राज्यात शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू, या टप्यात होणार भरपूर पदांची भरती!-Second phase of teacher recruitment begins!
Second phase of teacher recruitment begins!
राज्यात शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा मंगळवारपासून सुरू झाला आहे. उमेदवारांना पवित्र पोर्टलवर २० मार्चपर्यंत स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र, या टप्प्यात नक्की किती शिक्षकांची भरती होणार, हे स्पष्ट नसल्याने टीएआयटी पात्र उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र या टप्यात भरपूर पदे भरण्यात येणार असल्याचे समजते. हि भरती म्हणजे महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी पर्वणीच आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीकडे डीएड आणि बीएड धारकांचे लक्ष लागले आहे. २०२३-२४ नंतर आता दुसऱ्या टप्प्यात भरती सुरू झाली असून, ‘टीएआयटी-२०२२’ मधील गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या टप्प्यात उमेदवारांना नवीन नोंदणी, तसेच मागील स्वप्रमाणपत्र दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शिक्षक भरती ही रिक्त पदे, इयत्तांचा गट, विषय, अध्यापनाचे माध्यम, आरक्षण आणि गुणांच्या आधारे होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुलाखतीशिवाय निवड प्रक्रिया पार पडेल, तर खासगी संस्थांमध्ये मुलाखतीसह किंवा मुलाखतीशिवाय निवड पर्याय उपलब्ध असेल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. शिक्षक भरती जाहिरातींकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले असून, संस्थांना १५ मार्चपर्यंत जाहिराती अपलोड करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, भरतीसाठी येणाऱ्या जाहिरातींचे प्रमाण कमी असल्याने उमेदवारांमध्ये नाराजी आहे, असे दिसून येते.