अग्नीवीर भरती महत्वाचा अपडेट, आता 13 भाषांमध्ये होणार लेखी परीक्षा! -Indian Army Agniveer Army Bharti Maharashtra
Indian Army Agniveer Army Bharti Maharashtra
अग्रीवीर लेखी परीक्षेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता उमेदवार १३ भाषांमध्ये परीक्षा देऊ शकतात. उमेदवार त्याला हवी असलेली कोणतीही भाषा निवडू शकतो. यापूर्वी, उमेदवारांना फक्त दोन भाषांमध्ये लेखी परीक्षा देण्याची संधी होती, जी करताना त्यांना अडचणी येत होत्या. हे लक्षात घेऊन, सैन्याने एक मोठा बदल केला आहे. सामायिक प्रवेश परीक्षा (CEE) इंग्रजी, हिंदी, मल्याळम, कन्नड, तमिळ, पंजाबी, उडिया, बंगाली, उर्दू, गुजराती, मराठी आणि आसामी या १३ भाषांमध्ये घेतली जाईल. कोणीही त्याला हव्या त्या भाषेत परीक्षा देऊ शकतो.
भारतीय सैन्यासाठी अग्निवीर परीक्षा २ टप्प्यात घेतली जाईल. पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षा होईल. ज्यामध्ये १०० गुणांच्या संगणक आधारित ऑनलाइन लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जातील. दुसऱ्या टप्प्यात भरती मेळावा होईल. यामध्ये शारीरिक कार्यक्षमता तपासली जाईल. अग्निपथ योजनेअंतर्गत, तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात भरती केले जाते. चार वर्षांच्या सेवेनंतर, २५ टक्के अग्निवीरांना परीक्षेद्वारे कायमस्वरूपी सैनिक म्हणून सैन्यात सामील होण्याची संधी मिळते, तर उर्वरित अग्निवीरांना नागरी जीवनात परत येण्यासाठी विशेष मदत दिली जाते.
आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसचे संचालक कर्नल शैलेश कुमार म्हणाले की, लेखी परीक्षेनंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात रॅली सुरू होण्याची शक्यता आहे. ११ मार्चच्या रात्रीपासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल. भारतीय सैन्य अग्निवीर भरती २०२५ साठी www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करता येतील. अर्जासाठी आधार कार्ड, दहावीचे प्रमाणपत्र, स्वाक्षरीची स्कॅन केलेली प्रत, नवीनतम फोटोची सॉफ्ट कॉपी, दहावी, बारावी आणि इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे, गुणपत्रिका आणि जात प्रमाणपत्र आगाऊ स्कॅन केलेले ठेवा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Indian Army Agniveer Army Bharti Maharashtra – मुंबईसह (Mumbai) आठ जिल्ह्यांमधील सन २०२५ साठीच्या पहिल्या तुकडीतील ‘अग्रीवीर’ भरतीला सुरुवात झाली आहे. १० एप्रिलपर्यंत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. ‘अग्नीवीर’ ही १६व्या वर्षी संरक्षण दलांद्वारे देशसेवा करण्याची संधी देणारी योजना आहे. चार वर्षांची सेवा बजाविल्यानंतर नोकरी सोडायची असल्यास संबंधित ‘अग्नीवीर’ सैनिकाला जवळपास १०.४० लाख रुपये मिळतात. त्याखेरीज दरमहा २१ हजार ते २८ हजार रुपये वेतनही मिळते. या माध्यमातून भूदलात सेवा देण्यासाठीची यावर्षीची भरती प्रक्रिया आता सुरू झाली आहे.
मुंबईच्या भूदल भरती अधिकारी (एआरओ) कार्यालयाने जाहिरात काढली आहे. त्यानुसार, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमधील उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. जून महिन्यात चाचणी घेतली जाईल. ही चाचणीही ऑनलाइन होणार असल्याने उमेदवारांनी त्यासाठी केंद्रावर येताना पुरेसा चार्ज असलेला व किमान दोन जीबी इंटरनेट डेटा असलेला स्मार्ट मोबाइल फोन सोबत आणणे आवश्यक आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.joinindianarmy.nic. in या वेबसाइटवर मिळेल.
राष्ट्रीय छात्र सेना (NCC) उमेदवारांसाठी (यात लढाईतील हौतात्म्य प्राप्त झालेल्या सैनिकांचे अपत्य समाविष्ट) वयोमर्यादा 19 ते 25 वर्षे असावी 01 जुलै 2025 पर्यंत (02 जुलै 2000 पूर्वी आणि 01 जुलै 2006 नंतर नाही, दोन्ही तारखा धरून)राहील . तसेच एखादा अधिकारी त्याच्या/तिच्या नियुक्तीच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या परिविक्षा कालावधीवर असेल. जर परिविक्षा कालावधीत त्याच्या/तिच्या कामगिरीवरून असे आढळले की तो/ती नियुक्तीसाठी अयोग्य आहे, तर त्याची/तिची सेवा कधीही समाप्त केली जाऊ शकते, परिविक्षा कालावधी संपण्याच्या आधी किंवा नंतर देखील.
दरम्यान, ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व गुणवत्तेवर आधारित आहे. त्यामुळे निवडीसाठी कोणालाही पैसे किंवा लाच देऊ नये. तसेच अशा प्रकारच्या प्रलोभनांना बळी न पडता, असे खोटे आश्वासन देणाऱ्यांपासून सावध असावे, असे कळकळीचे आवाहन एआरओ यांच्याकडून करण्यात आले आहे.
अर्ज कसा करावा (How to Apply For Maharashtra Indian Army Agniveer Army Bharti 2025)
- भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: joinindianarmy.nic.in
- मुख्य पृष्ठावर उपलब्ध “Officer Entry Application/Login” लिंकवर क्लिक करा.
- एक नवीन पृष्ठ उघडेल, जिथे उमेदवारांना नोंदणी (Register) करावी लागेल.
- स्वतःची नोंदणी करा आणि अर्ज फॉर्म भरावा.
- सर्व माहिती भरल्यानंतर, “Submit” वर क्लिक करा.
- पुष्टीकरण पृष्ठ डाउनलोड करा आणि भविष्यातील वापरासाठी त्याची प्रिंटआउट कॉपी ठेवून द्या.
महत्वाची सूचना: ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर अर्जातील तपशीलांमध्ये कोणताही बदल करता येणार नाही. या संदर्भात कोणतेही निवेदन स्वीकारले जाणार नाही. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.