अकरावी प्रवेश फेरीचे सुधारित वेळापत्रक जाहीर.! – FYJC Admission 2023
Maharashtra FYJC Admission 2023
Maharashtra FYJC Admission 2023 Pune, Mumbai, Nagpur, Amravati & Maharashtra
Maharashtra FYJC Admission 2023: The 11th admission process has been delayed this year too. This process, which was announced at the end of May, will now be carried out directly in the month of June. The Directorate of Education has announced the probable schedule of the 11th online admission process to be implemented in Pune, Pimpri-Chinchwad, Nashik, Amravati and Nagpur municipal areas along with Mumbai. Accordingly, from June 1, students will be able to register for admission online, and the application form will be filled and verified.
राज्यातील महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांसाठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या नियमित प्रवेश फेरीचे व कोट्यांतर्गत जागांच्या प्रवेशाचे स्वतंत्र वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनाने जाहीर केले आहे. दि.8 जून पासून प्रत्यक्ष प्रवेश फेरीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-2 भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध होणार आहे. यात विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंद नोंदवावे लागणार आहेत.
या ऍडमिशन संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज प्रक्रिया सुरु; आरोग्य विभागाची 11 हजार पदांसाठी जाहिरात प्रकाशित!
✅आरोग्य विभाग शिपाई कामगार अन्य ग्रुप D च्या ४०१० पदांची नवीन भरती सुरु!
✅मध्य रेल्वे अंतर्गत 3712 पदांची मोठी भरती सुरु; त्वरित ऑनलाईन अर्ज करा!
✅WCL मध्ये 10 वी ते पदवीधारक उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी!! 1191 पदांसाठी करा अर्ज
⚠️आरोग्य विभाग भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी!
✅आरोग्य विभाग भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अजुनही काही विद्यार्थी अर्ज करण्याचे बाकी आहेत तसेच काही विद्यार्थ्यांचे अर्ज प्रमाणित होणे बाकी आहे.इयत्ता दहावी राज्य मंडळाकडून गुणपत्रिका दिनांक 14 जून रोजी वितरित होणार आहेत.मूळ गुणपत्रिका मिळाल्याशिवाय विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या शाळा सोडल्याचा दाखला मिळणार नाही त्यामुळे इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेता येणार नाही. सबब सध्या सुरू असलेली नियमित प्रवेश फेरी 1 साठी अर्ज करण्यास व सर्व कार्यवाही साठी 2 दिवस मुदतवाढ देण्यात येत आहे
सुधारित वेळापत्रक पाहा
सन 2023 24 मधील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया इ.१० वी राज्यमंडळ निकालानंतर त्वरीत सुरू करण्यात आलला आहे. दिनांक 12 जून 2023 अखेर इ. ११ वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जाची स्थिती पुढील प्रमाणे आहे.
Part-1 filled Students = 391144 (Registered), 335334 (Locked), 329198 (verified)
Part-2 filled Students = 252423 (CAP)
उपरोक्त आकडेवारी पाहता काही विद्यार्थ्यांनी इ.११वी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रीया पूर्ण केली नसलेचे दिसून येते. तसेच काही विद्यार्थ्यांचे इ.११वी प्रवेश अर्ज प्रमाणित होणे बाकी असून अनेक विद्यार्थ्यांनी भाग-2 अद्याप भरलेला नाही.
इयत्ता दहावी राज्य मंडळाचा निकाल जाहीर झालेला असून राज्य मंडळाकडून गुणपत्रिका दिनांक 14 जून रोजी वितरित होणार आहेत. गुणपत्रिका मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या शाळा सोडल्याचा दाखला मिळणार आहे व त्यानंतर प्रत्याक्षात इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेता येणार आहे.
या सर्व बाबी विद्यार्थी / पालकांची मागणी व विद्यार्थ्यांचे हित विचारात घेऊन सध्या सुरू असलेली नियमित फेरी-1 साठी अर्ज करण्यासाठी दि.१४/०६/२०२३ रोजी सायं. 05:00 वा. पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
सुधारित वेळापत्रक सोबत संलग्न आहे.
पहिल्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक
दि. 8 ते 12 जून- नवीन विद्यार्थी नोंदणी व प्रवेश अर्जाचा भाग-1 भरणे, प्रवेश अर्जाचा भाग-2 भरणे, माध्यमिक शाळा किंवा मार्गदर्शन केंद्राद्वारे अर्ज प्रमाणित करुन घेणे, कोटा प्रवेशासाठीही नोंदणी करता येणार.
दि. 12 जून- सांयकाळी 4 पर्यंत अर्जाचा भाग-1 भरणे.
दि. 13 ते 15 जून – अर्जाचा भाग-1 भरलेल्या व पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करणे, गुणवत्ता यादीवर हरकती नोंदविणे, गुणवत्ता यादी दुरुस्तीबाबत संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांनी निराकरण करणे.
दि. 15 जून – अर्जाचा भाग- 2 ची सुविधा रात्री 10 वाजता बंद होणार.
दि. 16 ते 18 जून- डेटा प्रोसेसिंग कार्यवाही, पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करणे व त्याचे विभागीय समितीकडून पूर्व परीक्षण करणे.
दि. 19 मार्च- विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विद्यायल निवड यादी प्रदर्शित करणे, विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये त्यांचे प्रवेशाचे महाविद्यालय दर्शविणे, प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयाच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करुन देणे, कटऑफ पोर्टलवर दर्शविणे.
दि. 19 ते 22 जून – विद्यार्थ्यानी आवश्यक कागदपत्र अपलोड करुन अलॉट झालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे, प्रवेश घ्यायचा नसल्यास पुढील फेरीची प्रतीक्षा करणे, पुढील प्रवेश फेरीसाठी नवीन विद्यार्थी नोंदणी व अर्ज भाग-1 भरणे.
दि. 22 जून- महाविद्यालयांनी प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती पोर्टलवर ऑनलाईन नोंदविणे, कोट्यातील रिक्त जागा कॅपकडे समर्पित करणे.
दि. 23 जून- दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे, याप्रमाणे वेळापत्रक असेल.
निश्चित केलेला प्रवेश रद्द करावयाचा असल्यास?
महाविद्यालयात निश्चित केलेला प्रवेश एखाद्या विद्यार्थ्यास रद्द करावयाचा असल्यास संबंधित महाविद्यालयास विनंती करून पुढील प्रक्रिया करता येईल. त्यानंतर संबंधित विद्यार्थी पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या तारखा
■ ३० मे ते ६ जून कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी
■ २९ मे शिबिरात महाविद्यालयांचा कागदपत्रांसह सहभागी
■ २५ मेपासून अर्जाचा भाग एक भरून प्रमाणित करणे
■ निकाल जाहीर झाल्यानंतर भाग दोन भरता येणार
६ जून हा कालावधी देण्यात आला आहे. या प्रक्रियेत नवीन नोंदणी आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या माहितीत बदल करण्यासाठी २९ मे रोजी घेण्यात येणाऱ्या शिबिरात महाविद्यालयांना कागदपत्रासह सहभागी व्हावे लागणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांच्या नोंदणीसाठी ३० मे ते शिक्षण संचालनालयाने दिली आहे.
पहिल्याच दिवशी दिवसभर संकेतस्थळ सुरू झालेले नव्हते त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. सकाळपासून साईड अंडर मेंटेनन्स असा मेसेज होता. अनेकांनी तक्रारी केल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा संकेतस्थळ सुरू झाले. यानंतर रविवारी ६ हजार ६२२ विद्यार्थ्यांनी आपले अर्ज नोंदणी केले होतर, तर त्यापैकी ५७२ विद्यार्थ्यांचे अर्ज अॅटो व्हेरिफायही करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना २४ मेपर्यंत सराव करता येणार आहे. याच कालावधीत महाविद्यालयांना आपल्या लॉगीनमध्ये जागा व तुकड्यांसंदर्भातील नोंदणी करणार असल्याचे म्हटले आहे. दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल, अशी शक्यता असल्याने विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा अर्ज कसा भरायचा यासाठी सराव सुरू करण्यात आला असल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. ऑगस्टअखेरी प्रवेश पूर्ण करण्याचे नियोजन आहे. अकरावीच्या जागा गेल्यावर्षी शिल्लक राहिल्या होत्या. त्यामुळे यावर्षी त्या वाढवू नयेत, अशी मागणी करण्यात आली आहे.