हिवाळी सत्र परीक्षेचे निकाल जाहीर, येथे चेक करा आपले निकाल ऑनलाईन – BAMU Winter 2025 Semester Exam Results Announced!
Winter Semester Exam Results Announced!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि संलग्न महाविद्यालयातील १७७ अभ्यासक्रमांच्या ३ लाख ५५ हजार ९९२ विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले असल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली आहे.
विद्यापीठातील अनेक विद्यार्थी हिवाळी सत्र परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर विद्यापीठाने निकाल जाहीर केला असून, दुसऱ्या सत्रातील परीक्षा २ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. त्या ४० दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.विद्यापीठाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासह २०१४ पासून प्रलंबित असलेल्या परीक्षा घेतल्या आहेत. १७९ पैकी १७७ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले असले तरी एम.एस्सी केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्सच्या निकालाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्यातील निवडणुकीमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्यामुळे निकाल उशिरा लागला. परीक्षेच्या नव्या पद्धतीनुसार लेखी परीक्षेसाठी ३० आणि अंतर्गत मूल्यमापनासाठी २० गुण आहेत. लेखी परीक्षेत १० गुणांचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न, ५ गुणांचे दोन प्रश्न आणि १० गुणांसाठी एक प्रश्न असा स्वरूप ठेवण्यात आला आहे. उत्तरपत्रिका किमान १६ पानांची असावी, अशी अट घालण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक भार वाढल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे.