ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नोकरभरती
Job Openings in Gramin Region
Job Openings in Gramin Region – एफएमसीजी कंपन्या आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांनी देशाच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नोकरभरती करण्यास सुरुवात केली आहे. गेले दोन ते अडीच महिने या क्षेत्रांमध्ये करोनामुळे सुस्ती आली होती. मात्र, आता परिस्थिती हळूहळू का होईना पूर्वपदावर येत आहे. नोकरभरतीसाठी मदत करणाऱ्या कंपन्या रँडस्टँड इंडिया आणि टीमलीजच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एफएमसीजी कंपन्यांनी आता ग्रामीण भागात लक्ष केंद्रित केले आहे.
विक्री, वितरणासाठी मागणी अधिक
रँडस्टँड इंडियाच्या यशाब गिरी यांच्या मते गेल्या महिनाभरात देशातील बहुसंख्य भागातील लॉकडाउन मागे घेण्यात आल्याने एफएमसीजी कंपन्यांनी नोकरभरतीला सुरुवात केली आहे. एफएमसीजी कंपन्यांकडून ग्रामीण भागासाठी मोठ्या प्रमाणात विक्री आणि वितरणाशी संबंधित लोकांची मागणी करण्यात येत आहे. टीमलीजच्या सुदीप सेन यांच्या मते कंपन्या नोकरभरती करताना छोट्या शहरांच्या आणि ग्रामीण भागांच्या गरजा समजण्याचा प्रयत्न करीत आहेत. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार रिन्हर्स मायग्रेशन आणि मनरेगा अंतर्गत रोजगार देण्यात झालेल्या वाढीमुळे एफएमसीजी कंपन्यांनी ग्रामीण भागातील नोकरभरतीसाठी प्रयत्न चालवले आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
8 हजार पोलिस पदांची भरती लवकरच सुरु होणार
ग्रामीण भागात वाढणार रोजगार
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयआय) आकडेवारीनुसार ग्रामीण भागात रोजगार वाढल्यामुळे २१ जूनला संपलेल्या आठवड्यात बेरोजगारीचा दर घसरून ७.३ टक्क्यांवर आला आहे. याच कालावधीत शहरी भागातील बेरोजगारीचा दर ११.२ टक्क्यांवर आला आहे. या संकेतांमुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपन्यांच्या विक्रीतही वाढ होण्याची शक्यता आहे. एफएमसीजी कंपन्यांची एक तृतीयांश आणि वाहन उद्योगांची २० टक्के विक्री ग्रामीण भागात होते.
Kadhi nighanar form. Ya bharatiche sir
Bharti kontya mahinyat ahe please sangal ka
10th pass sathi job ahet ka in latur
i never post office job
Bharti kadhi suru Honar ahe