आता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण! – राष्ट्रप्रेम, शिस्त व आरोग्य घडवणारा ऐतिहासिक निर्णय! | Military Training from Class 1!
Military Training from Class 1!
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यातील इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना मूलभूत लष्करी शिक्षण व प्रशिक्षण देण्याची घोषणा करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नाशिक येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात ही माहिती दिली. यामुळे लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त, व्यायामाची सवय आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होणार आहे.
या नव्या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट आहे – “राष्ट्र प्रथम” ही भावना बालवयातच विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणे. शालेय जीवनापासूनच देशप्रेमाचे संस्कार देण्याच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, एनसीसी, स्काऊट-गाईड्स यांच्या सहकार्याने प्रशिक्षण दिले जाणार आहे. लष्करी प्रशिक्षण हे केवळ युद्धकलेसाठी नसून, शिस्त, सामूहिक भावना आणि मानसिक/शारीरिक कणखरपणा यासाठीही उपयुक्त ठरते.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या उपक्रमासाठी राज्य सरकारने 2.5 लाख माजी सैनिकांची मदत घेण्याचे ठरवले आहे. या सैनिकांकडे प्रत्यक्ष लष्करी अनुभव असल्याने त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना वास्तवातील शिस्त, आदर्श आणि प्रेरणा मिळू शकते. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंतही व्यावसायिक दर्जाचे प्रशिक्षण पोहोचणार आहे.
विशेष म्हणजे, या संकल्पनेची मूळ प्रेरणा सिंगापूरच्या अभ्यास दौऱ्यातून मिळाली. जिल्हा परिषदेतील 48 शिक्षकांचा सिंगापूर दौरा झाला होता. तेथील शिक्षण व्यवस्थेत ‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्पना प्रभावीपणे राबवली जात असल्याचे लक्षात येताच, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ही संकल्पना पहिलीपासूनच सुरू करण्याचा निर्णय झाला.
विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमासोबतच शारीरिक तंदुरुस्ती व आरोग्य टिकवण्यासाठीही अनेक बाबींचा समावेश या योजनेत आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचे ‘हेल्थ कार्ड’ तयार करण्यात येणार असून, नियमित आरोग्य तपासणीही करण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ मानसिक किंवा बौद्धिक विकासच नव्हे, तर शारीरिक स्वास्थ्यालाही समान महत्त्व दिले जात आहे.
शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले की, “शिस्त, देशावर प्रेम आणि नियमित व्यायाम या मूल्यांचा समावेश झाल्यास विद्यार्थी अधिक जबाबदार नागरिक बनू शकतात. ही योजना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षणाच्या इतिहासात एक नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. शिक्षण हे केवळ परीक्षांच्या गुणांपुरते न ठेवता, जीवनमूल्ये, राष्ट्रभक्ती आणि आरोग्यदायी जीवनशैलीच्या दृष्टीनेही उपयोगी ठरावे हा सरकारचा उद्देश आहे.
एकंदरीत, पहिलीपासूनच लष्करी प्रशिक्षणाचा निर्णय हा सामाजिक बांधिलकी, राष्ट्रनिष्ठा आणि विद्यार्थी घडविण्याच्या दिशेने मोठा टप्पा ठरणार आहे. यातून घडणारे विद्यार्थी उद्याचे जबाबदार नागरिक ठरतील, हीच अपेक्षा राज्य सरकारने व्यक्त केली आहे.