दहा शासकीय विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे रिक्त; जाणून घ्या!
Government Employees Vacancy Details
Government Employees Vacancy Details
Government Employees Vacancy Details : Vacancies of officers and employees in ten government departments in the taluka. As many as 75 posts of officers and employees have been vacant for the last four years. Further details are as follwos:-
तालुक्यातील दहा शासकीय विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे रिक्त. तब्बल ७५ अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे मागील चार वर्षांपासून पदे रिक्त आहेत. तिवसा व चांदूर रेल्वे तालुक्याचे विभाजन करीत धामणगाव तालुक्यातील ११२ महसुली गावे एकत्र करून १ ऑगस्ट १९९८ रोजी धामणगाव तहसील कार्यालयाची निर्मिती झाली. त्यानंतर तहसील कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी कार्यालय भूमिअभिलेख, सहायक निबंधक, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह दहा नवीन कार्यालयांची निर्मिती झाली. मात्र, या विभागातील २३ वर्षांतही पदे भरण्यास शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली नसल्याचे दिसून येत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
रिक्त पदे भरणार कधी?
संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदाराचे पद मागील तीन वर्षांपासून रिक्त आहे. नायब तहसीलदारांची दोन पदे भरली नाही. तब्बल सात गावांमध्ये तलाठी नाही. ११ गावांमध्ये कृषी सहायक नाही. तालुका कृषी अधिकारीचे पद प्रभारी आहे. वीज मंडळातील २३ तांत्रिक कर्मचारी कायमस्वरूपी नाहीत. पंचायत समितीमधील कृषी विस्तार अधिकारी पद अद्यापही निर्माण झाले नाही. नऊ गावांमध्ये अद्यापही ग्रामसेवक नाहीत. सहायक निबंधक, बांधकाम विभागाचे प्उपविभागीय अभियंता प्रभारी आहेत. भूमिअभिलेख कार्यालयात रिक्त जागेची संख्या अधिक आहे.
रिक्त पदांची फक्त माहिती देणार आहात का?
रिक्त पदे कधी भरणार?
ठोस निर्णय कधी घेणार?
२०१९ च्या भरत्या कधी पूर्ण करणार?