सध्या कॅम्पस द्वारे नोकरी मिळणे हे एक मोठे अचिव्हमेंट मानले जाते. ३१ मे रोजी वेदांता फाउंडेशन आणि बियानी ग्रुप ऑफ कॉलेजेस यांच्या संयुक्त विद्यमाने जयपूरमधील बियानी कॉलेज कॅम्पसमध्ये ‘युवा रोजगार मेला २०२५’ चे भव्य आयोजन करण्यात आले. या मेळ्याचे उद्दिष्ट होते – युवकांना इंटर्नशिपसह थेट प्लेसमेंटची संधी उपलब्ध करून देणे. या भव्य मेळ्यामध्ये देशभरातील नामवंत कंपन्यांनी सहभाग घेतला आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अनेक उज्वल दारं खुली केली.

२.५ लाख ते ७ लाख वार्षिक पॅकेज – थेट नोकरीची संधी!
या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २.५ लाख ते ७ लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक पॅकेज देण्यात येणार आहे. हा एक प्रकारचा क्रांतिकारी उपक्रम ठरला असून, विद्यार्थीवर्गाला शिक्षणानंतर थेट रोजगार मिळवण्यासाठीचा उत्तम मार्ग उपलब्ध झाला आहे. यामध्ये ५00 हून अधिक युवकांनी सहभाग घेतला आणि ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली.
विप्रो, इन्फोसिसपासून ते मॅरियटपर्यंत ३५ नामांकित कंपन्यांचा सहभाग!
या मेळ्यात सहभागी झालेल्या प्रमुख कंपन्यांमध्ये विप्रो, इन्फोसिस, फोर्टिस, एक्सिस बँक, एसबीआय लाइफ, हयात, मुथूट ग्रुप, वाउ मोमो, ट्रेंट लिमिटेड यांचा समावेश होता. अशा प्रथितयश संस्थांच्या उपस्थितीमुळे युवकांना अधिक विश्वासाने व आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची प्रेरणा मिळाली.
मुख्य अतिथी न्यायमूर्ती जे. के. रांका यांचे मार्गदर्शन
या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून राजस्थान उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश जे. के. रांका यांनी उपस्थिती लावली. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “वेदांता फाउंडेशनच्या या प्रयत्नामुळे बेरोजगारीवर मात होण्यास मदत होते. हे रोजगार मेळे फक्त नोकरी देत नाहीत, तर युवकांना योग्य दिशा आणि कौशल्यांचं मूल्य समजावून देतात.”
७,००० हून अधिक नोकऱ्यांचा उद्दिष्ट
वेदांता फाउंडेशनने यावर्षी देशभरात अशा ७,००० पेक्षा अधिक नोकऱ्या देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे भारतातील विविध भागातील तरुणांना समान संधी उपलब्ध होणार असून, ग्रामीण आणि शहरी भागांमधील बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
कौशल्यविकासासह आर्थिक स्थिरतेची दिशा
या रोजगार मेळ्याचा एक सकारात्मक परिणाम म्हणजे, युवकांना त्यांच्या शैक्षणिक पातळीवर आधारित नोकऱ्या मिळाल्या. यामुळे कौशल्यविकासासह आर्थिक स्थिरता आणि आत्मनिर्भरतेकडे समाज वाटचाल करत आहे. हा उपक्रम केवळ नोकरीपुरता मर्यादित राहिलेला नसून, व्यापक सामाजिक बदलांचा आरंभसुद्धा ठरतो आहे.
शेकडो युवकांचा सहभाग – नव्या भविष्याचा प्रारंभ!
या मेळ्यामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आनंदाने सांगितले की, “हे मेला आमच्यासाठी पर्वणी ठरले आहे. कंपन्यांच्या प्रतिनिधींनी थेट संवाद साधत आमचं मूल्यांकन केलं आणि संधी दिली.” हे रोजगार मेळे युवकांना त्यांच्या क्षमता ओळखण्याची आणि योग्य संधी मिळवण्याची व्यासपीठं उपलब्ध करून देत आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















