खुशखबर! नवे तंत्रज्ञान, नवे उद्योग; नव्या वर्षात भरपूर नाेकऱ्या मिळणार! – Maharashtra New Jobs
Maharashtra New Jobs
Maharashtra New Jobs
नवे तंत्रज्ञान आणि त्यावर मोठ्या प्रमाणात सुरु होत असलेले उद्योग यामुळे नव्या वर्षात मोठ्या प्रमाणात तरुणांना नोकऱ्या मिळण्याचे संकेत मिळत आहेत. जॉब्स अँड टॅलेंट प्लॅटफॉर्म फाऊंडइटच्या एका अहवालातून ही बाब पुढे आली आहे. आगामी वर्षात नोकऱ्या देण्याचे प्रमाण ९ टक्क्यांनी वाढू शकते, असे यात म्हटले आहे. २०२४ मध्ये नव्या नियुक्तींचे प्रमाण १० टक्के इतके होते. नोव्हेंबर हे प्रमाण ३ टक्क्यांनी वाढले आहे. यातून २०२५ मध्येही नव्या नियुक्तीचे प्रमाण वाढण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत, असे यात म्हटले आहे. आगामी वर्षात अनेक तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये प्रशिक्षित कामगारांना वरिष्ठ पदांसाठी मोठी मागणी असणार आहे. अनुभवी कामगारांचीही चलती असेल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
डिजिटलीकरणाने मिळाली गती
■ २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये नोकऱ्या मिळणयाचे प्रमाण सर्व क्षेत्रांमध्ये चांगले होते. ■ कन्ड्युमर इलेक्ट्रॉनिक्स २० टक्क्यांनी वाढले. तर रिअल इस्टेटमध्ये नोकऱ्या २१ टक्के वाढल्या आहेत.
■ वाढते औद्योगिकरण, यंत्रणांचे वेगाने होणारे डिजि- टलीकरण आणि वेगाने होणारे शहरीकरण यामुळे नोकऱ्यांच्या निर्मितीला आणखी गती मिळाली आहे.
कोईमतूरमध्ये मागील वर्षात २७ टक्के नोकऱ्या मिळाल्या. हेच प्रमाण जयपूरमध्ये २२ टक्के होते.
कोणत्या क्षेत्रात अधिक संधी?
■ पुढच्या वर्षात आयटी, रिटेल, टेलिकॉम, बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रात नव्या नियुक्तींचे प्रमाण लक्षणीय असेल, असेही म्हटले आहे.
■ एज कम्प्युटिंग, क्वांटम अॅप्लिकेशन, सायबर सिक्युरिटी, इनोव्हेटिव्ह मॅनिफॅ- क्चरिंगसह हेल्थकेअरमध्येही मिळणाऱ्या नोकऱ्यांचे प्रमाण लक्षणीय असणार आहे.
■ रिटेल मिडिया नेटवर्क, एआय संचालित ई-कॉमर्स, एचआर, डिजिटल सर्व्हिसेस या क्षेत्राचे स्वरुप आगामी काळात झपाट्याने बदलून जाणार आहे.
Maharashtra New Jobs: अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव वाढत चालल्यामुळे ॲपलने आपले प्रकल्प चीनबाहेर हलविण्याची योजना आखली असून त्याच योजनेंतर्गत फॉक्सकॉन भारतात येत आहे. ‘ॲपल’चा भागीदार असलेला फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी समूह भारतात ७०० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे. बंगळूरू येथे मोठा प्रकल्प उभारणार असून त्याद्वारे १ लाखांहून अधिक लोकांना नोकऱ्याही मिळणार आहेत.
ॲपलने २०१७ पासून भारतात आयफाेनचे उत्पादन सुरू केले हाेते. फाॅक्सकाॅन, विस्ट्राॅन आणि पेगाट्राॅन हे त्यासाठी ॲपलचे भारतातील भागीदार आहेत. त्यांना सरकारच्या पीएलआय याेजनेचाही लाभ मिळत आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये तब्बल १ अब्ज डाॅलर्स एवढ्या मूल्याचे आयफाेन भारतातून निर्यात झाले हाेते. स्मार्टफाेन निर्यातीचा हा उच्चांक हाेता. भारतातून सर्वच स्मार्टफाेनची निर्यात सातत्याने वाढत आहे.
- हा ‘फॉक्सकॉन’चा भारतातील सर्वांत मोठा एकल प्रकल्प ठरणार आहे. ग्राहक इलेक्ट्रॉनिक्सचा जगातील सर्वांत मोठा उत्पादक चीनचा किताब ‘फॉक्सकॉन’च्या स्थलांतरामुळे धोक्यात येऊ शकतो.
- या प्रकल्पात १ लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे. चीनच्या झेंगझोऊ येथील फॉक्सकॉन प्रकल्पात २ लाख लोक काम करतात.
- कोविड-१९ साथीमुळे तेथील उत्पादन घटले आहे. त्यामुळे ॲपलने चीनबाहेर निर्मिती प्रकल्प वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, असे सूत्रांनी सांगितले.
ॲपलने २०१७ पासून भारतात आयफाेनचे उत्पादन सुरू केले हाेते. फाॅक्सकाॅन, विस्ट्राॅन आणि पेगाट्राॅन हे त्यासाठी ॲपलचे भारतातील भागीदार आहेत. त्यांना सरकारच्या पीएलआय याेजनेचाही लाभ मिळत आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये तब्बल १ अब्ज डाॅलर्स एवढ्या मूल्याचे आयफाेन भारतातून निर्यात झाले हाेते. स्मार्टफाेन निर्यातीचा हा उच्चांक हाेता. भारतातून सर्वच स्मार्टफाेनची निर्यात सातत्याने वाढत आहे.
Maharashtra New Jobs Vacancies – वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस प्रकल्प व बल्क ड्रग पार्कसारखे मोठे प्रकल्प राज्यातून गेल्याने शिंदे – फडणवीस सरकारला विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या आरोपांना व लोकक्षोभाला सामोरे जावे लागत आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी महाराष्ट्रातील रांजणगाव येथे ईएमसी उभारण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (MIDC) हे क्लस्टर उभारण्याची मंजुरी आज दिली. यामुळे रांजणगाव एक इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून विकसित होईल, असेही ते म्हणाले.
तरुणांना उद्याेगाची संधी-
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्मिती भारतीय बनावटीची राहावी, यासाठी केंद्र सरकार प्रोत्साहन देत असून, या हेतूने पुण्यातील सी-डॅक या संस्थेच्या माध्यमातून स्टार्टअपला चालना देण्यात येणार असल्याचे राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले. सी-डॅक ही इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था असून, येत्या काही वर्षात एक हजार कोटी रुपयांचे स्टार्टअप सुरू करण्याचा मानस केंद्र सरकारचा आहे. सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स चीप व इतर पूरक उद्योगांवर यात भर दिला जाणार आहे. यात महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांनी उद्योग उभारावेत, यासाठी येत्या काही दिवसात पुण्यात रोड शो हाेणार असल्याचे ते म्हणाले.
उद्योग गेल्याने फरक पडत नाही-
महाराष्ट्रातून उद्योग जात असल्याने घाईघाईने या प्रकल्पाची घोषणा केली काय? असे विचारले असता राजीव चंद्रशेखर म्हणाले, हे स्पर्धेचे युग आहे. एखाद्या राज्यातून एखादा उद्योग गेल्याने फरक पडत नाही.