तंत्रशिक्षण मंडळाकडून पदविकांचा निकाल!! जाणून घ्या सविस्तर माहिती
MSBTE Result 2022
MSBTE Result 2022
MSBTE Result 2022: MSBTE Result Of Diplomas Conducted By The State Board Of Technical Education Have Fallen. Further details are as follows:-
तंत्रशिक्षण मंडळाकडून प्रामुख्याने अभियांत्रिकी, फार्मसी आणि हॉटेल मॅनेजमेंटसाठी दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम चालवला जातो. दहावीनंतर विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. यंदा अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पार पडल्या. त्यापूर्वी त्यांना ऑनलाइन शिक्षणाद्वारे शिकवले जात होते. परीक्षा मात्र, ऑफलाइन झाल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला, असे सांगितले जात असून, ४० टक्केच निकाल लागल्याचे चित्र आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून (State Board of Technical Education) घेण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी, फार्मसी आणि हॉटेल मॅनेजमेंट पदविका परीक्षेचे निकाल मोठ्याप्रमाणावर घसरल्याचे उघडकीस आले आहे.
- यंदा केवळ ४० टक्के विद्यार्थी पदविका अभ्यासक्रमात उत्तीर्ण झाले असून, ऑनलाइन शिक्षणामुळे ही गोष्ट घडली असल्याची खंत विद्यार्थी व्यक्त करीत आहेत.
- पदविका परीक्षेला बसलेले जवळपास निम्म्याहून अधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण का झाले, असाही प्रश्न संस्थाचालकांकडून विचारला जात आहे.
- तंत्रशिक्षण मंडळाकडून प्रामुख्याने अभियांत्रिकी, फार्मसी आणि हॉटेल मॅनेजमेंटसाठी दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम चालवला जातो.
- दहावीनंतर विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. यंदा अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पार पडल्या.
- त्यापूर्वी त्यांना ऑनलाइन शिक्षणाद्वारे शिकवले जात होते.
- परीक्षा मात्र, ऑफलाइन झाल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला, असे सांगितले जात असून, ४० टक्केच निकाल लागल्याचे चित्र आहे.
- एवढ्या मोठ्या प्रमाणावर निकाल घसरण्याची ही गेल्या अनेक वर्षांमधील पहिलीच घटना असल्याचे काही संस्थांच्या प्राचार्यांकडून सांगण्यात आले.
काही प्राचार्यांच्या मते अंतिम परीक्षेसाठी जे प्रश्न विचारण्यात आले होते, ते प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरचे होते. याशिवाय परीक्षेसाठी दर वर्षी जो पॅटर्न सेट केला जातो. त्या पलिकडे जाऊन प्रश्न विचारण्यात आले होते. यामुळे परीक्षेत विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला असून, त्याचा परिणाम निकालावर झाला असल्याचे प्राचार्यांकडून सांगितले जात आहे.
विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत
पदविका परीक्षांमध्ये मोठ्याप्रमाणावर विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत असून, ऑनलाइन परीक्षा पुन्हा घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी काही संस्थाचालक करीत आहेत. संपूर्ण शिक्षण ऑनलाइन पद्धतीने झाल्यानंतर विद्यार्थ्यांना द्याव्या लागलेल्या ऑफलाइन परीक्षेतही अभ्यासक्रमाच्या बाहेरचे प्रश्न असल्याने परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.