RTE आरटीई प्रतीक्षा यादीतील तिसरी फेरी सुरू, पूर्ण माहिती | RTE 3nd Round Admission 2025!
RTE 3nd Round Admission 2025
RTE 3nd Round Admission 2025 – शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील आरटीई प्रवेश प्रक्रियेत सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या प्रतीक्षा यादीतील दुसऱ्या फेरीतील प्रवेशाची मुदत अखेर (दि. २१) संपुष्टात आली. त्यानंतर आता तिसरी फेरी सुरू करण्यात आली असून, २८ एप्रिल ते ७ मे दरम्यान संबंधित फेरी राबविण्यात यावी, असे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत. आत्तापर्यंत ८६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे आरटीईद्वारे प्रवेश निश्चित झाल्याचे आरटीई पोर्टलवरील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. आरटीई प्रवेशासाठी यंदा राज्यातील ८ हजार ८६३ शाळांमध्ये १ लाख ९ हजार १०२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी ३ लाख ५ हजार १५१ अर्ज दाखल झाले होते. प्रवेशासाठी काढलेल्या सोडतीद्वारे १ लाख १ हजार ९६७ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्यानंतर १० मार्चपर्यंत ६९ हजार ५८२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले.
त्यामुळे उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पहिल्या टप्प्यातील प्रवेश १८ मार्चपासून सुरू करण्यात आले. त्यासाठी २४ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली. या फेरीसाठी १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर दुसरी फेरी ८ ते १५ एप्रिलदरम्यान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या फेरीसाठी २१ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता २८ एप्रिल ते ७मेदरम्यान तिसरी फेरी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान आत्तापर्यंत नियमित यादीमध्ये ६९ हजार ५८२, पहिल्या प्रतीक्षा यादीत १२ हजार ४९ तर दुसऱ्या प्रतीक्षा यादीत ४८०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. नियमित आणि दोन्ही प्रतीक्षा यादी मिळून तब्बल ८६ हजार ४३१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर तिसऱ्या प्रतीक्षा यादीमध्ये २ हजार ४८२ विद्यार्थ्यांचे प्रवेश जाहीर करण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी साधारण चार फेऱ्या राबविण्यात येणार आहेत. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत जवळपास ८६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. दरवर्षी साधारण ८२ ते ८३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होतात. त्यामुळे आता प्रवेश प्रक्रिया राबवण्यास जास्त वेळ लागणार नाही.
RTE 2nd Round Admission 2025 – शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील आरटीई प्रवेश प्रक्रियेत सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशाची मुदत अखेर मंगळवारी संपली असून आता दुसऱ्या प्रतीक्षा यादीची तयारी सुरू केली आहे. सोमवारी दुसऱ्या प्रतीक्षा यादीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. आरटीई प्रवेशासाठी यंदा राज्यातील ८ हजार ८६३ शाळांमध्ये १ लाख ९ हजार १०२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी ३ लाख ५ हजार १५१ अर्ज दाखल झाले होते. प्रवेशासाठी काढलेल्या सोडतीद्वारे १ लाख १ हजार ९६७विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्यानंतर १० मार्चपर्यंत ६९ हजार ६९३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. त्यामुळे उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पहिल्या टप्प्यातील प्रवेश १८ मार्चपासून सुरू करण्यात आले. त्यासाठी २४ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली. त्यानंतर १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, पहिल्या प्रतीक्षा यादीत मंगळवारी सायंकाळपर्यंत ११ हजार २४१ विद्याथ्यर्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. नियमित आणि प्रतीक्षा यादी मिळून तब्बल ८० हजार ९३४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून राबविण्यात येणार्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी साधारण चार फेऱ्या राबविण्यात येणार आहेत. आत्तापर्यंत जवळपास ८१ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. दरवर्षी साधारण ८२ ते ८३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होतात. त्यामुळे आता प्रवेश प्रक्रिया राबवण्यास जास्त वेळ लागणार नाही. पुढील तीन फेल्या या एप्रिल महिन्यात पूर्ण होतील.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये २५% राखीव जागांवरील आरटीई प्रवेश प्रक्रियेचा आज (सोमवार) शेवटचा दिवस आहे. मात्र, प्रतीक्षा यादीत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांपैकी केवळ ३ हजार बालकांचेच प्रवेश झाले आहेत, असे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक पालकांनी या प्रवेश प्रक्रियेकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे.
१ लाखांहून अधिक जागांसाठी अर्ज, पण प्रवेश प्रक्रिया संथ!
यंदा राज्यातील ८,८६३ शाळांमध्ये १,०९,०८७ जागा आरटीई अंतर्गत उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यासाठी ३,०५,१५२ पालकांनी अर्ज दाखल केले होते. सोडतीद्वारे १,०१,९६७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते, परंतु आतापर्यंत फक्त ६९,७७१ बालकांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत.
प्रतीक्षा यादीतील प्रवेशास पालकांचा कमी प्रतिसाद
प्रवेश न घेतलेल्या जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला गेला. पहिल्या प्रतीक्षा यादीत २६,१६६ बालकांना प्रवेश मिळाला होता. मात्र, २४ मार्चपर्यंत फक्त ३,०२ बालकांचेच प्रवेश पूर्ण झाले आहेत. हा अत्यल्प प्रतिसाद चिंताजनक असल्याचे प्रशासनाचे मत आहे.
पालकांनी संधीचा लाभ घ्यावा – शिक्षण विभागाचा आग्रह
राज्यातील अनेक पालक प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रियेत भाग घेत नसल्याने त्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षणाची संधी गमवावी लागू शकते. शिक्षण विभागाने पालकांना वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
आज शेवटचा दिवस! प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा
पालकांनी आजच (सोमवार) प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा प्रवेश संधी गमावली जाऊ शकते. आरटीई अंतर्गत मोफत शिक्षण मिळवण्याची ही अखेरची संधी असल्याने, पालकांनी तत्काळ संबंधित शाळांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
पालकांनी संधी न गमावता आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया आजच पूर्ण करावी!