लोकप्रतिनिधींच्या ३४ हजार जागा रिक्त,नवीन पुढील महत्वाची माहित!
Lokpratinidhi Bharti
लाडकी बहिण, लाडका भाऊ, शेतकऱ्यांना कर्जमाफी अशा लोकप्रिय योजनांच्या माध्यमातून विधानसभेची अवघड वाटणारी लढाई जिंकल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या महायुतीने आता स्थानिक स्वराज्य संस्थावर लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह २९ महापालिका तसेच जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समितीसह सुमारे दीड हजार ग्रामपंचायतींमधील सुमारे ३४ हजार लोकप्रतिनिधींच्या निवडणुकीसाठी महायुतीने कंबर कसली आहे. त्यानुसार येत्या मार्च- एप्रिल दरम्यान राज्यात पुन्हा निवडणुकीचा रणसंग्राम रंगाणार आहे.
राज्यात गेले पाच वर्षे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय संघर्षाचा सर्वाधिक फटका स्थानिक स्वराज्य संस्थांना बसला आहे. गेल्या पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेेत. सुरुवातीस करोनाच्या साथीमुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर आरक्षणाच्या मुद्यावरून या निवडणुकांचे सुरू झालेले राजकारण अद्याप संपलेले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण कसे ठेवावे यावरून निर्माण झालेला वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून न्यायालयाच्या ‘जैसे थे’ आदेशामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून महापालिका, नगरपालिका- नगरपंचायत, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे.
- महापालिकांच्या एकूण जागा-२७३६
- नगरपालिका, नगरपंचायती- ७४९३
- जिल्हा परिषद सदस्य- २०००
- पंचायत समिती सदस्य- ४०००
- ग्रामपंचायती- १५ ते १६ हजार
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्यात सत्तेवर आल्यानंतर जनमानसात महायुतीला मिळालेल्या प्रतिसादामुळे आत्मविश्वास वाढलेल्या भाजपने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीय केले आहे. मार्च- एप्रिल महिन्यात महापालिकांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयातही आरक्षणाच्या मुद्यावरील याचिकेवर २२ जानेवारीला सुनावणी होणार आहे.
● राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची एकूण सदस्य संख्या अडीच लाख आहे. त्यामध्ये २७ हजार ९०० ग्रामपंचायतींमधील सदस्यांचा समावेश आहे.
● राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थामधील नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष- सदस्य, पंचायत समिती सभापती- सदस्य, सरपंत, ग्रामपंचायत सदस्यांची सुमारे ३४ हजार पदे रिक्त आहेत.
● मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशा एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुका दोन ते चार वर्षांपासून रखडलेल्या आहेत. यामध्ये नवनिर्मित जालना व इचलकरंजी महापालिकेची अजून पहिलीच निवडणूक झालेली नसून सर्व ठिकाणी आयुक्तच प्रशासक म्हणून कारभार चालवत आहेत.
● राज्यात २४५ नगरपरिषदा आणि १४६ नगरपंचायती अशा एकूण ३९१ नगरपालिका, नगरपंचायातींमध्ये निवडणुका प्रलंबित आहेत. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सहा महिन्याच्या आत निवडणुका होणे कायद्याने बंधनकारक असले तरीही सरकारी चालढकलीमुळे राज्यातील ३४ पैकी २६ जिल्हा परिषदा, ३५१ पैकी २८९ पंचायत समित्यांध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे.
● फेब्रुवारी २०२५ अखेर आणखी सहा जिल्हा परिषदा आणि ४४ पंचायत समित्यांची मुदत संपत आहे. अशाच प्रकारे १५०० ग्रामपंचायतींमध्येही सध्या प्रशासकीय राजवट आहे.