MPSC State Services Exam
प्रश्नपत्रिका फुटीच्या आरोपांनी एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी ‘राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६’च्या प्रश्नपत्रिकांबाबत उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढली असून, पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी पेपर नव्याने सेट करावेत, अशी जोरदार मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात तयार करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकांबाबत संशय व्यक्त केला जात असून, या पार्श्वभूमीवर जुन्या पेपरवर परीक्षा घेणे योग्य ठरेल का, असा सवाल उमेदवार उपस्थित करत आहेत. दरम्यान, या प्रकरणावर आयोगाकडून अद्याप स्पष्ट भूमिका समोर न आल्याने विद्यार्थ्यांमधील संभ्रम आणि चिंता अधिकच वाढली आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा तोंडावर असताना प्रश्नपत्रिकांच्या पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ‘एमपीएससी’तर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२६चा निकाल २२ जून रोजी जाहीर झाला असून, मुख्य परीक्षा ३ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान नियोजित आहे. परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना प्रश्नपत्रिका नव्याने सेट करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता अमोल देबडवार म्हणाले, “परीक्षेला आता अवघे १६ दिवस उरले आहेत. प्रश्नपत्रिका साधारण दोन महिने आधीच तयार केल्या जात असल्याने, आयोगाचे निलंबित अवर सचिव अभिजित लेंडवे यांच्या कार्यकाळातच या प्रश्नपत्रिका तयार झाल्या असण्याची शक्यता आहे. औषध निरीक्षक परीक्षेची प्रश्नपत्रिका दोन महिने आधीच फुटल्याची बाब खुद्द एमपीएससीच्या अध्यक्षांनी मांडली आहे. त्यामुळे परीक्षेची विश्वासार्हता आणि विद्यार्थ्यांचा आयोगावरील विश्वास कायम ठेवण्यासाठी जुन्या प्रश्नपत्रिका रद्द करून नव्याने पेपर सेट करावेत,” अशी मागणी त्यांनी केली.दरम्यान, या प्रकरणी ‘एमपीएससी’चे सचिव महेंद्र हरपाळकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
मुख्यमंत्र्यांची ग्वाही अन् आयोगाचे मौन
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही एमपीएससीच्या उमेदवारांचा संभ्रम कायम असून, ‘मुलाखतीची तयारी करायची की मुख्य परीक्षेचा अभ्यास?’ असा पेच त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नपत्रिकांची फेरतपासणी होईपर्यंत मुलाखती थांबविण्याचे आश्वासन दिले असले, तरी आयोगाकडून याबाबत अद्याप स्वतंत्र अधिकृत परिपत्रक किंवा सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये चिंता वाढली असून, पुढील नियोजनाबाबत स्पष्टता मिळावी, अशी मागणी होत आहे.
राज्यसेवा २०२५ची पूर्व परीक्षा ९ नोव्हेंबर २०२५ रोजी झाली होती. त्यानंतर मुख्य परीक्षा ५ एप्रिल ते २ मे २०२६दरम्यान घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल २४ ऑगस्ट रोजी जाहीर झाल्यानंतर पात्र उमेदवारांनी मुलाखतीच्या तयारीला सुरुवात केली. मुलाखती ७ सप्टेंबरपासून घेण्याचे नियोजन होते. मात्र, त्या पुढे ढकलण्यात आल्या असून आता २१ ते २४ तसेच २६ आणि २८ सप्टेंबरदरम्यान मुलाखती घेण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने तातडीने अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करून मुलाखतींचे वेळापत्रक आणि पुढील प्रक्रियेबाबत स्पष्टता द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















