मनरेगा मार्फत देशात रोजगार निर्मितीत महाराष्ट्र सर्वात समोर !-Maharashtra’s MNREGA Boom!
Maharashtra's MNREGA Boom!
महाराष्ट्राने मागील पाच वर्षांत मनरेगा अंतर्गत रोजगार निर्मितीत देशात सर्वाधिक प्रगती केली आहे.
मनरेगामध्ये महाराष्ट्रात तयार झालेले ‘मनुष्य दिवस’ तब्बल २.५५ पट वाढले आहेत —
२०१९-२० मध्ये ६२९.५८ लाख मनुष्य दिवस होते, ते आता १,६११.२० लाखांवर गेले आहेत.
राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक वेगाने वाढ
देशपातळीवर मनरेगातील वाढ केवळ ८% इतकी होती, तर महाराष्ट्राची वाढ याच कालावधीत २५५% झाली आहे — यामुळे राज्य सर्वाधिक वेगाने ग्रामीण रोजगार निर्माण करणारे राज्य ठरले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ग्रामीण कुटुंबांना मनरेगाचा मोठा आधार
- राज्यात ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी मर्यादित असल्याने अनेक कुटुंबे मनरेगावर अवलंबून आहेत.
- विशेषतः कोरोनाकाळात या योजनेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला होता.
‘मनुष्य दिवस’ म्हणजे काय?
- ‘मनुष्य दिवस’ म्हणजे एका व्यक्तीने एका दिवसात केलेल्या कामाची मोजणी.
- मनरेगात प्रत्येक व्यक्तीने प्रतिदिन केलेलं काम एक मनुष्य दिवस मानलं जातं.
२०२४-२५ साठी मनरेगाचा निधी आणि इतर राज्यांची स्थिती
- उत्तर प्रदेशने २०२४-२५ मध्ये ३,३३७.९१ लाख मनुष्य दिवसांसह आघाडी घेतली.
- मात्र, वाढीच्या टक्केवारीत महाराष्ट्रानेच सर्व राज्यांना मागे टाकले आहे.