शेतकऱ्यांसाठी पीक विमा वाटपाचा नवा फॉर्म्युला: सविस्तर माहिती पहा! | New Guidelines for Crop Insurance Distribution!

सोलापूर जिल्ह्यातील ७३ हजार ७१८ शेतकऱ्यांचे ८२ कोटी रुपये काढणी पश्चात नुकसान व उत्पन्नावर आधारित पीक विम्याचे वाटप रखडले आहे. काढणी पश्चात होणाऱ्या नुकसानीसाठी विमा कंपनी राज्य शासनाकडे बोट दाखवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात पुढील खरीप हंगाम अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे, मात्र मागील वर्षीचे पीक पाण्यात गेल्यानंतर अजूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही. यासाठी कृषी खाते आणि विमा कंपनीकडे वारंवार चौकशी करावी लागत आहे.

 New Guidelines for Crop Insurance Distribution!

२०२४ खरीप हंगामातील विमा हप्ता आणि शेतकऱ्यांची प्रतिक्षा
मागील वर्षी २०२४ च्या खरीप हंगामात सोलापूर जिल्ह्यातील ७ लाख ३८ हजार १८३ शेतकऱ्यांनी विविध पिकांसाठी एक रुपयात विमा भरला होता. जुलै महिन्यात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना आता १० महिन्यानंतर देखील नुकसान भरपाई मिळालेली नाही. नुकसान झाल्यानंतर इंटीमेशननुसार सर्वेक्षण झाले, परंतु प्रत्यक्ष पैसे मात्र जमा झालेले नाहीत. विविध कर्मचाऱ्यांकडे वारंवार विचारपूस केल्यानंतरही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यादीत नाव असल्याचे सांगून वेळ मारून नेली जात आहे.

विमा कंपनीचा ८०-२० वाटप फॉर्म्युला आणि रखडलेली भरपाई
पीक विमा कंपनीने नुकतेच काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले असले तरी, अजूनही बहुतांश शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून काढणी पश्चात नुकसानभरपाई आणि उत्पन्नावर आधारित नुकसानभरपाईसाठी शासनाकडून हप्ते आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या ७३ हजार ७१८ असून ८१ कोटी ९० लाख रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. विमा कंपनीच्या ८०-२० फॉर्म्युलानुसार, शासनाकडून १०० रुपये मिळाल्यास २० रुपये कंपनी स्वतःसाठी ठेवते व ८० रुपये शेतकऱ्यांना वाटप करते.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांची प्रतिक्षा आणि आश्वासने
काढणी पश्चात नुकसान व उत्पन्नावर आधारित ८२ कोटींची रक्कम राज्य शासनाकडून प्राप्त झाल्यावर ७४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, असे सांगण्यात आले आहे. खरीप २०२४ हंगामासाठी जिल्ह्यातील २ लाख ३९ हजार शेतकऱ्यांना २७९ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्ती व व्यापक स्थानिक आपत्तीमुळे १ लाख ६३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर १५३ कोटी ४० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. मात्र, उर्वरित रक्कम कधी जमा होईल, याची नेमकी तारीख दिलेली नाही.

जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न आणि शेतकऱ्यांचे आक्रोश
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे कधी मिळतील, याची वारंवार विचारणा होत आहे. विमा कंपनीकडून मिळालेल्या लेखी पत्रानुसार, शासनाचा दुसरा हप्ता मिळाल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाई जमा होईल. जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाच्या प्रयत्नांनी लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन अधिकाधिक रक्कम मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

नुकसानभरपाईचे वाटप आणि खरीप २०२५ ची तयारी
खरीप हंगामातील पीकविमा रक्कम मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांना पुढील हंगामाची तयारी करणे कठीण झाले आहे. काही शेतकऱ्यांना नुकतीच नुकसानभरपाई मिळाल्यामुळे समाधान मिळाले, परंतु बरेच शेतकरी अजूनही प्रतिक्षेत आहेत. लवकरात लवकर विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड