अकृषी विद्यापीठांमधील प्राध्यापक भरतीला मंजुरी, नव्या प्रक्रियेनुसार निवड प्रक्रिया सुरु होणार!! – Approval for Professor Recruitment, Selection as per New Process!!
Approval for Professor Recruitment, Selection as per New Process!!
राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील प्राध्यापक भरतीसाठी राज्य सरकारने अखेर मान्यता दिली आहे. अनेक महिन्यांपासून रखडलेल्या या भरती प्रक्रियेस मार्ग मोकळा झाला आहे. सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांसाठी नव्या गुणांकन पद्धतीनुसार निवड केली जाणार आहे.
नवीन प्रक्रियेनुसार, उमेदवारांच्या शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि अध्यापनास ८० टक्के गुण, तर मुलाखतीसाठी २० टक्के गुण दिले जाणार आहेत. तसेच, भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी निवड समितीच्या बैठकांचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
गेल्या काही वर्षांत प्राध्यापक पदांसाठी पैसे मागितल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. तसेच, गुणवत्ताधारक उमेदवारांऐवजी कमी पात्र उमेदवारांची निवड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नवीन कार्यपद्धतीमुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि निष्पक्षता राहील, असे सरकारचे म्हणणे आहे.
निवड प्रक्रियेत उमेदवारांच्या अध्यापन क्षमतेचे आणि संशोधन प्रावीण्याचे मूल्यमापन केले जाईल. त्याचबरोबर परिसंवाद, व्याख्यान प्रात्यक्षिक, तसेच अध्यापन व संशोधनासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याच्या क्षमतेवर चर्चा होईल. १०० गुणांच्या एकत्रित मूल्यांकनात किमान ५० टक्के गुण मिळवणारे उमेदवारच अंतिम निवडीसाठी पात्र ठरणार आहेत.
यापुढे राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये याच कार्यपद्धतीनुसार भरती होणार आहे. निवड समितीच्या बैठकांचे चित्रीकरण करून त्यास सीलबंद ठेवले जाईल. तसेच, प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी निवड समितीच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.