महाराष्ट्र सरकारचा स्वातंत्र्य सैनिकांना धक्का! 3000 पाल्यांच्या नोकऱ्या जाणार!
freedom fighter new gr maharashtra
राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून आता स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांची सरकारी नोकरी समाप्त होणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय काढण्यात आला असून विहित मार्गाने नियुक्ती न होता थेट नियुक्ती लिहिल्यांवर गंडांतर येणार आहे.ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्याची विहित कार्यपद्धतीनुसार व विहित मार्गाने नियुक्ती झालेली नाही, तर थेट नियुक्ती झाली आहे अशा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त कराव्यात असा शासन निर्णय जाहीर झाल्याने स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे पाल्य यांच्यामध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 3000 यांच्यावर स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्याच्या नोकऱ्या संपुष्टात येत आहेत. दरम्यान राज्य सरकारकडून तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णया ची अंमलबजावणी तत्काळ करण्याच्या सूचना त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी शासनास सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या निर्णयाच्या विरोधात जे भगवान महासंघ आंदोलन करणार आहे. बाळासाहेब सानप यांनी सरकारला याबद्दल इशारा दिला आहे. दरम्यान या संबंधीची शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra,gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शासन निर्णय :- संदर्भाधीन शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक सीएनएस १०८७/ ४९९/ के.नं.१२/१६-अ, दिनांक ०४ मार्च, १९९१ मधील तरतुदी कालबाहय ठरत असल्याने सदर शासन परिपत्रक या शासन निर्णयाद्वारे रद्द करण्यात येत आहे. २. ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांची विहित कार्यपध्दतीनुसार व विहित मार्गाने नियुक्ती झालेली नाही (थेट नियुक्ती झालेली आहे) अशा कर्मचा-यांच्या सेवा समाप्त कराव्यात. त्याबाबत संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी कार्यवाही करावी. ३. सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करावी. त्याबाबतचा अहवाल संबंधित जिल्हाधिकारी यांनी शासनास सादर करावा.
Comments are closed.