महत्वाचे! आता, अग्निवीरांना शासकीय नोकरीत २० मिळणार टक्के आरक्षण! | Agniveer Recruitment 2025 – Golden Chance!
Agniveer 20% Reservation from 2025
मित्रांनो, एक महत्वाची बातमी समोर आली आहे, उप्र सरकारने मंगळवारी राज्य पोलिस दल आणि इतर शासकीय नोकरीतील थेट भरतीत अग्निवीरांना २० टक्के आरक्षण आणि वयोमर्यादेत तीन वर्षांची सूट देण्याचा निर्णय घेतला. अग्निवीरांसाठी हा आजपर्यंतचा सर्वांत मोठा निर्णय आहे. या माध्यमातून त्यांना सेवा संपल्यानंतर राज्यात सरकारी नोकरीत सेवा देण्याची संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी अर्थमंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी अग्निवीरांना शासकीय नोकरीत २० टक्के आरक्षण आणि वयोमर्यादित तीन वर्षाची सूट देण्याचा प्रस्ताव मांडला, याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. बैठकीनंतर खन्ना म्हणाले, योगी मंत्रिमंडळाने माजी अग्निवीरांना राज्य पोलिस दलात, प्रशासकीय पदे आणि स्पर्धा परीक्षांमार्फत भरल्या जाणाऱ्या शासकीय पदभरतीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. कार्यकाळ पूर्ण केलेल्या अग्निवीरांना सेवेनंतर सरकारी सेवेत संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले. सरकारने जाहीर केलेले आरक्षण खुला प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग अशा सर्व श्रेणींना लागू होणार आहे. आता अन्य राज्यातील उमेदवारांना सुधी हीच अपेक्षित आहे कि आपल्या राज्यात सुद्धा हा निर्णय लागू व्हावा.
सहा महिन्यांत प्रक्रिया सुरू खन्ना म्हणाले, अग्निवीरांचा – कार्यकाळ पूर्ण करणाऱ्यांसाठी आगामी सहा महिन्यांत शासकीय नोकरीत भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे आणि या योजनेंतर्गत पहिली तुकडी २०२६ मध्ये नियुक्त केली जाईल. अनेक राज्ये आणि केंद्रीय दलांनी अग्निवीरांना आरक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला. हरयाणा आणि ओडिशासारख्या राज्यांनी माजी अग्निवीरांनी १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
लाखो तरुणांना रोजगाराची संधी
अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचा कार्यकाळ २०२६-२७ मध्ये संपणार आहे. सुमारे १ लाख अग्निवीरांपैकी २५ हजारांना सैन्यात कायमस्वरूपी नियुक्ती दिली जाईल, तर उर्वरितांना नागरी सेवांमध्ये संधी मिळणार आहे. अशा परिस्थितीत, उत्तरप्रदेश सरकारचे हे पाऊल लाखो तरुणांसाठी शासकीय सेवेत रोजगाराची नवी संधी उपलब्ध करणार असल्याचे खन्ना म्हणाले.
जर आपल्यात भारतीय सैन्य दलात भरती होण्याची इच्छाशक्ती असेल तर सहा तरुणांसाठी सैन्यात नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इंडियन आर्मी अग्नीवीर भरती 2025 ची अधिकृत अधिसूचना 11 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध झाली आहे. यावर्षी भारतीय सैन्याने 25,000 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे, ज्यामध्ये अग्नीवीर जनरल ड्युटी, टेक्निकल, क्लार्क, नर्सिंग असिस्टंट, हवालदार, कनिष्ठ कमीशन्ड अधिकारी (JCO) आणि सिपाही फार्मा यांसारख्या पदांचा समावेश आहे. अर्ज प्रक्रिया 12 मार्च 2025 पासून सुरू झाली असून 10 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.
अग्निपथ योजनेअंतर्गत करिअरची अनोखी संधी
भारतीय सैन्यात प्रवेश मिळवण्याचे हे एक मोठे व्यासपीठ असून, इच्छुक तरुणांना राष्ट्रसेवा करण्याबरोबरच अमूल्य कौशल्य आणि अनुभव मिळण्याची संधी आहे. अग्निपथ योजनेच्या अंतर्गत चार वर्षांसाठी सैन्यदलात भरती होण्याची प्रक्रिया सुरू असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 25% उमेदवारांना नियमित सैन्यात कायमस्वरूपी समाविष्ट केले जाईल. उर्वरित अग्नीवीर उमेदवारांना सरकारी तसेच खासगी क्षेत्रात उत्तम नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाईल.
भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि वयोमर्यादा
अग्नीवीर भरतीसाठी पुरुष आणि महिला दोघांनाही अर्ज करता येईल. उमेदवाराचे वय 17.5 वर्षांपासून 21 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. विविध पदांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आल्या असून, उमेदवारांनी 10वी आणि 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तांत्रिक आणि वैद्यकीय पदांसाठी विज्ञान शाखेतील उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचण्या
अग्नीवीर भरतीसाठी पहिला टप्पा संगणक आधारित परीक्षा (CBT) आहे. या परीक्षेत सामान्य ज्ञान, गणित, तार्किक बुद्धिमत्ता आणि तांत्रिक विषयांवरील प्रश्न विचारले जातील. परीक्षेत यश मिळवणाऱ्या उमेदवारांना भरती रॅलीसाठी बोलावले जाईल, जिथे त्यांची शारीरिक क्षमता, वैद्यकीय चाचणी आणि मानसिक तयारी तपासली जाईल.
सैन्यात सामील झाल्यानंतर मिळणारे फायदे
अग्नीवीर उमेदवारांना पहिल्या वर्षी 30,000 रुपये मासिक वेतन मिळेल, त्यापैकी 21,000 रुपये थेट खात्यात जमा होतील आणि उर्वरित रक्कम अग्नीवीर फंडमध्ये जमा केली जाईल. चार वर्षांनंतर हा पगार वाढत जाईल आणि सेवेसंपत्तीनंतर एकूण 10.04 लाख रुपयांचे संचित फंड मिळेल. याशिवाय 48 लाख रुपयांचे विमा संरक्षण देखील दिले जाईल.
सैन्यात भरतीसाठी अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट www.joinindianarmy.nic.in येथे जाऊन नवीन नोंदणी करावी, अर्ज भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि अर्ज शुल्क भरून अर्ज अंतिम सादर करावा. अर्ज यशस्वीरीत्या सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून भविष्यातील आवश्यकतेसाठी ठेवावी.
देशसेवा आणि उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी!
इंडियन आर्मी अग्नीवीर भरती 2025 ही केवळ एक नोकरी नाही, तर राष्ट्रसेवेची सर्वोत्तम संधी आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर उमेदवारांना संरक्षण, सुरक्षा आणि खासगी क्षेत्रातही उत्तम नोकरीच्या संधी प्राप्त होतील. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी साधावी आणि भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी त्वरित अर्ज करावा!