मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीना वर्षभरापासून नाही मानधन!

yuva karya prashikshan Yojana Payment

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाअंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यासाठी व अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी नेमण्यात आले. मात्र, हे सर्व प्रशिक्षणार्थी वर्षभर मानधनापासून वंचित आहेत. या सर्वांना तातडीने मानधन देण्यात यावे. अन्यथा, बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डेमॉक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाचे जिल्हा सचिव सचिन देसाई, अविनाश गवारी आणि अॅड. विलास साबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या योजनेच्या अधीन राहून संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा परिषद, पुणे यांनी माहे सप्टेंबरमध्ये सहा महिन्यांच्या मानधन तत्त्वावर १३८६ प्रशिक्षणार्थांना ग्रामपंचायत पातळीवर काम करण्याचे नेमणुकीचे पत्र दिले होते. सर्व प्रशिक्षणार्थीनी अत्यंत प्रामाणिकपणे आपले सहा महिन्यांचे काम केले आहे. मानधन मिळावे, याबाबत अनेक वेळा जिल्हा परिषद पुणे व कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग पुणे या ठिकाणी फेऱ्या मारल्या आहेत. तरीदेखील अद्याप एक रुपयाचेसुद्धा मानधन मिळालेले नाही.

 

त्याच बरोबर शासनाने शासन निर्णयानुसार प्रत्येक प्रशिक्षणार्थीला बारावी, आय.टी.आय, पदवीधर अशी शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांना सहा हजार, आठ हजार व दहा हजार असे मानधन ठरविण्यात आले. पण त्याची अंमलबजावणी जिल्हा परिषद, पुणे हे करताना दिसत नाही. प्रशिक्षणार्थीचे मानधन जमा न झाल्यास सर्व योजनादूत व डेमॉक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया पुणे जिल्हा समितीच्या नेतृत्वाखाली उद्या बुधवारी (दि. १३) सकाळी ११ वाजल्यापासून जिल्हा परिषद कार्यालय पुणे येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहेत.


 

नोकरीसाठी जाईल त्या ठिकाणी विचारला जातो तो अनुभव. यामुळे अनेकजणांना नोकरीपासून वंचित रहावे लागते. परंतु सरकारच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत उमेदवारांना सहा महिन्यांसाठी सहा हजार रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन दिले जात आहे (yuva karya prashikshan Yojana Payment). या योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात तीन हजारांहून उमेदवारांची प्रशिक्षणार्थी भरती झाली आहे. सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना अनुभवाचे प्रमाणपत्र मिळणार आहे. यामुळे या उमेदवारांना सहा महिन्यांसाठी रोजगार मिळणार आहेच, त्यासोबत अनुभवाची शिदोरीही पाठीशी राहणार आहे. बहुतांश जणांना अनुभव नसल्याने नोकरी मिळवण्यासाठी अडचण येते. त्यामुळे बेरोजगारीत भर पडत असल्याचे चित्र आहे. तसेच शिक्षणानंतर युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यात नोकरी मिळवण्याची क्षमता वाढविणे गरजेचे आहे. यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली. राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण यांच्यामार्फत संयुक्तपणे ही योजना राबविण्यात येत आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात युवक-युवती शिक्षण घेऊन नोकरी-व्यवसायाच्या शोधात असतात.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Mukhyamantri – Yuva Karya Prashikshan Yojana  Ahmednagar 
या योजनेंतर्गत युवकांना सहा महिन्यांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा, तसेच या योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागातील मंजूर पदांच्या पाच टक्के पदे कौशल्य विकास विभागाच्या महास्वयं पोर्टलवर तत्काळ नोंदवावीत, प्रशिक्षणार्थ्यांना कार्यालयात रुजू करून घ्यावे, या योजनेमुळे शासकीय आस्थापनांना शासकीय कामकाजासाठी मनुष्यबळ उपलब्ध होईल, यामुळे सर्व आस्थापनांनी ऑनलाइन नोंदणीला प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने शासकीय व खासगी आस्थापनांना यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार गेल्या महिन्यापासून आतापर्यंत शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये ता. १४ सप्टेंबरपर्यंत ४१०१ उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. त्यापैकी २९२० उमेदवारांना प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी रुजू करून घेण्यात आले आहे. या योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची प्रक्रिया आहे. त्यानंतर संबंधित आस्थापनेकडून मुलाखतीला बोलवून घेऊन त्यानंतर त्या उमेदवाराला रुजू करून घेतले जात आहे. यापुढेही ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.

 

उमेदवारांना मिळतेय असे विद्यावेतन
बारावी, आय.टी.आय, पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलेल्यांना सहा महिने प्रशिक्षणासाह विद्यावेतन देण्यात येत आहे. यामध्ये बारावी उत्तीर्ण उमेदवारांना सहा हजार रुपये, आय. टी. आय., पदविका शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना आठ हजार रुपये, पदवीचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना दहा हजार रुपये विद्यावेतन मिळत आहे.

उमेदवारांना प्रशिक्षणासाठी अटी
उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष दरम्यान असावे. शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण/आय.टी.आय/पदविका/ पदवी/ पदव्युत्तर पदवी अशी असावी. उमेदवारांची आधार नोंदणी असावी. तसेच उमेदवारांचे बँक खाते आधार संलग्न असावे. इच्छुक उमेदवारांनी विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच पोर्टलवरील पदांसाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्‍यक आहे. उमेदवार नोंदणीत पुणे विभागात कोल्हापूर प्रथम
शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये प्रशिक्षणासाठी ता. १४ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील ४१०१ उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. तर २९२० उमेदवार आस्थापनांमध्ये रुजू झाले आहेत.या नोंदणीत कोल्हापूर जिल्हा हा पुणे विभागात सर्व प्रथम आला आहे.

 

उद्योजकांना २० टक्के उमेदवार घेता येणार
या योजनेंतर्गत ज्या खासगी उद्योजकांकडे १ ते १० मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यांना १ उमेदवार तर ज्यांच्याकडे ११ते २० मनुष्यबळ आहे, त्यांना २ पदे भरता येणार आहेत. २० पेक्षा अधिक मनुष्यबळ असणाऱ्या उद्योजकांना १० टक्के उमेदवार घेता येणार आहेत. तसेच सेवा क्षेत्रातील उद्योजकांना २० टक्के उमेदवार घेता येणार आहेत.

 

विविध माध्यमातून उमेदवारांची नोंदणी
रोजगार रथामार्फत एम.आय.डी.सी. व शैक्षणिक संस्थांना भेट देऊन उमेदवारांची नोंदणी केली जात आहे. त्याचबरोबर दुर्गम भागातील युवकांसाठी रोजगार रथामार्फत ‘रोजगार आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जात आहे. विविध आस्थापनांमध्ये जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय रोजगार मेळावे घेतले जात आहेत. तसेच औद्योगिक संघटनांची संमेलनेही घेतली जात आहेत.
….


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड