडताळणी निवडली, तर आधार क्रमांकाशी संलग्न मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे. यामुळे उमेदवारांची ओळख अचूक होईल, फसवणूक व चुकीच्या माहितीला आळा बसेल. भरती प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा यांच्या विविध टप्प्यांवर आधार प्रमाणीकरण वापरता येईल.

 


स्पर्धा परीक्षेत गैरप्रकाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नवीन निर्णय घेण्यात आला आहे. ज्यात भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूर्वीच उमेदवाराने आयोगाच्या अर्ज प्रणालीमध्ये खात्याची आधार व इतर पद्धतीने ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ही पडताळणी केली नाही तर उमेदवारांना कोणत्याच पदासाठी अर्ज करता येणार नाही. यासंदर्भात एमपीएससीने परिपत्रक शुक्रवारी जाहीर केले. स्पर्धा परीक्षेतील पारदर्शकेतसाठी हा चांगला निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरबुडे यांनी दिली. राज्यातील विविध परीक्षांमध्ये व भरतीप्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आता एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीमध्ये कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांना खालील चारपैकी कोणत्याही एका पद्धतीने ओळख पडताळणी करावी लागणार आहे, आधार ऑनलाइन ई-केवायसी, आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल केवायसी, आधार ऑफलाईन पेपर आधारित केवायसी किंवा नॉन-आधार ऑफलाईन केवायसी. ही प्रक्रिया उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे. एकदाच नोंदणी करताना उमेदवाराने आपला मोबाईल नंबर आणि ई-मेला आयडी प्रणालीत नोंदवणे बंधनकारक असून, आधार आधारित ओळख पडताळणीसाठी आधार क्रमांकाशी संलग्न मोबाईल क्रमांकदेखील द्यावा लागणार आहे.

MPSC Chaos – A True Test of Students' Patience!

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अशी असेल पद्धत

एमपीएससीच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये उमेदवाराच्या खात्यात आधार क्रमांक नोंदविण्याची सुविधा मार्च २०१७ पासूनच उपलब्ध आहे. मात्र आता ती प्रक्रिया सक्तीची करण्यात आली आहे. या व्यवस्थेमुळे उमेदवाराची ओळख अचूकरीत्या अधिप्रमाणित करता येणार आहे. त्यामुळे चुकीच्या माहितीला आळा बसेल. विशेष म्हणजे, विशिष्ट ओळख प्राधिकरण आणि राज्य शासनाने स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर उमेदवारांचे प्रमाणीकरण करण्यासाठी स्वेच्छेने आधार प्रमाणीकरणास एमपीएससीला अधिकृत मान्यता दिली आहे.

शासन सेवेतील विविध पदभरतीसाठी महारष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्यासाठी संबंधित उमेदवाराला प्रथम ऑनलाइन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर विहित पद्धतीने नोंदणी करावी लागेल. तसेच विहित पद्धतीने नोंदणीनंतर संबंधित खात्यामध्ये अर्हतेसंदर्भातील तपशील नोंदवावा लागेल. आयोगाच्या ऑनलाइन प्रणालीवर नोंदणीकृत उमेदवारांच्या ओळख पडताळणीसाठी उमेदवारांच्या खात्यात आधार क्रमांक नोंदवण्याची पद्धती व सुविधालागू केली आहे.

गैरप्रकार थांबतील
मागे पूजा खेडकरसारखे प्रकरण झाले. त्यामुळे अनेक बदल स्पर्धा परीक्षेच्या नियमावलीत केले जात आहेत. आता ई-केवायसीमुळे बनावट प्रोफाइलला आळा बसून विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. – महेश बडे, स्पर्धा परीक्षा प्रतिनिधी.



‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’चा कारभार सध्या विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरतोय. “महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४” ची उत्तरतालिका ४ मार्च रोजी प्रसिद्ध झाली. पण निकाल मात्र तब्बल दीड महिन्यानंतर, म्हणजे १३ मेच्या रात्री उशिरा जाहीर झाला. एवढ्या वेळात हजारो उमेदवारांची झोप उडाली होती. दिवसरात्र अभ्यास करणाऱ्या मुलांचा संयम पार तुटला होता, कारण निकालाच्या प्रतीक्षेत त्यांचे जीवन थांबूनच गेले होते.

 

‘रटाळ धोरणां’चा शिकार झालेली विद्यार्थ्यांची पिढी
एमपीएससीच्या ‘ढिम्म’ कार्यपद्धतीमुळे विद्यार्थ्यांची मानसिक आणि शारीरिक कुचंबणा झालीय. परीक्षा झाली, उत्तरतालिका आली, पण निकाल निघेचना! इतका वेळ लावायचा, तर उत्तरतालिका कशासाठी? दरवर्षी या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांनाच बसतोय. समाज माध्यमांवरून संतप्त प्रतिक्रियांचा भडीमार सुरू झाला असून, आयोगाच्या सचिवांची भूमिका अधिकच संशयास्पद वाटतेय. विद्यार्थ्यांचे म्हणणे एकच – “हे आमच्या भविष्याचं खेळणं केलं जातंय!”

निकालाच्या प्रतीक्षेत जळणाऱ्या आशा – आणि मौनव्रती अधिकारी
इतकी मोठी परीक्षा, हजारो परीक्षार्थी आणि मग अचानक दीड महिना शांतता! आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव दोघेही निकालाच्या विलंबावर काहीच प्रतिक्रिया देत नाहीत. अभ्यास करून थकलेले, मानसिक दबावाखाली असलेले उमेदवार जेव्हा अधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरणासाठी फोन करतात, तेव्हा त्यांना उत्तर सुद्धा मिळत नाही. हे फक्त अन्यायकारकच नाही, तर अत्यंत अमानवीही आहे.

मुख्य परीक्षेसाठी वेळच नाही – विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलेली आयोगाची कृपा!
२९ जून २०२५ रोजी मुख्य परीक्षा होणार आहे. मात्र पूर्व परीक्षेचा निकाल इतक्या उशिरा जाहीर झाल्यामुळे अनेकांना केवळ ४० दिवस अभ्यासासाठी मिळणार आहेत. विशेषतः जे काठावर पास झालेत, त्यांच्यासाठी ही वेळ पुरेशी नाही. त्यांच्या मनात अस्वस्थता, भीती आणि असमंजसतेचं वातावरण आहे. अशा स्थितीत चांगल्या तयारीची अपेक्षाही करणे अन्यायकारक ठरते.

वेळापत्रकाचा बोजवारा – ‘आश्वासन’ फक्त कागदावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळापत्रक नियमित करण्याचे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात वेळापत्रकच अस्तित्वात नाही. परीक्षा कधी होणार? निकाल कधी लागणार? मुख्य परीक्षा पुढे ढकलणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनाही नाहीत, आणि आयोगालाही! ही विस्कळीत व्यवस्था विद्यार्थ्यांच्या भावी करिअरवर घाला घालतेय.

सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक – ‘एमपीएससी’वर टीकेची झोड
फेसबुक, एक्स (पूर्वीचा ट्विटर), इंस्टाग्राम या सर्वच समाज माध्यमांवर उमेदवार आपला संताप व्यक्त करत आहेत. “आम्ही फक्त अभ्यासासाठी जन्मलोय का?” “आयोग कधी जागं होणार?” असे प्रश्न सर्रास विचारले जात आहेत. तर काहीजणांनी थेट सचिवांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत त्यांना उत्तर देण्याची मागणी केली आहे. आयोगाने यातून धडा घ्यायला हवा.

४७९ पदांवर भरती – पण नियोजन शून्य!
ही परीक्षा म्हणजे ४७९ पदांची भरतीप्रक्रिया आहे – सहायक कक्ष अधिकारी (५४), राज्य कर निरीक्षक (२०९) आणि पोलीस उपनिरीक्षक (२१६). ऑक्टोबर २०२४ मध्ये जाहिरात निघाली आणि जानेवारी २०२५ ला परीक्षा झाली. मात्र नियोजन, निकाल व प्रक्रिया पारदर्शक आणि वेगवान व्हायला हवी होती. ती झालीच नाही. या सगळ्यामुळे पात्र उमेदवारांची मनःस्थिती पूर्णपणे खचली आहे.

आता तरी सुधारणा होणार का?
हा केवळ एक निकाल नाही, तर विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा, भविष्याचा आणि विश्वासाचा विषय आहे. आयोगाने एकदाचा निकाल जरी दिला असला, तरी ज्या पद्धतीने दिला – तो अत्यंत हलगर्जीपणा आणि असंवेदनशीलतेचा नमुना होता. पुढच्या वेळेस हीच चूक पुन्हा होऊ नये, यासाठी ठोस सुधारणा व्हायलाच हव्यात. कारण हा प्रश्न केवळ वेळेचा नाही – हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या जीवनाचा आहे.

 

: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणारी ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) संयुक्त मुख्य परीक्षा २०२४’ आणि महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनी मर्यादितद्वारे (महाजनको) रसायनशास्त्रज्ञ संवर्गातील विविध पदांसाठीची सरळसेवा भरती परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दोन्ही परीक्षा २९ जूनलाच असल्याने नेमकी कोणता पेपर द्यावा, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. ‘महाजनको ‘तर्फे कनिष्ठ सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ आणि कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ या पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी एमपीएससी गट-ब मुख्य परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. ५ जूनला ही परीक्षा होणार असल्याचे परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. त्यामुळे ‘महाजनको ‘ने परीक्षेच्या तारखेमध्ये बदल करावा, अशी मागणी विद्याथ्यर्थ्यांनी केली आहे.

याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले, की “महाजनको’ने परीक्षेची तारीख निश्चित करताना त्या दिवशी कोणती परीक्षा आहे की नाही, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. एकाच दिवशी दोन पेपर असल्याने एका पेपरला मुकावे लागणार आहे.’

यासंदर्भात ‘महाजनको ‘शी संपर्क साधला असता तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की ‘परीक्षेची तारीख बदलता येणार नाही.’ विद्यार्थ्यांची कोणतीही चूक नसताना त्यांची संधी नाकारली जात आहे.” त्यामुळे राज्य सरकार आणि ‘महाजनको’ प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन परीक्षांच्या तारखांमध्ये सुसूत्रता आणावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

 


 

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने वाहतूक कोंडीमुळे रेल्वे आणि बसेस उशिरा धावत आहेत. त्यामुळे उद्यापासून होणाऱ्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना केंद्रावर कसे पोहचायचे याची. चिंता परीक्षार्थीना लागली आहे. त्यामुळे उद्यापासून सलग तीन दिवस होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सरचिटणीस आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी एक्स वर पोस्ट करून केली आहे. आमदार आव्हाड आपल्या पोस्ट म्हणतात, उद्या, परवा आणि तेरवा अशा सलग तीन दिवसांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. अनेक विद्यार्थ्यांचे ट्रेन, एसटी बसमधून फोन येत आहेत की, ते रस्त्यातच अडकले आहेत. अशा बिकट परीस्थित परीक्षेचे नियोजन करणे चुकीचे असून त्यांना सध्या पुढं ढकलावे हि मागणी जोर धरत आहे. 

 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) विशिष्ट शैक्षणिक अर्हता तसेच अनुभवावर आधारित सरळ सेवा भरतीसाठी चाळणी परीक्षेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गृह विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, नगर विकास विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग या विभागांमधील विविध संवर्गातील पदांसाठी ही चाळणी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षांची योजना, अभ्यासक्रम, कार्यपद्धत, परीक्षेचे ठिकाण आणि दिनांक इत्यादी तपशील स्वतंत्रपणे अवगत करण्यात येतील, असे MPSC द्वारे जाहीर केले आहे.

 

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या ४१०/२०२३ या जाहिरात क्रमांकानुसार सहायक प्राध्यापक, दंतपरिवेष्टनशास्त्र, गट ब, ४११/२०२३ नुसार सहायक प्राध्यापक, दंतविकृती व अणूजीवशास्त्र गट ब आणि ४१३/२०२३ नुसार सहायक प्राध्यापक, मुखशल्यचिकित्साशास्त्र, गट ब, १६/२०२५ जाहिरात क्रमांकानुसार सहायक प्राध्यापक, कृत्रिमदंतशास्त्र, गट ब, १८/२०२५ नुसार सहायक प्राध्यापक , दंतव्यंगोपचारशास्त्र, गट ब आणि २०/२०२५ या जाहिरात क्रमांकानुसार सहायक प्राध्यापक, दंतशल्यशास्त्र, गट ब या या संवर्गासाठी चाळणी परीक्षा घेतली जाणार आहे.

गृह विभागाच्या ३३/२०२४ या जाहिरात क्रमांकानुसार विधी सल्लागार, गट अ पदासाठी तसेच ३४/२०२४ नुसार विधी अधिकारी, गट अ संवर्गासाठी चाळणी परीक्षा होणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ३७/२०२४ क्रमांकाच्या जाहिरातीनुसार सहायक संचालक-आरोग्य सेवा (वाहतूक), सामान्य राज्य सेवा गट अ या पदासाठी चाळणी परीक्षा घेतली जाणार आहे. नगर विकास विभागाच्या ५०/२०२४ क्रमांकाच्या जाहिरातीनुसार नगर रचनाकार गट अ, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ०८/२०२४ क्रमांकाच्या जाहिरातीनुसार अधीक्षक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब (प्रशासकीय शाखा), उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या १४/२०२५ क्रमांकाच्या जाहिरातीनुसार सहायक प्रबंधक गट ब या संवर्गासाठी चाळणी परीक्षा होणार आहे.

 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेचा निकाल अखेर सोमवारी (दि. १९ मे) आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. यंदाच्या निकालाने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. यंदाचा कट ऑफ सर्वोच्च लागल्याचे स्पर्धा परीक्षार्थांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून परीक्षार्थी या निकालाची वाट पाहत होते. आयोगामार्फत एकूण ४७९ पदांसाठी ही परीक्षा २ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आली होती. तीन महिने होत आले तरी महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेचा निकाल रखडल्याने स्पर्धा परीक्षार्थी नाराज होते. अखेर या निकालाची प्रतीक्षा संपली आहे. या परीक्षेद्वारे सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक पदांसाठी भरती होणार आहे. गट ब च्या संयुक्त पूर्वपरीक्षेतून एकूण ४७९ जागा भरायच्या आहेत. यात सहायक कक्ष अधिकारी (५४ पदे), राज्य कर निरीक्षक (२०९ पदे) आणि पोलिस उपनिरीक्षक (२१६ पदे) यांचा समावेश आहे. या भरतीची जाहिरात ऑक्टोबर २०२४ मध्ये आली होती. परीक्षा आधी ५ जानेवारी २०२५ ला होणार होती. पण, ती पुढे ढकलून २ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आली. 

 

यंदाच्या निकालामध्ये जनरल कॅटेगरीच्या मुलांचा कट ऑफ ६२.५० असा आहे. जो आत्तापर्यंतचा सर्वाधिक कट ऑफ ठरला आहे. तर जनरल कॅटेगरीच्या मुलींचा कट ऑफ ५९.२५ आहे. जनरल कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ सारखाच आहे. त्यामुळे यंदा पूर्वपरीक्षेचा कट ऑफ सर्वांना चकित करून गेल्याचे दिसून आले आहे.

 

 

पशुसंवर्धन विभागाचे काम पूर्ण क्षमतेने करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले असून विभागातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्याअंतर्गत पशुसंवर्धन सेवा गट अ मधील पशुधन विकास अधिकारी संवर्गातील २७९५ पदे भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्र सादर करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली होती. त्यानंतर एमपीएससीने २७९५ पदांची जाहीरात काढली आहे. सोबतच सहाय्यक प्राध्यापकांची ७९२ पदांची इज जाहिरात पण MPSC द्वारे प्रकाशित करण्यात आली. अशा एकूण ३५८७  पदांची मोठी भरती MPSC द्वारे सुरु करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची एक सुवर्णसंधी मिळाली आहे.  

 

पशुधन विकास अधिकारी पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोकमार्फत (MPSC) भरती प्रक्रिया सुरू आहे. एकूण २७९५ जागांसाठी ही भरती आहे, ज्यात गट अ संवर्गातील पदांचा समावेश आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन सविस्तर माहिती घेऊ शकतात आणि २९ एप्रिल ते १८ मे दरम्यान अर्ज करू शकतात.

ग्रामीण भागात पशुसंवर्धन विभागाचे काम गतीने व पूर्ण क्षमतेने होण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आयुक्तालय तसेच त्यांच्या अधिनस्त क्षेत्रिय कार्यालयातील पशुधन विकास अधिकारी पद महत्त्वाचे आहे. सुधारित आकृतीबंधानुसार महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ अंतर्गत पशुधन विकास अधिकारी संवर्गात एकूण ४६८४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सद्यःस्थितीत १८८६ पदे भरलेली असून २७९८ पदे रिक्त आहेत. तसेच ३१ डिसेंबर २०२५ अखेर ८ पदे सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणार आहेत, अशी एकूण २८०६ पदे रिक्त होणार आहेत. ही पदे रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत होता.

या गोष्टीची दखल घेत पशुसंवर्धन मंत्री मुंडे यांनी पाठपुरावा करून पशुधन विकास अधिकारी संवर्गातील पदे भरण्याचा निर्णय घेतला. यापैकी सरळसेवा जाहिरात क्र. १२/२०२२ मधील प्रतिक्षायादीतील ११ पदे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित २७९५ पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र सादर करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश देण्यात आले असून लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला कळविण्यात आले आहे. ही रिक्त पदे भरल्यानंतर विभागाचे कामकाज अधिक वेगाने होऊन ग्रामीण भागातील पशुपालक तसेच शेतकरी बांधवांना चांगल्या दर्जाची सेवा उपलब्ध होईल, असा विश्वास मंत्री मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला होता.

 


 

राज्याच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगात एका लिपिकाने अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्ती मिळवली. मात्र जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर त्यांनी विशेष मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र व जात वैधता सादर केले. सद्यस्थितीत ते भाग विशेष मागास प्रवर्गातून सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर पदोन्नतीने कार्यरत असल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना १ मे १९४९ रोजी झाली असून भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३१५ अंतर्गत या आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगात एकूण मंजूर ४ पदे २३६ आहे. त्यापैकी १६ पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवली आहे.

राखीव असलेल्या पदापैकी अनुसूचित जमातीच्या भरलेल्या पदांची संख्या केवळ ११ आहे, तर ५ पदांचा अनुशेष शिल्लक असल्याचे नमूद केले आहे. राखीव पदावरील ११ जणांपैकी ९ जणांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले आहे. अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर नियुक्त झालेल्या व नंतर मात्र जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या २ आहे, तर अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आल्यामुळे रिक्त झालेल्या पदांची संख्या २ दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगात अनुसूचित जमाती प्रवर्गातून लिपिक टंकलेखक वा पदावर नियुक्ती मिळवणाऱ्याचे आडनाव बटराखावे असल्याचे माहिती अधिकारात नमूद केले आहे. त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर त्यांनी विशेष मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र व जातवैधता सादर केले असून विशेष मागास प्रवर्गातून ते सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर पदोन्नतीने सध्या कार्यरत आहेत.

 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेली राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा १ डिसेंबर २०२४ रोजी पार पडली. या परीक्षेचा निकाल मागील महिन्यात प्रसिद्ध करण्यात आला. मात्र, सामाजिक व शैक्षाणिकदृष्ट्या मागास वर्गातील (एसईबीसी) उमेदवारांसमोर आरक्षणाचा कायदेशीर पेच कायम राहणार असल्याने राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ नव्याने घेण्यात यावी, अशी मागणी लाखो विद्याथ्यांमधून केली जात आहे.

न्यायालयानी दिलेल्या निकालानुसार एकापेक्षा जास्त टप्पे असलेल्या परीक्षेत पहिल्या टप्प्यात परीक्षा देण्याच्या दिवशी जी परिस्थिती असते, ती नंतर बदलणे कायदेशीररीत्या अवैध आहे. आयोगाने ऑगस्ट २०२४ मध्ये एक लिंक ओपन करून नॉन क्रिमीलेयरचे डिटेल्स भरण्यासाठी परिपत्रक काढले होते. त्यावेळी एसईबीसी, ओबीसी प्रवर्गमध्ये गेलेल्या सर्व विद्याथ्यांनी एनसीएल अपडेट करणे अनिवार्य होते, तरीही काही विद्याथ्यांनी ते केले नाही. १२ मार्च रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल लागला आणि मुख्य परीक्षेचे फॉर्म भरायला सुरूवात झालो. त्यावेळी अनेक एसईबीसी, ओबीसी विद्याथ्यांना समजले की आपण तर एनसीएल अपडेट केले नव्हते, त्यामुळे आपली कॅटॅगरी बदलली गेलीच नाही.

या विद्यार्थ्यांना एसईबीसी असून ईडब्ल्यूएस दाखवत होते, त्यांना प्रवर्ग बदलून दिले. त्यामुळे ज्या जागा शिल्लक राहिल्या त्या भरण्यासाठी ३१८ विद्यार्थी घेऊन सुधारित निकाल लावला. जे विद्यार्थी एसईबीसी आहेत त्यांना ईडब्ल्यूएसमध्येच ठेवून हे पुढे जाऊन बाद होतील, त्यामुळे नवीन ३१८ विद्यार्थी घेतले; परंतु हे जर असे असेल तर येथे ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा रेशो वाढत आहे. असे न झाल्यास सुधारित निकाल हा विवादास्पद ठरेल. यासाठी नव्याने राज्यसेवा २०२४ पूर्व परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी लाखो विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.

 


MPSC कडून जून २०२३ मध्ये राज्यसेवा गट-अ आणि गट-ब दर्जाच्या ३०३ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. जानेवारी २०२४ मध्ये मुख्य परीक्षा व ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मुलाखती घेण्यात आल्या. त्यांची वैद्यकीय तपासणीही ऑगस्टमध्ये झाली आहे. शासन निर्णयानुसार वैद्यकीय तपासणीनंतर एका वर्षात नियुक्ती न झाल्यास उमेदवारांना पुन्हा वैद्यकीय तपासणी करावी लागते. त्यामुळे विद्यार्थी चिंतित आहेत. उत्तीर्ण उमेदवारांना पसंतीक्रम देणे, त्यानंतर पुन्हा तात्पुरती यादी जाहीर करणे, भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (ऑप्टिंग आऊट) पर्याय देणे आणि त्यापुढच्या सर्वच प्रक्रिया थांबल्यामुळे राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊनही परीक्षार्थीच्या पदरी निराशाच आली आहे. याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

विशेष म्हणजे, मागील काही वर्षांत आयोगाकडून प्रत्येक परीक्षा आणि निकालाच्या प्रक्रियेला विलंब होत आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचंड मनस्ताप होत आहे. ‘एमपीएससी’ च्या अशा दिसाळ कारभाराचा विद्यार्थ्यांना प्रचंड फटका बसतो आहे. एका परीक्षेचा निकाल आणि नियुक्ती मिळण्यास दोन ते तीन वर्षे लागत असतील तर हे चूक आहे. परीक्षा आणि नियुक्तीचा कालबद्ध कार्यक्रम असणे आवश्यक आहे. राज्यसेवा २०२३ च्या विद्यार्थ्यांची सर्व प्रक्रिया १ ऑगस्ट २०२५ पूर्वी पूर्ण झाली नाही, तर यातील पात्र विद्यार्थ्यांना पुन्हा वैद्यकीय तपासणीस सामोरे जावे लागेल, अशी भीती ही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
  1. Mahesh Kokare says

    2001 Madhye ZP bharti ghotala karun mala Varg 4 parochar pada paasun vanchit thevnyaat aale….. Mahesh kokare

  2. Pankaj pathak says

    Mala जॉब paije

  3. Sagar Rajput says

    Tumhi mantat Bharti Direct Goverment job Dyala Pahije permenant

  4. MahaBharti says

    new MPSC recruitment Update

  5. Neha Saratape says

    10th pass sathi job Recument karatey……

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड