आनंदाची बातमी, आता रिटर्न १५ सप्टेंबरपर्यंत भरता येणार!-IT Return Deadline Extended!
IT Return Deadline Extended!
मित्रांनो, बघा बघा, सरकारनं हाय ना आता अगदी लोकांच्या मनाला भिडणारा निर्णय घेतलाय – आयकर रिटर्न भरायची तारीखच वाढवली हाय!
या निर्णयामुळे काय झालंय, तर कित्येक पगारदार लोक, लघु उद्योजक, साधे व्यापारी – सगळ्यांनाच एक मोठा “हायसं वाटतंय राव!” असा क्षण मिळालाय! चला तर या बद्दल सविस्तर माहिती बघूया!
तारीख कशी वाढली ते ऐका:
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पूर्वी काय होतं – २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी रिटर्न भरायची शेवटची तारीख होती ३१ जुलै २०२५.
पण आता सीबीडीटी (केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ) यांनी मंगळवारी काय केलं – सरळ दीड महिना वाढवला आणि नवीन शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२५ जाहीर केली!
सुधारणा आणि कारण काय?
आता काहीजण म्हणतील, “असं का केलं?” तर सीबीडीटी म्हणतंय की रिटर्नच्या फॉर्मात बरंच बदल केलंय –
ते नवे फॉर्म्स सिस्टिममध्ये सेट करायला, चाचण्या घ्यायला, आणि सगळं व्यवस्थित बसवायला थोडा वेळ लागणार हाय!
त्यामुळे काय – रिटर्न भरताना लोकांना कोणताही घोळ होऊ नये, चुकीचे भरून नको त्रास व्हायला, म्हणून वेळ दिलाय.
कोणाला फायदा होणार?
हे बघा, हे प्रकरण सर्वसामान्य लोकांसाठी भारी फायद्याचं झालंय.
ज्यांचं ऑडिट लागत नाही, आणि जे फक्त पगारावर चालतात – ते लोक, म्हणजे सरकारी कर्मचारी, खाजगी नोकरदार, लघु उद्योगवाले – हे सगळे या विस्तारलेल्या तारखेचा लाभ घेऊ शकतात!
पण सावधान! हे लक्षात ठेवा:
हं राव, पण एक गोष्ट डोक्यात ठेवाच –
जर तुम्ही १५ सप्टेंबरनंतर रिटर्न भरायला गेला, तर थेट ₹५००० पर्यंतचा दंड लागणार बरं का!
तेव्हा अजिबात “नंतर बघू” असं म्हणू नका.
रिटर्न वेळेत भरा, मन शांत ठेवा आणि दंड टाळा!
थोडक्यात सांगायचं झालं तर –
“तारीख वाढली म्हणजे सुट्टी नाही, ती एक संधी आहे – योग्य वापर करा!”
Table of Contents