नागपूर पोलीस दलाला २,५७८ पदांची मोठी पदभरती होणार! | More Force Needed for Nagpur Police!
More Force Needed for Nagpur Police!
नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील वाढत्या जबाबदाऱ्या आणि गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी एकूण २,५७८ नवीन पोलिस पदांची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी पोलिस महासंचालकांनी गृह विभागाकडे अधिकृत प्रस्ताव सादर केला आहे.
न्यायालयाचा गृह विभागाला आदेश
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गृह विभागाला या प्रस्तावावरील निर्णय २८ एप्रिलपर्यंत नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. नागपूर पोलिस आयुक्तालयाला ३९१, तर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाला २,१८७ नवीन पदांची गरज असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कायदा-सुव्यवस्थेसाठी गरजेचे बळ
लोकसंख्या वाढीमुळे पोलिस दलावर मोठा ताण आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवण्यासाठी अतिरिक्त पोलिस दल कार्यरत होणे अत्यावश्यक आहे. सध्या असलेल्या मनुष्यबळावर या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडणे कठीण बनले आहे.
शहर व ग्रामीण भागातील पदांची मागणी
शहरात सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल आणि पोलिस अंमलदार आदी पदांची गरज आहे. तर ग्रामीण भागात पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, हवालदार, शिपाई यांसह विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिस दलाच्या सक्षमीकरणाची गरज
रस्त्यांवरील अपघात आणि गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची संख्या वाढवण्याचा निर्णय त्वरित घेण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या मनुष्यबळावर हे आव्हान मोठे असल्यामुळे न्यायालयातही यासंदर्भात चर्चा सुरू असून, पोलिस दलाच्या सक्षमीकरणासाठी त्वरित निर्णय घेण्याची मागणी होत आहे.