इंटर्नशिपची अंतिम संधी, ३१ मार्च शेवटची तारीख, त्वरित करा अर्ज!!-Last Chance for Internship!
Last Chance for Internship!
बेरोजगार तरुणांना वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्य शिकवून रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या उद्देशानं केंद्र सरकारनं पंतप्रधान इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत एकूण १८ क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, यासाठी ३१ मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख ठरविण्यात आली आहे.
म्हणूनच, इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पोर्टलवर लगेच अर्ज भरावा, असा सल्ला कॉर्पोरेट मंत्रालयाच्या पश्चिम विभागानं दिला आहे. या योजनेअंतर्गत ५०० कंपन्यांबरोबर करार करण्यात आला असून, प्रत्येक उमेदवाराला वर्षाला ६६ हजार रुपये भत्ता दिला जाणार आहे. त्यात प्रशिक्षण घेत असलेल्या कंपनीकडून ५०० रुपये आणि केंद्र सरकारकडून ४५०० रुपये असे मिळून महिन्याला ५,००० रुपये दिले जातील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
योजनेसाठी पात्रता आणि अटी:
- उमेदवाराचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असावं, किंवा घरात कोणीही सरकारी नोकरीत नसावा.
- उमेदवार पूर्णवेळ बेरोजगार असावा आणि वय २१ ते २४ वर्षांच्या दरम्यान असावं.
- योजनेअंतर्गत मिळणारं आर्थिक साहाय्य थेट उमेदवाराच्या बँक खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र व गोवा विभागाच्या नोडल अधिकारी अपर्णा मुडियम यांनी दिली.
- दहावी, बारावी, पदवी, डिप्लोमा, आयटीआय शिक्षण पूर्ण केलेले पण बेरोजगार असलेले उमेदवार पात्र असतील.
- आयआयटी, आयआयएम किंवा तत्सम उच्च शिक्षण घेतलेल्यांना या योजनेत प्रवेश नाही, कारण त्यांच्याकडे आधीच पुरेसं कौशल्य असतं, असं उपसंचालक ऋतुजा बनकर यांनी स्पष्ट केलं.
विदर्भात किती संधी उपलब्ध?
ही योजना बेरोजगार तरुणांना १ वर्ष कौशल्य शिक्षणाची संधी देते. देशभर १ लाखापेक्षा जास्त संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात १५,००० संधी उपलब्ध असून, त्यात विदर्भातील अनेक उमेदवारांना संधी मिळू शकते.
संतोष कुमार, प्रादेशिक संचालक, कॉर्पोरेट मंत्रालय.