बाजारात खरंच प्लास्टिकची अंडी आली आहेत का?
Plastic Eggs in Mumbai Region
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत प्लास्टिकची अंडी मिळत असल्याची अफवा पसरली आहे. कांदिवलीमधील चारकोप भागात अशी अंडी मिळत असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता वसईतही बाजारात प्लास्टिकची अंडी मिळत असल्याची अफवा पसरली आहे. वसईत अनेक ठिकाणी प्लास्टिकची अंडी मिळत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
विरार मधील नाना नानी पार्क, गुरुदत्त नगर, बोलींज, नालासोपारा, आचोळ, समेळपाडा, वसई गिरिज या ठिकाणी असे प्रकार आढळून आले आहेत. लोक दुकानात जाऊन चक्क अंडी फोडून पाहत आहेत. तसंच त्याचे व्हिडीओ बनवून समाजमाध्यमांवर प्रसारित करत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं चित्र आहे. समेळ पाड्यात एका अंडे विक्रेत्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अनेक लोक अंडे फोडून त्याचा पापुद्रा जाळून पाहत आहेत. सोशल मिडियावर सध्या हा विषय जलदगतीने पसरत आहे. यामुळे अंडी विक्रेते चांगलेच अडचणीत आले आहेत. नागरिकांचा रोष ओढवू नये म्हणून विक्रेते चक्क दुकानात अंडी मिळत नसल्याचं सांगत आहेत.
ही अंडी नेमकी प्लास्टिकची आहेत की नाही याची कोणतीही तपासणी केली जात नाही आहे. पण अन्न व औषध प्रशासन विभागाने यासंदर्भात माहिती देताना, प्लास्टिकची अंडी नसतात, ही केवळ अफवा असल्याचं सांगितलं आहे. “प्लास्टिकचं अंडे तयार केलं जाऊ शकत नाही. अनेक ठिकाणी अंड्यांची तपासणी केली. आम्हाला यामध्ये काहीही आढळलं नाही. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,” असं आवाहन अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त प्रकाश वाघमारे यांनी सांगितले.