डिप्लोमा ऍडमिशन यावर्षी महत्वाचा बदल बघा
Diploma Admission 2020
Diploma Admission 2020 -2021 – दहावी आणि बारावीनंतरच्या तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाची यंदा एक प्रवेश फेरी कमी करण्यात आली असून दोनच नियमित फेऱ्या होणार आहेत. तर, केवळ महाराष्ट्रात इयत्ता १० वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळणार आहे. याबाबत तंत्रशिक्षण संचालनालयाने नवीन आदेश जाहीर केले आहेत.
दहावीनंतर पाॅलिटेक्नीकला प्रवेश घेता येतो, तर इयत्ता बारावीनंतर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या शाखांच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. त्याचप्रमाणे द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठीही प्रवेश देण्यात येतात. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक आणि प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयाने अद्याप जाहीर केले नसले प्रवेशासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे.
या अभ्यासक्रमासाठी इयत्ता ८वी, ९वी आणि १०वी हे शिक्षण महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त संस्थेत होणे आवश्यक होते. पण आता बदललेल्या नियमानुसार ८वी, ९वी इतर राज्यात केले तरी १०वी महाराष्ट्रात झाली असेल, तर या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
दरवर्षी या सर्व अभ्यासक्रमाच्या तीन फेऱ्या होतात, पण यंदा दोनच प्रवेश फेऱ्या घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तिसरी प्रवेश फेरी रद्द करण्यात आली आहे. यामुळे प्रवेश प्रक्रियेचा कालावधी कमी होणार आहे. अल्पसंख्याक महाविद्यालयांनाही दोन प्रवेश फेऱ्यांचा आदेश लागू होणार आहे.
जे विद्यार्थी अर्ज भरू न शकलेले, प्रवेश न मिळालेले, न घेतलेले अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी घेतली जाणार आहे. दोन प्रवेश फेऱ्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश देण्यात येतील. त्यात राज्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. त्यानंतरही जागा रिक्त राहिल्यास इतर राज्यातील विद्यार्थी आणि परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देता येतील.
आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयानुसार यंदा या अभ्यासक्रमांसाठी मराठा प्रवर्गासाठी १६ ऐवजी १२ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतील. यंदा अभ्यासक्रम किंवा संस्था बंद करण्यासाठी अर्ज केलेल्या संस्थांना यंदा प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, असे आदेशात नमूद केले आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
– नियमात बदल केल्याने प्रवेश वाढण्याची शक्यता
– डिफेन्सच्या कोट्यासाठी ५ जागांऐवजी ५ टक्के जागा आरक्षित
– कागदपत्र तपासणीसाठी स्वतंत्र आदेश काढले जाणार
– महाराष्ट्रात ८वी, ९वी उत्तीर्ण न होता, थेट १०वीत प्रवेश घेणाऱ्यांना दिलासा
बारावी नंतर चे admission कशे करतील??
अनुकंपा भरती कधी होणार ??
Hello..!! Majhe nav Komal ani me jalna ya city madhun 12th pass keli tya nantar kahi adchani mule r majhi education thambla gela ani 2years waste gele so aata mala education karaycha kahi tri carrier banvaycha so tumhi kahi madat karu shkta ka?